शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

निमित्त - सवाई : नव्या स्थळी सूर गवसणार का..? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 07:00 IST

खरं तर इतक्या वर्षांमध्ये या महोत्सवानं सामान्य रसिकांना काय दिलं? हे शब्दांत सांगणं अवघड आहे.

ठळक मुद्देकालनिश्चिततेमुळे महोत्सवाला मैफलीचा दर्जा न राहता साचेबद्ध सांगीतिक कार्यक्रमाचे स्वरूप पंडितजींनी स्वत: सायकलवर महोत्सवाची तिकिटे विकल्याचे किस्से यंदाच्या वर्षी तो पेठेबाहेरच्या पुण्यात गेला

- नम्रता फडणीस -

डिसेंबर उजाडला की संगीतरसिकांना ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’चे वेध लागण्यास सुरुवात होते. काही वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रीय संगीत दरबारातील स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी हे रत्न सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) या आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ सवाई गंधर्व महोत्सवाचे बीज पुण्याच्या मातीत रुजवतो काय आणि त्याचे भव्य अशा सांगीतिक वृक्षात रूपांतर होऊन त्याला ’रसिकतेची’ गोमटी फळं लागतात काय, हा अवघा प्रवास अभूतपूर्वच!  कर्नाटकमधील धारवाडसारख्या एका भागातून आलेल्या मनस्वी कलाकारासाठी पुण्याच्या मातीत अभिजात संगीत रुजवण्याची अन् स्वत:ही रुजण्याची प्रक्रिया नक्कीच सोपी नव्हती. पंडितजींनी स्वत: सायकलवर महोत्सवाची तिकिटे विकल्याचे किस्से आजही ऐकविले जातात. खरं तर इतक्या वर्षांमध्ये या महोत्सवानं सामान्य रसिकांना काय दिलं? हे शब्दांत सांगणं अवघड आहे. अंतरंगाला भिडणाऱ्या अभिजात संगीताचा श्रवणानंद कसा घ्यायचा, याची जाणीव रसिकहृदयात विकसित करण्याचं काम या महोत्सवानं नक्कीच केलं. यानिमित्त रसिकांची ‘अभिजात आणि कलासक्त’ होण्याकडे वाटचाल झाली. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत या महोत्सवाच्या मैफली पहाटेपर्यंत रंगायच्या. श्रोतृवर्गाची उत्साही उपस्थिती कायम असायची. त्या मैफलीच्या आठवणी आजही अनेक ज्येष्ठ रसिकांच्या मनात रुंजी घालतात. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या सवाई गंधर्वांचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांनी रसिकांचे कान तृप्त केले. पण पूर्वी रंगणाऱ्या या मैफली आता रंगतच नाहीत. कारण महोत्सवाला आलेली वेळेची मर्यादा. एखाद्या मैफलीत कलाकारांच्या अभिजात आविष्काराचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याला वेळेचे बंधन घातले जावे का? हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला. या कालमर्यादेमुळे रसिक आणि कलाकारांमधून नाराजीचा सूरही आळविण्यात आला. महाराष्ट्राबाहेर कलकत्ता, त्रिवेंद्रम, बंगळुरूमध्येही महोत्सव होतात; मात्र तिथे अशा नियमांच्या चौकटीला सामोरे जावे लागत नसताना महाराष्ट्रातच का? हे कोडे न उलगडणारे आहे. या कालनिश्चिततेमुळे महोत्सवाला आता मैफलीचा दर्जा न राहता त्याला साचेबद्ध अशा सांगीतिक कार्यक्रमाचे स्वरूप येऊ लागले आहे. महोत्सवात दिग्गज कलाकारांच्याही मैफलीही ‘विलंबित’ न होता ‘द्रुत’ होत असल्याने रसिकांसह कलाकारांचाही भ्रमनिरास होतो आहे... महोत्सवात एकाच दिवशी चार कलाकारांच्या सादरीकरणामुळे त्यांच्या कलाविष्कारांचा म्हणावा तसा तब्येतीत आस्वाद घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र, याकडे आयोजकांचे दुर्लक्ष होत आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. केवळ त्यात खंड पडता कामा नये या वृत्तीमधून महोत्सवाकडे पाहिले जात आहे. यातच आता पेठेच्या संस्कृतीत बहरलेल्या महोत्सवाने कूस बदलली असून, यंदाच्या वर्षी तो पेठेबाहेरच्या पुण्यात गेला आहे. नव्या जागेत महोत्सव पुन्हा स्थिरस्थावर करणे आणि दर वर्षीप्रमाणेच रसिकांची उत्साही आणि उदंड उपस्थिती त्याला कायम लाभणे, हीच आता आयोजकांपुढची कसोटी आहे....बघू या काय होतं ते!  (लेखिका ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

टॅग्स :PuneपुणेBhimsen Joshiभीमसेन जोशीmusicसंगीतartकला