शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

‘भारत माता की जय!’ कसाब म्हणाला; पण समाधान झाले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 1:04 PM

26/11 Terror Attack: हल्ल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनंतर. दिनेश कदम आणि मी त्याची चौकशी करत होतो. त्याचा सहकारी इस्माइल जखमी झाल्याचे त्याला माहीत होते; पण तो मेल्याचे माहीत नव्हते. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचा उद्धटपणा मला सहन होईनासा झाला.

- राकेश मारिया(माजी पाेलिस आयुक्त, मुंबई)हल्ल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनंतर. दिनेश कदम आणि मी त्याची चौकशी करत होतो. त्याचा सहकारी इस्माइल जखमी झाल्याचे त्याला माहीत होते; पण तो मेल्याचे माहीत नव्हते. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचा उद्धटपणा मला सहन होईनासा झाला.

‘चल माझ्याबरोबर. ऊठ,’ असे म्हणून मी उभा राहिलो. बाकीचे अवाक् झाले होते. ‘कुठे?’ त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला विचारत होते. पहाटेचे ३:३० वाजले होते. मी दिनेश कदमला एका बाजूला घेतले, आणि मला कुठे जायचे आहे ते त्याला सांगितले. त्याने वाहनांची व्यवस्था केली. काही मिनिटांतच, आमची फौज जे.जे. रुग्णालयाच्या शवागाराच्या दिशेने निघाली. कसाबला एका वाहनात सुरक्षितपणे ठेवलेले होते. जिथे त्याचे नऊ सहकारी फ्रीझरमध्ये चिरनिद्रा घेत होते, ती जन्नत. ‘ये देख! ये हैं तेरे जिहादी दोस्त जो जन्नत में हैं.’ मी म्हणालो. तो आ वासून बघतच राहिला.

तो वास असह्य आणि पोट ढवळून काढणारा होता. ते चेहरे भयंकर दिसत होते. एका अतिरेक्याच्या डोळ्यात बंदुकीची गोळी घुसली होती. काही जण फार वाईट रीतीने भाजले होते, आणि जळलेल्या मांसाचा उग्र दर्प हवेत भरून राहिला होता. ‘काय म्हणतात तुझे उस्ताद? सुगंध, हं? तेज? कुठे आहे सुगंध? कुठे आहे तेज? हा सुगंध आहे? हे तेज आहे?’ मी त्याला विचारत राहिलो. त्याच्याकडे उत्तर नव्हते. ‘जर तुझे उस्ताद म्हणतात की, जिहादमध्ये आलेला मृत्यू तुम्हाला जन्नतमध्ये घेऊन जातो, आणि तुमची शरीरे प्रकाशमान होतात आणि त्यातून सुगंध येतो, आणि पऱ्या तुमच्या सेवेला हजर असतात, तर ते स्वत: जाऊन जिहादमध्ये का मरत नाहीत? तुम्हाला का पाठवतात ते? कारण त्यांना इथल्या नरकाची मजा लुटायची असते म्हणून? त्यांना जन्नतमध्ये जाण्यात रस नसतो वाटतं?’ मी त्याला विचारले. त्याचा चेहरा पिळवटला, पांढराफटक पडला. उलटी होत असल्याप्रमाणे दोन्ही हातांनी पोट धरून तो जमिनीवर बसला.

आम्ही जेव्हा शवागारातून बाहेर पडलो, तेव्हा तो पूर्णपणे भांबावून गेल्याचे आणि त्याला धक्का बसला असल्याचे दिसत होते. फसवला गेलेला. भ्रमनिरास झालेला. आता मला जरा हलके वाटले. हिंदीत म्हणतात त्याप्रमाणे, मेरी भड़ास बाहर निकल चुकी थी.

आमची फौज मेट्रो जंक्शनवर आली. काही दिवसांपूर्वीच या नराधमाने जिथे माझ्या प्रिय सहकाऱ्यांना आणि निरपराध शहरवासी बांधवांना ठार करत मृत्यूचे थैमान घातले होते, तोच पट्टा. माझ्यात पुन्हा काय संचारले माहीत नाही. मी सगळ्यांना थांबवले आणि माझ्या गाडीतून खाली उतरलो. त्यांना कसाबला बाहेर आणायला सांगितले. पहाटेचे ४:३० झाले असावेत. ‘खाली वाक आणि जमिनीवर डोके टेक’, मी कसाबला हुकूम केला. त्याने घाबरून निमूटपणे माझ्या आदेशाचे पालन केले. 

आता म्हण, ‘भारत माता की जय’ मी आज्ञा केली. ‘भारत माता की जय!’ कसाब म्हणाला. एका वेळेने समाधान झाले नाही, म्हणून मी त्याला आणखी एकदा म्हणायला लावले.(‘लेट मी से इट नाऊ’ या राकेश मारिया यांच्या पुस्तकातून साभार)

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाRakesh Mariaराकेश मारिया