शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

शेतकऱ्यांच्या मदतीला ध्वनियंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 6:01 AM

वन्य प्राण्यांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुमारे ४० टक्के घट येते. प्राणी, पक्ष्यांना कोणताही त्रास न होता, त्यांनी पिकांपासून दूर राहावे यासाठी डाॅ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक ध्वनियंत्र विकसित केले आहे.

ठळक मुद्देअकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वन्यप्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी साैर ऊर्जा प्रचलित अल्ट्रा ध्वनिलहरी यंत्र विकसित केले आहे.

- राजरत्न सिरसाट

शेती, निसर्ग, पावसावर अवलंबून... पण दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवेळी पाऊस, पावसातील मोठा खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल, बाजारभावातील चढ-उतार अशा असंख्य प्रकारचा सामना करीत असताना वन्यप्राण्यांचा वाढलेला वावर आणि पिकांच्या हाेणाऱ्या अपरिमित हानीने शेतकऱ्यांच्या संकटात भर घातली आहे. हिंस्र पशूंनी थेट शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटनाही घडत आहेत. या वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी ३० ते ४० टक्के पिकांचे नुकसान हाेत असल्याचे संशाेधनातून समाेर आले़ मुख्यत: हरिण आणि रानडुकरांमुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान हाेत आहे.

राज्यात कापूस, साेयाबीन, ऊस, फळे व पालेभाज्यांचे पीक माेठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात राबतात; परंतु रात्री रानडुक्कर, हरिण, रोही, नीलगाय, माकड यासारखे प्राणी पिकांची नासाडी करतात. पिकांची नासाडी होऊ नये यासाठी शेतकरी विविध क्लृप्त्या, प्रयाेग करून वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्याचा प्रयत्न करतात; परंतु आजवर त्यांना त्यावर ठोस उपाय सापडला नव्हता.

अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर अभ्यास करून वन्यप्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी साैर ऊर्जा प्रचलित अल्ट्रा ध्वनिलहरी यंत्र विकसित केले आहे. या यंत्रातून निघणाऱ्या ध्वनीलहरी वन्यप्राणी व पक्ष्यांना त्रासदायक ठरतात. त्यामुळे पक्षी शेतात येत नसल्याचा दावा यंत्र विकसित करणारे शास्त्रज्ञ डाॅ. विवेक खांबलकर यांनी केला आहे. या यंत्रापासून प्राण्यांना काेणतीही इजा न हाेता पिकांचे नुकसान टाळता येते. लवकरच हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे डाॅ. खांबलकर यांचे म्हणणे आहे. कुलगुरू डाॅ. व्ही. एम. भाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे यंत्र विकसित करण्यात आले आहे.

काय आहे या यंत्रात?

-साैर ऊर्जा यंत्रातील बॅटरीत साठविली जाते. बॅटरीतील ही ऊर्जा मायक्राे कंट्राेलर ८०५१ ला पुरविण्यात येते. या मायक्राेकंट्राेलला पीआयआर सेन्सर, रिले सर्किट व अल्ट्रा ध्वनिलहरी जाेडण्यात आल्या आहेत.

-७ ते ८ मीटरपर्यंत काही हालचाल जाणवल्यास पीआयआर सेन्सर लगेच कार्यान्वित हाेतो व ध्वनिलहरी साेडतो.

-अल्ट्रा ध्वनिलहरीचा आवाज २० मीटरपर्यंत जातो. या यंत्रामुळे प्राणी, पक्ष्यांना कुठल्याही प्रकारची इजा हाेत नाही. अल्ट्राध्वनी लहरींमुळे ते शेातातून पळ काढतात़

हे यंत्र बनिवयासाठी १० वॅट साैर पॅनल १२ व्ही बॅटरी, मायक्राे कंट्राेलर ८०५१ चा वापर करण्यात आला आहे़

- प्राणी व पक्ष्यांमुळे हाेणारे नुकसान या यंत्रामुळे कमी हाेईल़ ही यंत्रे अधिक प्रमाणात बनविण्यासाठी एखाद्या उद्याेगासाेबत सामंजस्य करार विद्यापीठातर्फे केला जाणार आहे़ शेतकऱ्यांना माफक दरात ही यंत्रे उपलब्ध व्हावीत, असा कृषी विद्यापीठाचा उद्देश आहे़

वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करयासाठीची पारंपरिक तंत्रे

-विजेच्या तारांचे कुंपण.

- रंगीत साड्या शेताच्या धुऱ्यावर बांधणे.

- शेतात बुजगावणे लावणे.

- गावठी डुकरांची विष्ठा पसरविणे.

- मानवी केसांचा श्वासरोधक म्हणून वापर.

- आवाज निर्मिती.

- श्वानांचा वापर.

-वाळलेल्या शेणाच्या गौऱ्या जाळणे.

-शेतात पिकांचे रक्षण करण्यासाठी मावचा बांधणे व रात्रभर शेतातच थांबणे.

(मुख्य उपसंपादक, लाेकमत, अकाेला)