शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 07:00 IST

खरं तर इतक्या वर्षांमध्ये या महोत्सवानं सामान्य रसिकांना काय दिलं? हे शब्दांत सांगणं अवघड आहे.

ठळक मुद्देकालनिश्चिततेमुळे महोत्सवाला मैफलीचा दर्जा न राहता साचेबद्ध सांगीतिक कार्यक्रमाचे स्वरूप पंडितजींनी स्वत: सायकलवर महोत्सवाची तिकिटे विकल्याचे किस्से यंदाच्या वर्षी तो पेठेबाहेरच्या पुण्यात गेला

- नम्रता फडणीस -

डिसेंबर उजाडला की संगीतरसिकांना ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’चे वेध लागण्यास सुरुवात होते. काही वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रीय संगीत दरबारातील स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी हे रत्न सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) या आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ सवाई गंधर्व महोत्सवाचे बीज पुण्याच्या मातीत रुजवतो काय आणि त्याचे भव्य अशा सांगीतिक वृक्षात रूपांतर होऊन त्याला ’रसिकतेची’ गोमटी फळं लागतात काय, हा अवघा प्रवास अभूतपूर्वच!  कर्नाटकमधील धारवाडसारख्या एका भागातून आलेल्या मनस्वी कलाकारासाठी पुण्याच्या मातीत अभिजात संगीत रुजवण्याची अन् स्वत:ही रुजण्याची प्रक्रिया नक्कीच सोपी नव्हती. पंडितजींनी स्वत: सायकलवर महोत्सवाची तिकिटे विकल्याचे किस्से आजही ऐकविले जातात. खरं तर इतक्या वर्षांमध्ये या महोत्सवानं सामान्य रसिकांना काय दिलं? हे शब्दांत सांगणं अवघड आहे. अंतरंगाला भिडणाऱ्या अभिजात संगीताचा श्रवणानंद कसा घ्यायचा, याची जाणीव रसिकहृदयात विकसित करण्याचं काम या महोत्सवानं नक्कीच केलं. यानिमित्त रसिकांची ‘अभिजात आणि कलासक्त’ होण्याकडे वाटचाल झाली. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत या महोत्सवाच्या मैफली पहाटेपर्यंत रंगायच्या. श्रोतृवर्गाची उत्साही उपस्थिती कायम असायची. त्या मैफलीच्या आठवणी आजही अनेक ज्येष्ठ रसिकांच्या मनात रुंजी घालतात. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या सवाई गंधर्वांचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांनी रसिकांचे कान तृप्त केले. पण पूर्वी रंगणाऱ्या या मैफली आता रंगतच नाहीत. कारण महोत्सवाला आलेली वेळेची मर्यादा. एखाद्या मैफलीत कलाकारांच्या अभिजात आविष्काराचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याला वेळेचे बंधन घातले जावे का? हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला. या कालमर्यादेमुळे रसिक आणि कलाकारांमधून नाराजीचा सूरही आळविण्यात आला. महाराष्ट्राबाहेर कलकत्ता, त्रिवेंद्रम, बंगळुरूमध्येही महोत्सव होतात; मात्र तिथे अशा नियमांच्या चौकटीला सामोरे जावे लागत नसताना महाराष्ट्रातच का? हे कोडे न उलगडणारे आहे. या कालनिश्चिततेमुळे महोत्सवाला आता मैफलीचा दर्जा न राहता त्याला साचेबद्ध अशा सांगीतिक कार्यक्रमाचे स्वरूप येऊ लागले आहे. महोत्सवात दिग्गज कलाकारांच्याही मैफलीही ‘विलंबित’ न होता ‘द्रुत’ होत असल्याने रसिकांसह कलाकारांचाही भ्रमनिरास होतो आहे... महोत्सवात एकाच दिवशी चार कलाकारांच्या सादरीकरणामुळे त्यांच्या कलाविष्कारांचा म्हणावा तसा तब्येतीत आस्वाद घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र, याकडे आयोजकांचे दुर्लक्ष होत आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. केवळ त्यात खंड पडता कामा नये या वृत्तीमधून महोत्सवाकडे पाहिले जात आहे. यातच आता पेठेच्या संस्कृतीत बहरलेल्या महोत्सवाने कूस बदलली असून, यंदाच्या वर्षी तो पेठेबाहेरच्या पुण्यात गेला आहे. नव्या जागेत महोत्सव पुन्हा स्थिरस्थावर करणे आणि दर वर्षीप्रमाणेच रसिकांची उत्साही आणि उदंड उपस्थिती त्याला कायम लाभणे, हीच आता आयोजकांपुढची कसोटी आहे....बघू या काय होतं ते!  (लेखिका ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

टॅग्स :PuneपुणेBhimsen Joshiभीमसेन जोशीmusicसंगीतartकला