शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

बालरंगभूमी परिषद ... हक्काचे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:25 IST

संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला या सर्व कला मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. याशिवाय मानवी जीवनाची परिपूर्तता होणे अशक्य आहे. मूल जन्मत:च निरीक्षणाला सुरुवात करते. त्यातूनच ते विविध गोष्टी आत्मसात करते.

संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला या सर्व कला मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. याशिवाय मानवी जीवनाची परिपूर्तता होणे अशक्य आहे. मूल जन्मत:च निरीक्षणाला सुरुवात करते. त्यातूनच ते विविध गोष्टी आत्मसात करते. लहान मूल ते बघतं त्याचं अनुकरण करतं. हा त्याचा नाट्यकलेचा पहिला धडा असतो. यातूनच त्याचे अनुभवविश्व प्रगल्भ होण्यास सुरुवात होते. हे अनुभवविश्व प्रगल्भ करताना आणि त्यात रंग भरताना बालक नाट्यकला शिकतो. त्यासाठी त्याला वेगळे शिक्षण देण्याची गरज नसते.कलेमार्फत बालकांचा भावनिक विकास तर क्रीडेमार्फत शारीरिक विकास होतो. या दोन गोष्टी बालकांचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी आवश्यक असतात. पण आज दुर्दैवाने आमच्या शालेय अभ्यासक्रमातून त्या दुर्लक्षित झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास व्हावा, त्यांना विविध स्पर्धेत सहभागी होता यावे, समाजात वावरताना येणाऱ्या अनेक संकटांचा धैर्याने सामना करण्याची हिंमत यावी, एक उत्तम व्यासपीठ त्यांना मिळावे या उद्देशाने नागपुरात नव्यानेच बालरंगभूमी परिषदेची स्थापना करण्यात आली. ही संस्था अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था आहे.बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा मधुराताई गडकरी यांनी स्वीकारली. तर लहान मुलांमध्ये समरस होऊन गेल्या १५ ते २० वर्षांपासून उत्साहाने कार्य करणारे रोशन नंदवंशी हे या रंगभूमीला प्रमुख कार्यवाह म्हणून लाभले. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत अनेक मंडळी या परिषदेशी जुळली गेली. संजय रहाटे, आभा मेघे, संजय वलिवकर, संजय भरडे, अ‍ॅड. रमण सेनाड, विलास कुबडे, अमोल निंबर्ते, वैदेही सोईतकर, रश्मी फडणवीस, नितीन पात्रीकर, राजेश रोडे, योगेश राऊत, स्रेहल जोशी, संजय गायकवाड आणि अनेक शाळांचे प्रतिनिधी यांचा येथे प्रामुख्याने उल्लेख करता येईल.मुलांच्या शिक्षणाचा हक्क या कायद्यात प्रत्येक प्राथमिक (१ ते ८) या वर्गासाठी कला, क्रीडा आणि संगीत शिक्षक (दीडशे मुलांमागे अर्धवेळ) असणे अत्यावश्यक आहे. पण गेल्या दहा वर्षात राज्य शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. आतापर्यंत चित्रकला, लोककला, खेळ, संगीत याकरिता वेगळे गुण दिल्या जायचे. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रवेश प्रक्रियेत पाच टक्के जागा आरक्षित होत्या. त्या विविध कलांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्राधान्य दिल्या जात असे. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाºया विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित आहेत. त्यामुळे काहीच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. स्पर्धेच्या या युगात विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. परीक्षेत जास्त गुण कोण मिळविणार या एकाच निकषावर पालक आणि विद्यार्थ्यांनी कलेकडे पाठ फिरविली आहे आणि शालेय जीवनात विविध कला आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शक उपलब्ध नाहीत. शासनाने दाखवलेल्या या अनास्थेपायी चांगले कलाकार, क्रीडापटू होणे दुरापास्त झाले आहे.याचा संपूर्ण विचार करून बालरंगभूमी परिषदेने आपल्या कार्याला सुरुवात केली असून याअंतर्गत आंतरशालेय बालचित्रकला स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पार पडली. यामध्ये नागपूर शहर आणि जिल्ह्यातील जिल्हापरिषद, महानगरपालिकांच्या ५२ शाळांमधील ७,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गेल्या आठवड्यात एक दिवसीय बालनाट्य महोत्सव घेण्यात आला. भविष्यातही अशा प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे बाल कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

  • सीमा रवींद्र फडणवीस
टॅग्स :Natakनाटक