शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

घरोघरी सावित्री, जोतिबाचा शोध जारी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 12:20 IST

Jaydeep Pisal And Kalyani Pisal : आजही गाव आणि गावातली माणसं, हाच ध्यास आणि श्वास...

नवनाथ सकुंडे

लग्नादिवशी दारात लावलेली केळीची पानं सुकून गेलीत... लग्नाला आलेले मोजकेच पाहुणे घरात...सत्यनारायणाची पूजा संपते, पूजा सांगणारे काका निघून जातात...नवरी भरजरी साडीतून अवघडत उठून उभी राहते...अन् अन्... अचानक नवरा समोर येतो...'आजपासून साडीत अवघडायचं नाही, हे घे पंजाबी ड्रेस, आजपासून आतली रूम तुझी... आणि ऐक, ही पुस्तकं, अभ्यास कर... दोन वर्षांत पीएसआय बनायचं'हनीमून का काय असतं, त्याला न जाता बायकोचा अभ्यास घेत राहिला नवरा... प्रणयमूल्यांकित गोलगप्पा मारण्यापेक्षा जनरल नॉलेज शिकवत राहिला नवरा...ही खरीखुरी गोष्ट आहे साताऱ्याच्या जयदीप पिसाळ यांची... जयदीप दोनदा एमपीएससी पास झाले... पीएसआय आणि कुठलीशी पोस्ट मिळाली...वाठार स्टेशनला तीन मिनिटं रेल्वे थांबायची, तेवढ्या वेळेत दहा-बारा ग्लास उसाचा रस विकायचा... त्यातनं ग्लासमागे रुपयाचा ठोकळा मिळायचा...असलं झांगड करत जयदीपराव एमपीएससी दोनदा पास झाले...पण... पण...'व्यवसाय करू, गावाची सेवा करू' म्हणत पोस्ट नाकारल्या...दुचाकीच्या कंपनीची सेमी-फ्रन्चायझी घेतली, कोरेगावच्या पळशीचे सरपंच झाले... खाचखळग्यांच्या गावात सिमेंटचे रस्ते केले... गावाशेजारचा बंधारा बांधला... 'पानी फाऊंडेशन'चं काम केलं... पळशी गौरव पुरस्कार सोहळा परमोच्च केला... आणि काय काय... आजही गाव आणि गावातली माणसं, हाच ध्यास आणि श्वास...एमपीएससी पास होऊनही पोस्ट न घेणाऱ्या जयदीपरावांची भागात छी-थू झाली...एमपीएससीचं फॅड असलेले तरूण जयदीपरावांकडे 'माजोरडा' म्हणत तुच्छतेनं पाहू लागले..विजयाच्या आनंदाला लपवत, पराभवाची बोच पचवणारे जयदीपराव हलले नाहीत... लढत राहिले...पण वाळल्या-करपल्या जगण्याच्या धगीमध्ये एक ओल होती मनात... करपतानाही मनात एक ऊबदार जाळ होता पेटलेला...वर्गातल्याच कल्याणी नावाच्या मुलीवर  जीव जडला होता...'अय पोरा, काम ना धाम, यमपीयस्सी पास हुऊन बोंबलत फिरतूय, दुनयादारी करत गावपुढारी झालायस, तुला पोरगी देण्यापरीस हिरीत ढकलून दिन पोरगी'जयदीप लग्नासाठी मागणी घालायला गेले तेव्हा कल्याणीच्या बापाचे हे शब्द...'तुमच्या पोरीला दोन वर्षांत अधिकारी करतो, माझ्यावर विश्वास ठेवा' म्हणणाऱ्या जयदीप पिसाळांच्या डोळ्यांतला आत्मविश्वासाचा झरा कल्याणीच्या वडिलांना पाझर फोडून गेला... अखेर आयुष्याची सोबतीन म्हणून कल्याणी मिळाली...पूजेनंतर अवघ्या दोन वर्षांत कल्याणी पीएसआय झाली...सगळं माहीत पडत होतं...एकदा जयदीपरावांना विचारलं...'व्यवसाय जोरातय, गावात सरपंचय, भागांत दबदबाय, लोक नमस्कार करतात, आता काय स्वप्न राह्यलंय?''सर, सगळं मिळालं, पण तिचं ट्रेनिंग संपलं की युनिफॉर्मवरच्या बायकोला एकदा सॅल्यूट मारायचाय'आता इतक्यात जयदीपरावांशी बोललो... म्हटलं, 'तुमच्या घराजवळ आहे, भेटूयात का?''सर, कल्याणीला पोलीस स्टेशनला सोडून घरी आताच आलोय, ती दुपारीच घरी आली होती, पण अचानक नाईटला जावं लागलं... आता मुलाला सोडायला आलोय शाळेत... घरी जाऊन स्वयंपाक करायचाय... या घरीच...'जयदीपराव तुम्ही बायकोला स्यॅल्यूट मारलात...ही साधारण गोष्ट नाही, कारण खादीला खाकी सॅल्यूट मारताना नेहमी दिसतं, इथं खाकीला खादी सॅल्यूट मारताना बघून विलक्षण वाटतं...असो...कल्याणी सावित्रीबाई आहे... लढवय्यी आहे... मी तिला सॅल्यूट तर मारणारच...पण तुमच्या पायांवर डोकं ठेवतो...कारण, घरोघरी सावित्री आहेत... फक्त त्यांच्या पंखांना बळ देणारे तुमच्यासारखे जोतिबा घरोघरी व्हायला हवेत...

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmarriageलग्न