शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

बास्स करा की, किती मेंदू चावाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 13:34 IST

जगात ५१६ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकांच्या हाती इंटरनेटचे जाळे आहे. यातील ९२ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात. ४७६ कोटी लोक सोशल मीडियावर आहेत. 

- पवन देशपांडे(सहायक संपादक)तुम्हाला माहितेय?जगात ५१६ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकांच्या हाती इंटरनेटचे जाळे आहे. यातील ९२ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात. ४७६ कोटी लोक सोशल मीडियावर आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन ?नवीन हेच की, हे सगळे ४७६ कोटी लोक रोजचे ५ ते ७ तास इंटरनेटवर घालवत आहेत आणि त्यातील प्रत्येकच गोष्ट कामाची असते अशातला भाग नाही. असते का ? विचार करा...गेल्या वर्षभरात मोबाइल हातात घेऊन डोळ्यांना ताण देण्याच्या वेळेत सात मिनिटांनी वाढ झाली आहे. म्हणजे समजा तुम्ही गेल्या वर्षी सरासरी ५० मिनिटे दिवसभरात मोबाइल पाहत असाल तर आता तो वेळ ५७ मिनिटांवर गेला आहे. थोडक्यात स्क्रीन टाइम वाढला आहे. दिवसातले पाच ते सात तास गॅजेट्सवर जात असतील तर आपला वेळ वाया जातोय की काही प्रॉडक्टिव्ह गोष्ट करण्यासाठी उपयोगी पडतोय, याचा विचार सुरू झालाय. त्यामुळेच ‘डिजिटल फास्टिंग’ हा ट्रेंड रुजू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात याचा उल्लेख केला होता. उपवास करताना जसे आपण विशिष्ट अन्न घेत नाही, तसेच एक दिवस गॅजेट्सला सुटी द्यायची. डोळ्यांना, बोटांना आणि मेंदूलाही आराम द्यायचा. काहीजण काही तासांसाठी डिजिटल फास्टिंग करतात तर काही दिवसभरासाठी. काही आठवड्यातून एक दिवस करतात तर काही महिन्यातून एक दिवस. आपल्याकडे जसे विविध व्रत आहेत, तसेच या डिजिटल फास्टिंगचे व्रतही आपण करू शकतो. म्हणजेच प्रत्येक आठवड्याच्या अमूक दिवशी मी इतका तास मोबाइल पाहणार नाही, गॅजेट्सना हात लावणार नाही. करू शकाल तुम्ही हा उपवास ?बास्स करा की, किती मेंदू चावाल? थोडा डिजिटली उपवास करा... डोक्याचा ताण कमी करा...होईल का तुम्हाला हे शक्य ?दिवसातील पाच ते सात तास आपण मोबाईलवर असतो. हे मोबाईलवेड कामाचे की बिनकामाचे हे ठरवून थोडं शहाण्यासारखं वागावं लागेल...कसा कराल हा उपवास ?उपवास करताना जसे आपण विशिष्ट अन्न घेत नाही, तसेच एक दिवस गॅजेट्सला सुटी द्यायची. डोळ्यांना, बोटांना आणि मेंदूलाही आराम द्यायचा.

फायदे काय आणि कुठे ?धावेल डोकं...एखादी गोष्ट करत असताना मधेच मेसेजची टोन वाजते अन् लक्ष विचलित होते. फोन येतो आणि त्यात १०-१५ मिनिटे जातात. सोशल मीडियाचे नोटिफिकेशन येते आणि ते बघता बघता इतरही अनावश्यक गोष्टी चाळण्यात वेळ खर्ची पडतो. हातातील काम मागे राहते. हेच जर फोन बंद असता तर झाले नसते. थोडा वेळासाठी फोकस हलला नसता आणि डोकं धावायला लागले असते. चित्त थाऱ्यावर...कुणाशी चर्चा करताना मोबाइलमध्ये डोकावण्याची वाईट सवयही अनेकांना असते. अनेकांना तर मीटिंगमध्येही असे करावे वाटते. फोन घुरघुरतो आणि कुणाचा मेसेज किंवा फोन असेल याकडे लक्ष लागून राहते. मीटिंगमधला किंवा चर्चेत मन राहत नाही. चित्त थाऱ्यावर ठेवायचे असेल तर थोडा वेळ का होईना मोबाइलपासून लांब राहायची सवय लावावी लागेल. शांतता लाभेल...फोनपासून थोडावेळ दूर राहिल्याने मोकळा श्वास घेऊ शकाल. सतत फोनमध्ये राहिल्याने वाढणारा स्ट्रेस आणि अस्वस्थता कमी होईल. त्यातून शांतता लाभेल.निवांत झोपझोपण्याआधी मोबाइल पाहिल्याने डोळ्यांवर तर परिणाम होतो. झोप उडते. त्यामुळे चक्रच बदलले आणि आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागतो. 

टॅग्स :Mumbaiमुंबई