शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा प्रश्न गंभीर; सरकारी मदत देऊ शकते आधार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 15:49 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत या कोरोना एकल महिलांचा प्रश्न प्राधान्याने विचार करावा असाच आहे.

एखाद्या युद्धानंतर, भूकंपानंतर त्या देशात पुनर्वसनाचे जितके गंभीर प्रश्न उभे राहतात, तितकेच गंभीर प्रश्न कोरोनाची लाट ओसरल्यानंतर निर्माण झाले आहेत. ज्या कुटुंबात ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांचे मृत्यू झाले आहेत अशा कुटुंबातील महिला व मुलांच्या जगण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. लँसेट मासिकाने जगातील २१ देशात जो अभ्यास केला त्यात ११ लाख मुले अनाथ झाल्याचे आढळले. त्यात भारताचा क्रमांक तिसरा. भारतात १,१६००० मुले अनाथ झाली आहेत. त्यात ९१००० पुरुषांचे मृत्यू झाल्याचे हा अहवाल सांगतो. महाराष्ट्रातील झालेल्या मृत्यूंची संख्या देशातील मृत्यूंच्या एक तृतीयांश असल्याने हे मृत्यूही एक तृतीयांश पुरुषांचे धरावे लागतील. ही संख्या ३०,०००च्या जवळपास होते.

महाराष्ट्रात वयोगटानुसार २१ ते ५० वयोगटातील मृत्यू २२ टक्के आहेत व झालेल्या मृत्यूत ६० टक्के मृत्यू हे पुरुषांचे आहेत. त्यामुळे राज्यातील मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले तरी ती संख्या ही याच्या जवळपास जाते. थोडक्यात २० ते ३० हजार गरजू कुटुंबांच्या पुनर्वसनाचा आणि कोरोना विधवांचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या शहरी भागातील सुशिक्षित नोकरी करणाऱ्या महिलेचे विधवा होणे आणि फारसे शिक्षण नसताना घराबाहेर फार न पडलेल्या व कोणतेही विशेष कौशल्य हाती नसलेल्या कमी वयाच्या ग्रामीण भागातील विधवेचे जगणे यात खूप अंतर असते. कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत या कोरोना एकल महिलांचा प्रश्न प्राधान्याने विचार करावा असाच आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी काही पोस्ट लिहिल्या व संवेदनशील व्यक्ती व संस्थांना आवाहन केले. सुदैवाने त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १५० पेक्षा जास्त संस्थांनी आम्ही काम करू इच्छितो असे कळविले. २२ जिल्ह्यात १२० तालुक्यात ‘महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’ आम्ही स्थापन केली असून या समितीच्या मार्फत त्या-त्या तालुक्यात या महिलांची संख्या नक्की करणे, सर्वेक्षण करणे, त्यांना शासकीय योजना मिळवून देणे आणि त्याच बरोबर व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न करणे अशी कामे करतो आहोत. या समितीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना १४०० इमेल केले. २२ जिल्हाधिकारी व १२० तहसीलदार यांना भेटून आम्ही निवेदन दिले. शासनाशीही संवाद सुरू आहे.

शासनाने या महिलांसाठी धोरण जाहीर करावे असा प्रयत्न करीत आहोत. या महिलांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची गरज आहे. आसाम सरकारने अडीच लाख रुपये या महिलांना जाहीर केले. राजस्थान सरकार व केंद्र सरकारने एक लाख रुपयांची मदत दिली. दिल्ली सरकारने पन्नास हजारांची मदत जाहीर केली, तर बिहार व ओरिसाने पेन्शनची घोषणा केली. इतर राज्ये जर या महिलांबाबत विचार करीत असतील तर महाराष्ट्रासारख्या अशा महिलांसाठी सामाजिक कामाची शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असताना सरकारने त्वरित कृती करायला हवी.

काय करायला हवे?

१. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती व त्या विविध योजनेत या महिलांना प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे. अंत्योदय योजनेत समावेश करणे, १५ व्या वित्त आयोगातून गावपातळीवर येणारा निधी या महिलांसाठी खर्च करणे, वेगवेगळ्या नोकरी भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम देणे अशा विविध प्रकारे शासन मदत करू शकते.

२. सासरच्या मालमत्तेवर त्यांचा अधिकार शाबूत राहील याकडे लक्ष-मदत आवश्यक.

३. कौशल्य विकास मंडळाच्यावतीने सर्वेक्षण करून यांच्या गरजा व कौशल्य यांचा अभ्यास करून त्यांना त्याप्रकारचे प्रशिक्षण देणे, बँकेचा कमी व्याजदराचा पतपुरवठा करणे आणि त्याचबरोबर विक्रीच्या व्यवस्थेला मदत करणे अशी रचना करायला हवी. जवळच्या बचत गटाशी जोडून देणे.

४. कोरोना विधवांचे पुनर्वसन हा आपल्या सामाजिक संस्थांच्या आणि महिला संघटनांच्या प्राधान्याचा विषय व्हायला हवा.

हेरंब कुलकर्णी

राज्य निमंत्रक, महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीherambkulkarni1971@gmail.com

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतDeathमृत्यूWomenमहिला