शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

घरोघरी सावित्री, जोतिबाचा शोध जारी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 12:20 IST

Jaydeep Pisal And Kalyani Pisal : आजही गाव आणि गावातली माणसं, हाच ध्यास आणि श्वास...

नवनाथ सकुंडे

लग्नादिवशी दारात लावलेली केळीची पानं सुकून गेलीत... लग्नाला आलेले मोजकेच पाहुणे घरात...सत्यनारायणाची पूजा संपते, पूजा सांगणारे काका निघून जातात...नवरी भरजरी साडीतून अवघडत उठून उभी राहते...अन् अन्... अचानक नवरा समोर येतो...'आजपासून साडीत अवघडायचं नाही, हे घे पंजाबी ड्रेस, आजपासून आतली रूम तुझी... आणि ऐक, ही पुस्तकं, अभ्यास कर... दोन वर्षांत पीएसआय बनायचं'हनीमून का काय असतं, त्याला न जाता बायकोचा अभ्यास घेत राहिला नवरा... प्रणयमूल्यांकित गोलगप्पा मारण्यापेक्षा जनरल नॉलेज शिकवत राहिला नवरा...ही खरीखुरी गोष्ट आहे साताऱ्याच्या जयदीप पिसाळ यांची... जयदीप दोनदा एमपीएससी पास झाले... पीएसआय आणि कुठलीशी पोस्ट मिळाली...वाठार स्टेशनला तीन मिनिटं रेल्वे थांबायची, तेवढ्या वेळेत दहा-बारा ग्लास उसाचा रस विकायचा... त्यातनं ग्लासमागे रुपयाचा ठोकळा मिळायचा...असलं झांगड करत जयदीपराव एमपीएससी दोनदा पास झाले...पण... पण...'व्यवसाय करू, गावाची सेवा करू' म्हणत पोस्ट नाकारल्या...दुचाकीच्या कंपनीची सेमी-फ्रन्चायझी घेतली, कोरेगावच्या पळशीचे सरपंच झाले... खाचखळग्यांच्या गावात सिमेंटचे रस्ते केले... गावाशेजारचा बंधारा बांधला... 'पानी फाऊंडेशन'चं काम केलं... पळशी गौरव पुरस्कार सोहळा परमोच्च केला... आणि काय काय... आजही गाव आणि गावातली माणसं, हाच ध्यास आणि श्वास...एमपीएससी पास होऊनही पोस्ट न घेणाऱ्या जयदीपरावांची भागात छी-थू झाली...एमपीएससीचं फॅड असलेले तरूण जयदीपरावांकडे 'माजोरडा' म्हणत तुच्छतेनं पाहू लागले..विजयाच्या आनंदाला लपवत, पराभवाची बोच पचवणारे जयदीपराव हलले नाहीत... लढत राहिले...पण वाळल्या-करपल्या जगण्याच्या धगीमध्ये एक ओल होती मनात... करपतानाही मनात एक ऊबदार जाळ होता पेटलेला...वर्गातल्याच कल्याणी नावाच्या मुलीवर  जीव जडला होता...'अय पोरा, काम ना धाम, यमपीयस्सी पास हुऊन बोंबलत फिरतूय, दुनयादारी करत गावपुढारी झालायस, तुला पोरगी देण्यापरीस हिरीत ढकलून दिन पोरगी'जयदीप लग्नासाठी मागणी घालायला गेले तेव्हा कल्याणीच्या बापाचे हे शब्द...'तुमच्या पोरीला दोन वर्षांत अधिकारी करतो, माझ्यावर विश्वास ठेवा' म्हणणाऱ्या जयदीप पिसाळांच्या डोळ्यांतला आत्मविश्वासाचा झरा कल्याणीच्या वडिलांना पाझर फोडून गेला... अखेर आयुष्याची सोबतीन म्हणून कल्याणी मिळाली...पूजेनंतर अवघ्या दोन वर्षांत कल्याणी पीएसआय झाली...सगळं माहीत पडत होतं...एकदा जयदीपरावांना विचारलं...'व्यवसाय जोरातय, गावात सरपंचय, भागांत दबदबाय, लोक नमस्कार करतात, आता काय स्वप्न राह्यलंय?''सर, सगळं मिळालं, पण तिचं ट्रेनिंग संपलं की युनिफॉर्मवरच्या बायकोला एकदा सॅल्यूट मारायचाय'आता इतक्यात जयदीपरावांशी बोललो... म्हटलं, 'तुमच्या घराजवळ आहे, भेटूयात का?''सर, कल्याणीला पोलीस स्टेशनला सोडून घरी आताच आलोय, ती दुपारीच घरी आली होती, पण अचानक नाईटला जावं लागलं... आता मुलाला सोडायला आलोय शाळेत... घरी जाऊन स्वयंपाक करायचाय... या घरीच...'जयदीपराव तुम्ही बायकोला स्यॅल्यूट मारलात...ही साधारण गोष्ट नाही, कारण खादीला खाकी सॅल्यूट मारताना नेहमी दिसतं, इथं खाकीला खादी सॅल्यूट मारताना बघून विलक्षण वाटतं...असो...कल्याणी सावित्रीबाई आहे... लढवय्यी आहे... मी तिला सॅल्यूट तर मारणारच...पण तुमच्या पायांवर डोकं ठेवतो...कारण, घरोघरी सावित्री आहेत... फक्त त्यांच्या पंखांना बळ देणारे तुमच्यासारखे जोतिबा घरोघरी व्हायला हवेत...

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmarriageलग्न