शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मानवतेला एकत्र आणणारी चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 09:13 IST

संपूर्ण चराचर सृष्टी मातीपासून बनली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा -हास होत आहे.

संपूर्ण चराचर सृष्टी मातीपासून बनली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा -हास होत आहे. जैवविविधता टिकवून सृष्टी जगवायची असेल तर जागतिक पातळीवर -हास होत असलेल्या मातीच्या संरक्षणासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत आपल्याला तशी संधीही मिळणार नाही. यासाठीच 'सेव्ह सॉइल' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. २७ देशांच्या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. माती वाचवा चळवळ मानवतेला एकत्र आणत आहे.

पर्यावरणीय बदलांचे धोके आज आपल्यासमोर येत आहेत. प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचा परिणाम हा मातीच्या आरोग्यावर होतो. हे काम आपल्याला करायचे आहे. वसुंधरा ही आपलीच नव्हे तर प्रत्येक प्राणिमात्राची जननी आहे. पण मनुष्याची हुशारीच संपूर्ण सृष्टीच्या अधोगतीस कारणीभूत ठरत आहे. मातीचा न्हास करण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत. मात्र, एक इंच माती निर्माण करायची झाली तरी हजारो वर्षे लागतात. जागतिक पातळीवर विचार केला तर आपण आताच जमिनीवरील तब्बल १८ इंच माती नष्ट केली आहे. त्याचे परिणाम आज समोर येत आहेत. मात्र, भावी पिढीसाठी हे परिणाम आणखी भयानक असतील. लोकसंख्या सतत वाढत आहे. अन्नाची कमतरता निर्माण होण्याचा धोका आहे. अन्न हे फक्त शेतीतून मिळते. मंगळ आणि चंद्रावरून अन्न येणार नाही. त्यासाठी पृथ्वीवरील माती वाचलीच पाहिजे. त्यामुळे माती संवर्धनाशिवाय पर्याय नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

माती संवर्धन म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मातीमध्ये कमीत कमी ३ टक्के सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. यासाठी प्रत्येक माणसाने आपला वाटा उचलला पाहिजे. शेती, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे मातीचा -हास होत आहे. जागतिक स्तरावर ५२ टक्के शेतजमीन आधीच निकृष्ट आहे. जर मातीचा -हास असाच सुरू राहिला तर जीवनाचाच अंत होईल. आज संपूर्ण जगातील शेतीसमोरील संकट म्हणजे रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. यामुळे शेतीवरील खर्च वाढत आहे. मात्र, शेतातील माती समृद्ध झाली तर रसायने आणि खतांचा वापर कमी होईल. जगातील आठ अब्ज लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर झालाच पाहिजे, असा युक्तिवाद काही जण करतात. मी स्पष्ट करू इच्छितो की माझा रासायनिक खतांना पूर्ण विरोध आहे असे नाही; पण तुमची जमीन समृद्ध असेल, त्यातील सेंद्रिय सामग्री १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढवता आली तर रासायनिक खतांशिवाय अन्न उत्पादन वाढविणेही शक्य होईल. आम्ही प्रयोगाने हे सिद्धही केले आहे.

जगातील २६ देशांमध्ये प्रवास करून आता भारतात ही मोहीम पोहोचली आहे. या प्रवासात प्रत्येकजण माझ्याबरोबर चालत आहे. याचे कारण माती ही मानवी जीवनाचा स्त्रोत आहे. माती संवर्धनामध्ये सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. माती वाचविण्यासाठी विशेष धोरण आखले पाहिजे. त्यामध्ये शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवायला हवे. जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे माझे प्रत्येकाला आवाहन आहे की, माती संवर्धनासाठीचा आवाज बुलंद करा. जगातील प्रत्येक सरकार मातीच्या संवर्धनासाठी धोरण करत नाही तोपर्यंत यावर बोलत राहा. तुमच्याकडे ही शक्ती आहे. कारण लोकशक्ती हीच खरी शक्ती असते.

- सद्गुरुसंस्थापक, ईशा फाऊंडेशन

टॅग्स :Earthपृथ्वी