शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जे कळतं, ते वळत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 06:05 IST

स्वयंपाक करण्याआधी योग्य ती सामग्री गोळा केली तरी अन्न शिजवावं लागतंच ना? तसंच आहे मनाचं! उपाय कळून काय उपयोग ?- कृती करावीच लागणार ना?

ठळक मुद्देपाच मिनिटांचीही ध्यानधारणा केली नाही. योगासनं शिकले नाही. साधा प्राणायामही केला नाही, तर माझी भीती कशी जाणार?

डॉ. राजेंद्र बर्वे

‘मला न सगळं कळतं, सगळं म्हणजे सगळंच अगदी कळतंच! आपल्याला ना दोन मनं असतात. एक कॉन्शस माइंड आणि अनकॉन्शस. मला ना तशीच दोन मनं आहेत.’ माझ्यासमोर बसून बोलणारी महिला सिक्सरवर सिक्सर मारत होती.

‘कळतंय ना तुम्हाला?’

मी मान डोलावली, ‘म्हणजे साधारण कळतंय..!’

‘तर माझं अनकॉन्शस माइंड आहे ना, त्याच्यापर्यंत संदेश पोहोचतच नाही. त्यामुळे अनकॉन्शस माइंडमधून योग्य मेसेज मला म्हणजे कॉन्शस माइंडला मिळतच नाहीत!’

- हे असे दणादण षटकार मारणाऱ्या फलंदाजाचं अवसान बघताबघता गळालं. डोळ्यात अश्रू आले! मी टिश्यू पेपर दिला. काही वेळ तसाच गेला. असं बरेचदा होतं. आपली समस्या नीट कळली आहे असं समजून आपण स्वत:ची समजूत काढतो. वरवर समजूत पटते; पण ‘दिल हैं के मानता नही’ अशी अवस्था होते.

‘मला ना खूप भीती वाटते. मनाला कितीही समजावलं, तरी भीती संपत नाही. भीतीचं रूपांतर काळीज कुरतडणाऱ्या काळजीत होतं. धीर सुटतो. सगळं कळतं, पण वळत नाही! मग वाटतं कळलंच नसतं तर बरं झालं असतं. अज्ञानातच सुख असतं ना!’

शेवटी मी त्यांना शांत करीत म्हणालो, ‘म्हणजे तुमची समस्या तुम्हाला कळली आहे; पण प्रत्यक्षात त्या कळण्यानुसार तुमच्यात काही फरक पडत नाहीय. कळलेलं वळत नाहीय, समजेची उमज होत नाहीये!’

‘होय, अगदी बरोबर!’ त्या म्हणाल्या!

रुग्ण तसे साधे असतात. त्यांच्या सभोवतालचे लोक खरं म्हणजे त्यांची टिंगलटवाळी करीत असतात. त्यांना खूप त्रास होत असतो म्हणून ते.

‘मी मानसशास्त्राचा खूप अभ्यास करते वाटलं की ते वाचून सगळं आपोआप वळू लागेल..!’

‘तसं नसतं हो,’ मी त्यांना म्हणालो, ‘हे सगळे त्रास मानवशरीर धर्माचे असतात. मनुष्य जन्माला धरूनच येतात. अभ्यास करून माहिती आणि कधी ज्ञानही मिळतं; पण त्यामुळे आपल्या वैयक्तिक त्रासाचे, विकाराचे नि यातनेचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे एक फायदा होतो. आपण आपलं दु:ख, यातना आणि विकाराचं स्वरूप स्वीकारतो; पण समजा मलेरियाचा ताप आला, तर त्याची सर्व लक्षणं पारखून मलेरिया बरा होईल का? ताप कसला आहे ते कळलं तरी तो आपोआप उतरत नाही ना! तुमचं तसं होतंय. समस्येचं स्वरूप आणि मनाची अशी मांडणी कळली तरी प्रश्न आपोआप विरून जात नाहीत. त्याकरिता वेगळे उपाय करावे लागतात. मनाला चुचकारून, गोडीगुलाबीने पटवून नव्या सवयी लावून घ्याव्या लागतात. अगदी घरगुती उदाहरणावरून ही लक्षात येईल तुमच्या!’

बाई खूप विचारात पडल्या आणि डोळे पुसून म्हणाल्या, ‘आलं लक्षात, अहो स्वयंपाक करण्याआधी योग्य ती सामग्री गोळा केली तरी अन्न शिजवावं लागतंच ना?’

मी म्हणालो, ‘अगदी बरोबर समजलं. मी या प्रक्रियेला माइंड लर्निंग आणि बॉडी लर्निंग म्हणतो. म्हणजे मन शिकून समजून घेता येतं, पण अनुभवानं, प्रयत्नानं शरीराच्या अंगवळणी पडावं लागतं. त्याला काही काळ जावा लागणारच ना! काही भाज्या पटकन शिजतात, तर काहींना बराच वेळ लागतो, त्यासाठी समज आणि चिकाटी हवी. सगळ्या भाज्या आणि पदार्थ एकाच विशिष्ट वेळात शिजलेच पाहिजेत असा हट्ट का?’

- बाई एकदम सावरल्या. म्हणाल्या,

‘माझं काय चुकलं हे लक्षात येतंय आता! मी भीती कशी व का निर्माण होते यावर नेटवर खूप रिसर्च केला. खूप माहिती जमा केली; पण पाच मिनिटांचीही ध्यानधारणा केली नाही. योगासनं शिकले नाही. साधा प्राणायामही केला नाही, तर माझी भीती कशी जाणार?’

मी हसत म्हणालो, ‘कोच खेळाडूला शिकवितो, शिक्षक शिक्षण देतात; पण खेळायचं, शिकायचं, त्यासाठी धडपडून प्रयत्न करायचे हे आपलं काम असतं ना!’

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com