शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आजी सोडून गेली; पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 09:30 IST

हरवलेली माणसं :बेवारस आजीची कित्येक वर्षांनंतर आम्ही घडवली मुलीशी भेट! दोघीही सुखावल्या. त्यांच्या आनंदाला आम्ही आनंद मानलं! अलीकडं आजी गेली म्हणून समजलं. ऐकून वाईट मानावं की, समाधान हेही कळत नव्हतं. तिच्या बेवारस जगण्याची ही गोष्ट. 

- दादासाहेब श्रीकिसन थेटे

भर व्यापाऱ्याच्या वस्तीत गेल्या सालभरापासून रुक्मिणीबाई साखरे नावाच्या आजी बेवारस अवस्थेत राहत होत्या. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून भेटेल ते खाऊन, हनुमान मंदिरात निवारा अन् रस्त्यालाच घर समजून दिवस ढकलणं हेच त्यांचं आयुष्य! आपली मुलगी आज ना उद्या भेटेल, ही एकच आशा!

कडाक्याच्या थंडीत काही दिवसांपूर्वी दोन्ही पायांना झालेल्या जखमांमुळं जिवाच्या आकांतानं, ही आजी ओरडत सडत पडलेली होती. श्रीमंतांच्या या रस्त्यावर म्हातारी अनवाणी एकाकीपणानं रडत होती, विव्हळत होती. जखमा अळ्या पडल्यामुळं आतून ठणक मारत असल्यानं, म्हातारीच्या जिवाची तडफड होत होती. ही वेदना पाहून योगेश दादांनी फोन करून मला म्हातारीचा सविस्तर वृत्तांत कळवला. मी, दत्ताभाऊ आणि रफत गाडी घेऊन म्हातारीजवळ पोहोचलो. तिचे दोन्ही पाय सुजून फुगले होते. एका पिंढरीतून रक्तस्राव होत होता, तर दुसऱ्या पंजातून जखम चिघळली होती. शरीराची हालचाल न करता आल्यामुळे कपड्यातच झालेल्या मलमूत्रामुळे अंगातून दुर्गंधी येऊ लागली होती. त्याच अवस्थेत आम्ही तिला उचलून गाडीत टाकलं अन् दवाखान्यात दाखल केलं. 

म्हातारी जसजशी बोलू लागली, तसे तिच्या आयुष्यातील वेगवेगळे पैलू आमच्यासमोर उलगडू लागले. ‘मरण सोपं, जगणं कठीण,’ असं का म्हणतात हे म्हातारीला पाहून कळत होतं आणि तितकंच छळतही होतं. एखादं म्हातारं दुभतं जनावर रस्त्यावर सापडलं असतं, तर त्याच्यापासून होणाऱ्या फायद्यासाठी त्याला कुणीही ठेवून घेतलं असतं; पण बेवारस माणसाला या जगात काडीची किंमत नाही, हे म्हातारीच्या या अनवाणी जगण्यातून कळत होतं. तिच्या पूर्वायुष्यातल्या कष्टी जीवनाचा आणि वैभवाचा तिला कसलाच विसर पडलेला नव्हता. माणूस मरणावस्थेतही भूतकाळातल्या वैभवाच्या आठवणींना जपताना स्वत:ला किती पोखरत असतो, हे म्हातारी तिच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त करीत होती. 

तिच्या सांगण्यावरून मी तिच्या नातेवाईकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरामुळं वडवणीचे शिवाजी तौर नेकनूरला (जि. बीड) चौकशीसाठी गेले. तिच्या सांगण्यावरून त्यांच्या समाजातील काही लोकांशी आम्ही संपर्क केला. शेवटी रमेश काका सोनवणे (अंबड) यांच्या मदतीनं तिच्या नातेवाईकांचा आम्हाला शोध लागला.

नातेवाईकांकडून तिच्या मुलीशी संपर्क करण्यात आम्हाला यश आलं. ती घरची खूप गडगंज. एकच मुलगा होता. तोही वारला. दोन मुली. एक गेवराईला, तर दुसरी जालन्यात दिली. आधी काही दिवस ही आजी या दोन्ही मुलींकडं राहिली. नंतर मात्र दोन्ही जावयांनी तिला घराबाहेर काढलं. हे सर्व आम्हाला समजलं. त्यांच्या मुलीशी केलेल्या दीर्घ चर्चेनंतर जालना इथं राहणाऱ्या तिच्या मुलीशी आजीची कित्येक वर्षांनंतर भेट घडविण्यात आम्हाला यश आलं. कालपर्यंत बेवारस म्हणून फिरणाऱ्या आजीला तिची पोटची लेक पाहून खूप भरून आलं होतं. तिच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. लेकीलाही आईला पाहून आनंद झाला होता. त्या आजीनं काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला. समाधान याचंच की, तिनं आपला अंतिम श्वास लेकीच्या घरात घेतला.   

टॅग्स :SocialसामाजिकWomenमहिलाFamilyपरिवारsocial workerसमाजसेवक