शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

मानवतेला एकत्र आणणारी चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 09:13 IST

संपूर्ण चराचर सृष्टी मातीपासून बनली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा -हास होत आहे.

संपूर्ण चराचर सृष्टी मातीपासून बनली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा -हास होत आहे. जैवविविधता टिकवून सृष्टी जगवायची असेल तर जागतिक पातळीवर -हास होत असलेल्या मातीच्या संरक्षणासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत आपल्याला तशी संधीही मिळणार नाही. यासाठीच 'सेव्ह सॉइल' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. २७ देशांच्या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. माती वाचवा चळवळ मानवतेला एकत्र आणत आहे.

पर्यावरणीय बदलांचे धोके आज आपल्यासमोर येत आहेत. प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचा परिणाम हा मातीच्या आरोग्यावर होतो. हे काम आपल्याला करायचे आहे. वसुंधरा ही आपलीच नव्हे तर प्रत्येक प्राणिमात्राची जननी आहे. पण मनुष्याची हुशारीच संपूर्ण सृष्टीच्या अधोगतीस कारणीभूत ठरत आहे. मातीचा न्हास करण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत. मात्र, एक इंच माती निर्माण करायची झाली तरी हजारो वर्षे लागतात. जागतिक पातळीवर विचार केला तर आपण आताच जमिनीवरील तब्बल १८ इंच माती नष्ट केली आहे. त्याचे परिणाम आज समोर येत आहेत. मात्र, भावी पिढीसाठी हे परिणाम आणखी भयानक असतील. लोकसंख्या सतत वाढत आहे. अन्नाची कमतरता निर्माण होण्याचा धोका आहे. अन्न हे फक्त शेतीतून मिळते. मंगळ आणि चंद्रावरून अन्न येणार नाही. त्यासाठी पृथ्वीवरील माती वाचलीच पाहिजे. त्यामुळे माती संवर्धनाशिवाय पर्याय नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

माती संवर्धन म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मातीमध्ये कमीत कमी ३ टक्के सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. यासाठी प्रत्येक माणसाने आपला वाटा उचलला पाहिजे. शेती, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे मातीचा -हास होत आहे. जागतिक स्तरावर ५२ टक्के शेतजमीन आधीच निकृष्ट आहे. जर मातीचा -हास असाच सुरू राहिला तर जीवनाचाच अंत होईल. आज संपूर्ण जगातील शेतीसमोरील संकट म्हणजे रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. यामुळे शेतीवरील खर्च वाढत आहे. मात्र, शेतातील माती समृद्ध झाली तर रसायने आणि खतांचा वापर कमी होईल. जगातील आठ अब्ज लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर झालाच पाहिजे, असा युक्तिवाद काही जण करतात. मी स्पष्ट करू इच्छितो की माझा रासायनिक खतांना पूर्ण विरोध आहे असे नाही; पण तुमची जमीन समृद्ध असेल, त्यातील सेंद्रिय सामग्री १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढवता आली तर रासायनिक खतांशिवाय अन्न उत्पादन वाढविणेही शक्य होईल. आम्ही प्रयोगाने हे सिद्धही केले आहे.

जगातील २६ देशांमध्ये प्रवास करून आता भारतात ही मोहीम पोहोचली आहे. या प्रवासात प्रत्येकजण माझ्याबरोबर चालत आहे. याचे कारण माती ही मानवी जीवनाचा स्त्रोत आहे. माती संवर्धनामध्ये सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. माती वाचविण्यासाठी विशेष धोरण आखले पाहिजे. त्यामध्ये शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवायला हवे. जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे माझे प्रत्येकाला आवाहन आहे की, माती संवर्धनासाठीचा आवाज बुलंद करा. जगातील प्रत्येक सरकार मातीच्या संवर्धनासाठी धोरण करत नाही तोपर्यंत यावर बोलत राहा. तुमच्याकडे ही शक्ती आहे. कारण लोकशक्ती हीच खरी शक्ती असते.

- सद्गुरुसंस्थापक, ईशा फाऊंडेशन

टॅग्स :Earthपृथ्वी