शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

इतिहासाची शोधयात्रा --- संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:35 IST

संशोधकांच्या पोतडीत इतिहासाचा खजाना जमा होत असला तरी, त्याची शोधयात्रा तितकीच बिकटवाटेवरची असते. शेकडो वर्षांमागचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडताना दस्तऐवजांचे भक्कम स्तंभ उभे करावे लागतात.

ठळक मुद्दे येथील ऐतिहासिक कागदपत्रांचे विश्व पाहून ते थक्कही होतात. अनेक संशोधकांना घडविण्याचे कामही हे संग्रहालय आणि मंडळ करीत आहे.

- अविनाश कोळीसंशोधकांच्या पोतडीत इतिहासाचा खजाना जमा होत असला तरी, त्याची शोधयात्रा तितकीच बिकटवाटेवरची असते. शेकडो वर्षांमागचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडताना दस्तऐवजांचे भक्कम स्तंभ उभे करावे लागतात. जीर्ण, धुळीच्या थरात हरवलेली, दुर्गंधीच्या पसाऱ्यात अडकलेली लाखो कागदपत्रे शोधण्यासाठी मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘धूळवाटेवरचा काटेरी प्रवास’ करीत इतिहासाचा एक खजाना लुटला आहे.

मिरज इतिहास संशोधन मंडळाचा ऐतिहासिक खजाना पाहण्यासाठी केवळ राज्यातीलच नव्हे, तर अन्य प्रांतातील व परदेशातील लोक भेट देत आहेत. महाराष्टतील विविध जिल्ह्यातील राजे-रजवाडे, सरदार, इनामदार, सावकार, संस्थानिक, त्यांचे अधिकारी, मंदिर, दर्गा, मशिदींचे पुजारी, गुरव, परंपरागत पौरोहित्य, भिक्षुकी करणारी घराणी, समाज अशा अनेकांचा शेकडो, हजारो वर्षांचा इतिहास कवेत घेत संशोधनाच्या खोल दरीत अजून ही मंडळी फिरत आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा, कºहाड, पुणे यासह राज्यातील अनेक जिल्हयातील ऐतिहासिक दस्तऐवज या मंडळाकडे जमा झाले आहेत. मोडी, हळेकन्नड किंवा अन्य भाषांमधील शिलालेख, ताम्रलेख अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून संशोधनाच्या विश्वातील एक महत्त्वाची सफर त्यांनी केली.

पडके वाडे, घरे, संस्थानकालीन दफ्तरखाने, पाटीलवाडे अशाठिकाणी जुन्या कागदपत्रांचा शोध घेतला जातो. जुन्या जीर्ण फोटोंच्या फे्रमला लावलेल्या वृत्तपत्रीय व जुन्या कागदांमधूनही इतिहासाच्या विश्वाची पाने उलगडली जात आहेत. चालुक्यकालीन, पेशवेकालीन, आदिलशाहीच्या काळातील इतिहासही दस्त, शिलालेख, ताम्रलेख, वस्तूस्वरुपातून समोर आला आहे. लाखो कागदपत्रांचा खजाना आज या मंडळाकडे जमा आहे. केवळ कागदपत्रे सापडूनही इतिहास हाती लागला, असे होत नाही. अनेकदा माहीत नसलेली भाषा, लिपी यात हा इतिहास लपलेला असतो. संबंधित भाषातज्ज्ञांकडून त्या कागदपत्रातील तपशिलाचा उलगडा करून नंतर त्याच्या नोंदी करून इतिहासाचे हे पान सजविले जाते.

इतिहास जेवढा रंजक आणि वेधक वाटतो, तितकी त्याच्या शोधाची कहाणी क्लिष्ट, विचित्र आणि त्रासदायी आहे. इतिहासाच्या कागदी लगद्यांना पैलू पाडून अस्सल हिºयासमान दस्त घडविण्याचे काम हे कार्यकर्ते करीत आहेत. सांगलीच्या विजयनगर येथील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीही याच संशोधन मंडळाकडील जुन्या दस्तांनी सजल्या आहेत. म्हणूनच देशभरातून आणि विदेशातून जुने संदर्भ शोधण्यासाठी अनेक संशोधक, लेखक या संग्रहालयाला भेटी देत आहेत. येथील ऐतिहासिक कागदपत्रांचे विश्व पाहून ते थक्कही होतात. अनेक संशोधकांना घडविण्याचे कामही हे संग्रहालय आणि मंडळ करीत आहे.

एकीकडे कागदपत्रांचा शोध घेत असताना उत्खननातून लेणी व शिलालेखांत दडलेला इतिहास धांडोळणेही सुरू आहे. या संशोधन मंडळाने काही महिन्यांपूर्वी वराडे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथे इ. स. १०९१ मधील चालुक्यकालीन शिलालेख शोधून काढला होता. त्यानंतर खानापूर तालुक्यातील कोळदुर्ग (पळशी) येथील किल्ल्यावर सुमारे साडेआठशे वर्षांपूर्वीचा कन्नड लिपीतील चालुक्यकालीन शिलालेख मंडळाच्या अभ्यासकांना आढळून आला. एकेकाळी खानापूर परिसरावर असलेल्या जैन धर्मियांच्या प्रभावाची माहिती या शिलालेखातून समोर आली आहे. या शोधामुळे जिल्'ाच्या प्राचीन इतिहासाच्या माहितीत मोठी भर पडली आहे. या मंडळात इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकरांसह प्रा. गौतम काटकर, रणधीर मोरे, प्रा. मुफीद मुजावर, संग्राम मोरे, बाळासाहेब पाटील हे लोक कार्यरत आहेत.

टॅग्स :historyइतिहासSangliसांगली