शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

घरोघरी सावित्री, जोतिबाचा शोध जारी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 12:20 IST

Jaydeep Pisal And Kalyani Pisal : आजही गाव आणि गावातली माणसं, हाच ध्यास आणि श्वास...

नवनाथ सकुंडे

लग्नादिवशी दारात लावलेली केळीची पानं सुकून गेलीत... लग्नाला आलेले मोजकेच पाहुणे घरात...सत्यनारायणाची पूजा संपते, पूजा सांगणारे काका निघून जातात...नवरी भरजरी साडीतून अवघडत उठून उभी राहते...अन् अन्... अचानक नवरा समोर येतो...'आजपासून साडीत अवघडायचं नाही, हे घे पंजाबी ड्रेस, आजपासून आतली रूम तुझी... आणि ऐक, ही पुस्तकं, अभ्यास कर... दोन वर्षांत पीएसआय बनायचं'हनीमून का काय असतं, त्याला न जाता बायकोचा अभ्यास घेत राहिला नवरा... प्रणयमूल्यांकित गोलगप्पा मारण्यापेक्षा जनरल नॉलेज शिकवत राहिला नवरा...ही खरीखुरी गोष्ट आहे साताऱ्याच्या जयदीप पिसाळ यांची... जयदीप दोनदा एमपीएससी पास झाले... पीएसआय आणि कुठलीशी पोस्ट मिळाली...वाठार स्टेशनला तीन मिनिटं रेल्वे थांबायची, तेवढ्या वेळेत दहा-बारा ग्लास उसाचा रस विकायचा... त्यातनं ग्लासमागे रुपयाचा ठोकळा मिळायचा...असलं झांगड करत जयदीपराव एमपीएससी दोनदा पास झाले...पण... पण...'व्यवसाय करू, गावाची सेवा करू' म्हणत पोस्ट नाकारल्या...दुचाकीच्या कंपनीची सेमी-फ्रन्चायझी घेतली, कोरेगावच्या पळशीचे सरपंच झाले... खाचखळग्यांच्या गावात सिमेंटचे रस्ते केले... गावाशेजारचा बंधारा बांधला... 'पानी फाऊंडेशन'चं काम केलं... पळशी गौरव पुरस्कार सोहळा परमोच्च केला... आणि काय काय... आजही गाव आणि गावातली माणसं, हाच ध्यास आणि श्वास...एमपीएससी पास होऊनही पोस्ट न घेणाऱ्या जयदीपरावांची भागात छी-थू झाली...एमपीएससीचं फॅड असलेले तरूण जयदीपरावांकडे 'माजोरडा' म्हणत तुच्छतेनं पाहू लागले..विजयाच्या आनंदाला लपवत, पराभवाची बोच पचवणारे जयदीपराव हलले नाहीत... लढत राहिले...पण वाळल्या-करपल्या जगण्याच्या धगीमध्ये एक ओल होती मनात... करपतानाही मनात एक ऊबदार जाळ होता पेटलेला...वर्गातल्याच कल्याणी नावाच्या मुलीवर  जीव जडला होता...'अय पोरा, काम ना धाम, यमपीयस्सी पास हुऊन बोंबलत फिरतूय, दुनयादारी करत गावपुढारी झालायस, तुला पोरगी देण्यापरीस हिरीत ढकलून दिन पोरगी'जयदीप लग्नासाठी मागणी घालायला गेले तेव्हा कल्याणीच्या बापाचे हे शब्द...'तुमच्या पोरीला दोन वर्षांत अधिकारी करतो, माझ्यावर विश्वास ठेवा' म्हणणाऱ्या जयदीप पिसाळांच्या डोळ्यांतला आत्मविश्वासाचा झरा कल्याणीच्या वडिलांना पाझर फोडून गेला... अखेर आयुष्याची सोबतीन म्हणून कल्याणी मिळाली...पूजेनंतर अवघ्या दोन वर्षांत कल्याणी पीएसआय झाली...सगळं माहीत पडत होतं...एकदा जयदीपरावांना विचारलं...'व्यवसाय जोरातय, गावात सरपंचय, भागांत दबदबाय, लोक नमस्कार करतात, आता काय स्वप्न राह्यलंय?''सर, सगळं मिळालं, पण तिचं ट्रेनिंग संपलं की युनिफॉर्मवरच्या बायकोला एकदा सॅल्यूट मारायचाय'आता इतक्यात जयदीपरावांशी बोललो... म्हटलं, 'तुमच्या घराजवळ आहे, भेटूयात का?''सर, कल्याणीला पोलीस स्टेशनला सोडून घरी आताच आलोय, ती दुपारीच घरी आली होती, पण अचानक नाईटला जावं लागलं... आता मुलाला सोडायला आलोय शाळेत... घरी जाऊन स्वयंपाक करायचाय... या घरीच...'जयदीपराव तुम्ही बायकोला स्यॅल्यूट मारलात...ही साधारण गोष्ट नाही, कारण खादीला खाकी सॅल्यूट मारताना नेहमी दिसतं, इथं खाकीला खादी सॅल्यूट मारताना बघून विलक्षण वाटतं...असो...कल्याणी सावित्रीबाई आहे... लढवय्यी आहे... मी तिला सॅल्यूट तर मारणारच...पण तुमच्या पायांवर डोकं ठेवतो...कारण, घरोघरी सावित्री आहेत... फक्त त्यांच्या पंखांना बळ देणारे तुमच्यासारखे जोतिबा घरोघरी व्हायला हवेत...

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmarriageलग्न