शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

विदर्भातील नाट्यचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:25 IST

५८ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या व अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संजय भाकरे फाऊंडेशनच्या ‘अनिमा’ या नाटकाच्या निमित्ताने संजय भाकरे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्पर्धेसाठी त्यांच्या संस्थेकडून निर्मिती झालेलं हे ३०-३५ वे नाटक. गेल्या ४० वर्षांपासून नाट्य क्षेत्राच्या सेवेत वाहून घेतलेल्या संजय भाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून एकांकिका व नाटकांसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांनी नागपूरच्या भूमीतून विदर्भात स्वतंत्र नाट्यचळवळ उभी झाली आहे.

ठळक मुद्देसंजय भाकरे : ४० वर्षांपासून नाट्य क्षेत्राच्या सेवेत

५८ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या व अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संजय भाकरे फाऊंडेशनच्या ‘अनिमा’ या नाटकाच्या निमित्ताने संजय भाकरे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्पर्धेसाठी त्यांच्या संस्थेकडून निर्मिती झालेलं हे ३०-३५ वे नाटक. गेल्या ४० वर्षांपासून नाट्य क्षेत्राच्या सेवेत वाहून घेतलेल्या संजय भाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून एकांकिका व नाटकांसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांनी नागपूरच्या भूमीतून विदर्भात स्वतंत्र नाट्यचळवळ उभी झाली आहे.घोटभर पाणी, केस नं. ९९, मृगाचा पाऊस, बाप हा बापच असतो अशा गाजलेल्या एकांकिका व नाटकांचे दिग्दर्शन व अभिनय करणाऱ्या संजय भाकरे यांनी अनेक अडचणींना पार करून आतापर्यंत जवळपास ३० ते ३५ नाटक व ६० च्या वर एकांकिका बसविल्या व सादर केल्या. या सर्व प्रयोगाच्या माध्यमातून १३५ च्या वर नव्या कलावंतांना घडविण्याचे कार्य निश्चितच दखल घेण्यासारखे आहे. त्यांच्या अभिनय कलेची पहिली रसिक असलेल्या आजीच्या कौतुकाने रंगभूमीवर उभ्या राहिलेल्या या कलावंताने अनेक उतार चढाव पाहिले आहेत. मात्र तरुण कलावंतांना संधी मिळावी म्हणून नाट्य चळवळ रुजविण्यासाठी घेतलेले प्रामाणिक परिश्रम महत्त्वाचे ठरले.सुरुवातीचे सात ते आठ वर्षे वडील मधुकर भाकरे यांच्या आकाशवाणीच्या टीमसह बालनाट्यात सहभाग घेतल्याने वाचिक अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले. ही आवड वाढत गेली. शालेय व महाविद्यालयीन जीवनात नाटकांमधील अभिनयाद्वारे त्यांचे नाव चर्चेत आले. त्यांनतर गजानन पांडे यांच्या कंपनीद्वारे निर्मित विविध नाटकातून अभिनय व दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत वेगळी ओळख निर्माण झाली. त्यावेळी केलेल्या घोटभर पाणी या एकांकिकेला बहुतेक स्पर्धामधील पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळाली. पुढे मित्रांना घेऊन उभ्या राहिलेल्या तन्मय संस्थेद्वारे अनेक नाटके सादर केली. २०१४ साली सुरू झाला तो संजय भाकरे फाऊंडेशनचा प्रवास. नवोदित कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून द्यावा, नागपूर व बाहेरच्या ज्येष्ठ दिग्दर्शकांचे मार्गदर्शन त्यांना मिळावे आणि शिबिरासारखे भाषण ठेवण्यापेक्षा एकांकिकांच्या माध्यमातून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करावा यासाठी दर महिन्याला एक एकांकिका बसवायची व ती सादर करायची, हा नित्यक्रम त्यांनी चालवला. मृगाचा पाऊस, हॉफ पॅन्ट, चिमणीचं मत कुणाला?, तळ्यात मळ्यात, ओनामा, प्रश्नचिन्ह, बॉम्ब ए मेरी जान, पिद्दी, इंदूचे घर अशा एकांकिकांचे प्रयोग केले. विशेष म्हणजे या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्साही गर्दी केली. फाऊंडेशनद्वारे राज्यस्पर्धांसाठी दरवर्षी नाटकांची निर्मिती होऊ लागली आणि अनेक कलावंत जुळत गेले. याद्वारे राज्यभरातील नामवंत दिग्दर्शकांचे मार्गदर्शन विदर्भातील कलावंतांना मिळायला लागले आहे. अनेकांच्या सहकार्याने संजय भाकरे फाऊंडेशन नाट्य चळवळीप्रमाणे उभी राहिली. आतापर्यंत ४० हून अधिक एकांकिका व काही नाटकांची निर्मिती फाऊंडेशनने केली. रसिकांची दाद, अनेक पुरस्कार आणि महत्त्वाचे म्हणजे नाटकाचे व्यासपीठ नागपुरात व पर्यायाने विदर्भात निर्माण करण्याचे काम संजय भाकरे फाऊंडेशनने केले आहे. सोबतच ७५०० च्यावर नाटकांच्या संहिता फाऊंडेशनच्या लायब्ररीत सुरक्षित असल्याचे संजय भाकरे यांनी सांगितले. रंगभूमीची आवड असलेल्या तरुणांना नाट्यक्षेत्राशी जोडण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न फाऊंडेशनच्या माध्यमातून होत आहे. आर्थिक पाठबळ नसताना नोकरी सांभाळून रंगदेवतेच्या सेवेत राबणाऱ्या संजय भाकरे यांच्या नेतृत्वात ही नाट्य चळवळ जोमाने पुढे सरकत आहे. झारीतील शुक्राचार्यही मिळाले, पण मित्रांच्या भक्कम आधाराने हे थांबले नसल्याची कृतज्ञता त्यांनी नावासह व्यक्त केली.निशांत वानखेडे

टॅग्स :NatakनाटकVidarbhaविदर्भ