शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

चौकटीबाहेर जाऊन दुष्काळाला भिडणे आवश्यक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 09:07 IST

मराठवाडा वर्तमान : १९७२ इतकाच यंदाचा दुष्काळ भयंकर आहे. शिवाय तो मराठवाड्यापुरता मर्यादित नाही. त्यावेळी पीक हातचे गेल्याने हातातोंडाची गाठ कशी पडेल, ही चिंता होती. यावेळी रोजगाराबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट आहे. खरीपपाठोपाठ रबीही गेले. शेतकरी, शेतमजूर उघड्यावर पडला, खेडी उद्ध्वस्त झाली. अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध नाहीत. सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्याच्या तांत्रिकतेत अडकले आहे. अकल्पित आलेला हा दुष्काळ असाधारण असून, त्याचा सामना चौकटीबाहेर जाऊन करावा लागणार आहे.

- संजीव उन्हाळे

भाजप सरकारची प्रतिमा शेती आणि शेतकरीविरोधी झाली आहे. शेतीचे कॉर्पोरेटायझेशन करणे हाच या सरकारचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली विमा कंपन्यांनाच १ हजार ७०१ कोटी रुपये याच वर्षी केंद्र सरकारचा हिस्सा म्हणून देण्यात आले. या विमा कंपन्या आपले उखळ पांढरे करतात आणि शेतकऱ्यांना मात्र अंगठा दाखवितात. शेतकरी देशोधडीला लागला की, जमिनीचे भूसंपादन सहज करता येईल आणि समृद्धीपासून नाणार प्रकल्पापर्यंत शेतीचे कंपनीकरण करता येईल, असे सरकारचे धोरण दिसते.

१९७२ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा तत्कालीन सरकारने तातडीची मदत केली. रोहयो योजना सुरू केली. लोकांना मातीकाम दिले. खायला सुकडी दिली. जनावरांच्या छावण्या उघडल्या; पण यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे साधे नियोजनही या सरकारकडे नाही. रोहयो योजना जणू बासनात गुंडाळून ठेवली आहे. कोणीही सरकारी अधिकारी ही योजना राबविण्यास धजत नाही. खेडी भकास होत चालली आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या हाताला कामाची गरज आहे, तर किमान या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्याचे मातीकाम जरी निर्माण केले गेले, तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. मनरेगाबद्दल सरकारी अधिकाऱ्यांच्या मनातली धास्ती दूर करून तातडीने किमान मातीकाम आणि शेततळ्यासारखी कामे हाती घ्यावीत. 

पण या सरकारची अवस्था ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी आहे. दुष्काळाच्या घोषणा फार होतील; पण सरकारकडे दुष्काळ निर्मूलनाच्या कामासाठी पैसाच नाही, ही वस्तुस्थिती आहे. किमान चार वर्षांमध्ये केंद्राने तरी तसा उदारपणा दाखविला नाही. सध्या मोदी सरकारचा डांगोरा पिटला जात आहे. ते मोदी सरकार राज्याला दुष्काळ निर्मूलनासाठी मदत देताना हात आखडता घेत आहे. या सरकारने वस्तू व सेवा कर लागू केल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीस कात्री लागली आहे. आता कुठे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीआरएफला जास्तीचा सेस कसा उपलब्ध होईल यासाठी उपाययोजना केली जात आहे.

चौदावा वित्त आयोेगाने कर संकलनातील वाटा वाढविला; परंतु केंद्रीय अनुदानास मात्र कात्री लावली. पंधराव्या वित्त आयोगाने केंद्र-राज्याचा योजनांमध्ये यापूर्वी असलेला ७५:२५ टक्के वाटा घटवून तो आता ९०:१० टक्के इतका केला आहे. दुष्काळाच्या कामासाठी केंद्र सरकारने २०१५ मध्ये १,१०० कोटी रुपये दिले. यावर्षी केवळ ५०० कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. आता केंद्राचे पथक येणार केव्हा अन् दुष्काळ जाहीर करणार केव्हा? केवळ दुष्काळ जाहीर करण्यावरून जनतेची क्रूर चेष्टा चालू आहे. कर्नाटक सरकारचे महसूलमंत्री आर.व्ही. देशपांडे यांनी जुन्या निकषाच्या आधारे दुष्काळही जाहीर करून टाकला आणि २३ जिल्ह्यांत २,००० कोटी रुपयांची मदतही दिली.

आपले सरकार मात्र केंद्राचा कित्ता गिरवीत बसले आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी दुष्काळ संहितेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मोठे बदल केले. यापूर्वीचे आणेवारीचे धोरण मोडीत काढले. आता नवीन संहितेप्रमाणे पावसाचे प्रमाण, वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता, जलविषयक निर्देशांक पीक पाहणी स्थिती या पाच मुद्यांना महत्त्व दिले असून, केंद्रीय पथक पाहणी करील आणि दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत; परंतु मराठवाड्यातील अनेक गावांतील स्थितीही या निकषाच्या विरोधाभासी आहे. नमुन्यादाखल सांगायचे तर गावात पडलेला पाऊस आणि महसूल मंडळातील पावसाची आकडेवारी ही एकसारखी नसते. नवीन निकषाप्रमाणे काही ठिकाणी गाव हे घटक गृहीत धरले, काही ठिकाणी महसूल मंडळ आणि काही ठिकाणी तालुका हा गृहीत धरला आहे, अशा या जाचक निर्णयाने दुष्काळाचे मोजमाप कसे होईल हे मोठे कोडे आहे.

दुष्काळी स्थिती असतानाही अडचणीच्या काही नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे अनेक गावांत सुकाळ राहील, अशी भीती वर्तविण्यात येत आहे. काय तर पिकांमध्ये हिरवटपणा दिसला, तर तो दुष्काळ नाही, असे अनेक बाळबोध निकष लावण्यात आले आहेत. या निकषाला कचऱ्याची टोपली दाखवून अगोदर दुष्काळ जाहीर करायला हवा. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकार