शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

चौकटीबाहेर जाऊन दुष्काळाला भिडणे आवश्यक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 09:07 IST

मराठवाडा वर्तमान : १९७२ इतकाच यंदाचा दुष्काळ भयंकर आहे. शिवाय तो मराठवाड्यापुरता मर्यादित नाही. त्यावेळी पीक हातचे गेल्याने हातातोंडाची गाठ कशी पडेल, ही चिंता होती. यावेळी रोजगाराबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट आहे. खरीपपाठोपाठ रबीही गेले. शेतकरी, शेतमजूर उघड्यावर पडला, खेडी उद्ध्वस्त झाली. अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध नाहीत. सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्याच्या तांत्रिकतेत अडकले आहे. अकल्पित आलेला हा दुष्काळ असाधारण असून, त्याचा सामना चौकटीबाहेर जाऊन करावा लागणार आहे.

- संजीव उन्हाळे

भाजप सरकारची प्रतिमा शेती आणि शेतकरीविरोधी झाली आहे. शेतीचे कॉर्पोरेटायझेशन करणे हाच या सरकारचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली विमा कंपन्यांनाच १ हजार ७०१ कोटी रुपये याच वर्षी केंद्र सरकारचा हिस्सा म्हणून देण्यात आले. या विमा कंपन्या आपले उखळ पांढरे करतात आणि शेतकऱ्यांना मात्र अंगठा दाखवितात. शेतकरी देशोधडीला लागला की, जमिनीचे भूसंपादन सहज करता येईल आणि समृद्धीपासून नाणार प्रकल्पापर्यंत शेतीचे कंपनीकरण करता येईल, असे सरकारचे धोरण दिसते.

१९७२ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा तत्कालीन सरकारने तातडीची मदत केली. रोहयो योजना सुरू केली. लोकांना मातीकाम दिले. खायला सुकडी दिली. जनावरांच्या छावण्या उघडल्या; पण यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे साधे नियोजनही या सरकारकडे नाही. रोहयो योजना जणू बासनात गुंडाळून ठेवली आहे. कोणीही सरकारी अधिकारी ही योजना राबविण्यास धजत नाही. खेडी भकास होत चालली आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या हाताला कामाची गरज आहे, तर किमान या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्याचे मातीकाम जरी निर्माण केले गेले, तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. मनरेगाबद्दल सरकारी अधिकाऱ्यांच्या मनातली धास्ती दूर करून तातडीने किमान मातीकाम आणि शेततळ्यासारखी कामे हाती घ्यावीत. 

पण या सरकारची अवस्था ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी आहे. दुष्काळाच्या घोषणा फार होतील; पण सरकारकडे दुष्काळ निर्मूलनाच्या कामासाठी पैसाच नाही, ही वस्तुस्थिती आहे. किमान चार वर्षांमध्ये केंद्राने तरी तसा उदारपणा दाखविला नाही. सध्या मोदी सरकारचा डांगोरा पिटला जात आहे. ते मोदी सरकार राज्याला दुष्काळ निर्मूलनासाठी मदत देताना हात आखडता घेत आहे. या सरकारने वस्तू व सेवा कर लागू केल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीस कात्री लागली आहे. आता कुठे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीआरएफला जास्तीचा सेस कसा उपलब्ध होईल यासाठी उपाययोजना केली जात आहे.

चौदावा वित्त आयोेगाने कर संकलनातील वाटा वाढविला; परंतु केंद्रीय अनुदानास मात्र कात्री लावली. पंधराव्या वित्त आयोगाने केंद्र-राज्याचा योजनांमध्ये यापूर्वी असलेला ७५:२५ टक्के वाटा घटवून तो आता ९०:१० टक्के इतका केला आहे. दुष्काळाच्या कामासाठी केंद्र सरकारने २०१५ मध्ये १,१०० कोटी रुपये दिले. यावर्षी केवळ ५०० कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. आता केंद्राचे पथक येणार केव्हा अन् दुष्काळ जाहीर करणार केव्हा? केवळ दुष्काळ जाहीर करण्यावरून जनतेची क्रूर चेष्टा चालू आहे. कर्नाटक सरकारचे महसूलमंत्री आर.व्ही. देशपांडे यांनी जुन्या निकषाच्या आधारे दुष्काळही जाहीर करून टाकला आणि २३ जिल्ह्यांत २,००० कोटी रुपयांची मदतही दिली.

आपले सरकार मात्र केंद्राचा कित्ता गिरवीत बसले आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी दुष्काळ संहितेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मोठे बदल केले. यापूर्वीचे आणेवारीचे धोरण मोडीत काढले. आता नवीन संहितेप्रमाणे पावसाचे प्रमाण, वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता, जलविषयक निर्देशांक पीक पाहणी स्थिती या पाच मुद्यांना महत्त्व दिले असून, केंद्रीय पथक पाहणी करील आणि दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत; परंतु मराठवाड्यातील अनेक गावांतील स्थितीही या निकषाच्या विरोधाभासी आहे. नमुन्यादाखल सांगायचे तर गावात पडलेला पाऊस आणि महसूल मंडळातील पावसाची आकडेवारी ही एकसारखी नसते. नवीन निकषाप्रमाणे काही ठिकाणी गाव हे घटक गृहीत धरले, काही ठिकाणी महसूल मंडळ आणि काही ठिकाणी तालुका हा गृहीत धरला आहे, अशा या जाचक निर्णयाने दुष्काळाचे मोजमाप कसे होईल हे मोठे कोडे आहे.

दुष्काळी स्थिती असतानाही अडचणीच्या काही नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे अनेक गावांत सुकाळ राहील, अशी भीती वर्तविण्यात येत आहे. काय तर पिकांमध्ये हिरवटपणा दिसला, तर तो दुष्काळ नाही, असे अनेक बाळबोध निकष लावण्यात आले आहेत. या निकषाला कचऱ्याची टोपली दाखवून अगोदर दुष्काळ जाहीर करायला हवा. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकार