शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

निवडणुका आल्या दारी, प्रकल्पांचा सोस भारी

By किरण अग्रवाल | Updated: February 20, 2022 11:09 IST

Akola Municipal Corporation : महापालिकेकडून चालविली जाणारी कस्तुरबा गांधी व किसनीबाई भरतिया रुग्णालयांची दुरवस्था कुणापासून लपून राहिलेली नाही.

ठळक मुद्देकचरा उचलता येईना, अन निघाले मेडिकल हॉस्पिटल उभारायला

- किरण अग्रवाल

अकोला शहरातील कचरा नीट उचलता येत नसल्याची ओरड होत असलेली महापालिका नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून वैद्यकीय महाविद्यालय उभारायला निघाली आहे खरी, पण हे धाडस नाकापेक्षा मोती जड.. असे तर होणार नाही याचा विचार व्हायला हवा.

 

जाणाऱ्या व्यक्तीला सावल्याही खुणावतात म्हणे, तसे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताधाऱ्यांचे असते. मुदत संपायला येते तेव्हा त्यांना विकासाची स्वप्ने पडू लागतात. अकोला महापालिकेतील कारभाऱ्यांनाही आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर विविध प्रकल्प उभारण्याची घाई झाली असून, मोर्णा साैंदर्यीकरणाच्या विषयापाठोपाठ आता शहरात महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव प्रसवला आहे. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याचा हा प्रकार ठरावा.

 

मेडिकल हब म्हणून नावारूपास आलेल्या अकोल्यात चारही दिशांनी रुग्ण येत असतात. यातील निम्नस्तरीय रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाच आधार लाभत आला आहे. येथे स्वतंत्र जिल्हा शासकीय रुग्णालय नसल्याने त्याचा भार ‘जीएमसी’वरच असून पूर्णक्षमतेने तेथे वैद्यकीय सेवा सुरू असते. लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सेवाही मार्गी लागणार असून मुंबई-पुणे, नागपूरला जाण्याची गरज उरणार नाही. शहरातील खासगी वैद्यकीय सेवाही नावाजलेली आहे, अशात महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालय काढण्याची सुरसुरी आली असून यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी व्यवहार सल्लागार नियुक्तीला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीयांनी मंजुरीही दिली आहे.

 

शहरवासीयांना आरोग्य सेवा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्यदत्त काम असले तरी त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयच कशाला हवे, असा यातील खरा प्रश्न आहे. वस्तुतः महापालिकेकडून चालविली जाणारी कस्तुरबा गांधी व किसनीबाई भरतिया रुग्णालयांची दुरवस्था कुणापासून लपून राहिलेली नाही. ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यापेक्षा चांगली सेवा पुरविली जाते, परंतु महापालिकेच्या या रुग्णालयात केवळ कारकुनी कामे होत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. एकीकडे नर्सेस व वॉर्डबॉयच्या भरवशावर महापालिकेची रुग्णालये चालविली जात असताना, आता वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची उपरती का सुचावी असा प्रश्न म्हणूनच उपस्थित होणारा आहे.

 

महत्वाचे म्हणजे, यासंबंधीचा प्रस्ताव पारित करताना शहरातील माेठ्या खासगी हॉस्पिटल्समध्ये महागडे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नसल्याची बाब प्रशासनाकडून नमूद केली गेली; मग जर संबंधित ठिकाणचा महागडेपणा महापालिकेला माहीत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून तुम्ही त्याबाबत काय पावले उचलली असाही प्रश्न उपस्थित होतो. लाईट, पाणी, पार्किंग, मेडिकल वेस्ट आदीबाबत सुविधा व सवलती देऊनही रुग्णांची लूटमारच होत असेल तर महापालिकेने कोणत्या कारवायांचे दिवे लावले?

 

महापालिकेला नागरिकांच्या आरोग्याची एवढी काळजी आहे ही चांगलीच बाब म्हणायला हवी, पण तसेच असेल तर शहरात जागोजागी रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग उचलायला अगोदर प्राधान्य द्यायला हवे. शहरातील कचरा उचलून तो डेपोवर जाळला जातांना अशोकनगर परिसरात ज्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत त्याकडे लक्ष द्यायला हवे. हातात आहे ती आरोग्य यंत्रणा सुधारायला हवी, पण हे सारे करायचे सोडून थेट वैद्यकीय महाविद्यालयच उभारायला निघाली ही मंडळी. अर्थात निवडणूक जवळ आल्याचा हा परिणाम आहे, पण तसे असले तरी आपला आवाका दुर्लक्षून कसे चालेल?

 

सारांशात, वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा विचार चांगला आहे, पण त्यासाठी लागणारी क्षमता महापालिकेकडे आहे का याचा विचार व्हायला हवा. कारण जेथे महापालिकेला लागणारा आस्थापना खर्च भरून काढण्याची मारामार असते व घटनादत्त जबाबदारीच्या पूर्ततेसाठी निधीची चणचण जाणवते, तिथे वैद्यकीय महाविद्यालयांसारखे प्रकल्प उभारून अगोदरच होत असलेल्या आर्थिक ओढाताणीत भर घालून घेणे हे ‘आ बैल मुझे मार..’ सारखेच झाले तर आश्चर्य वाटू नये.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोलाPoliticsराजकारण