शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेला एकत्र आणणारी चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 09:13 IST

संपूर्ण चराचर सृष्टी मातीपासून बनली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा -हास होत आहे.

संपूर्ण चराचर सृष्टी मातीपासून बनली आहे. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा -हास होत आहे. जैवविविधता टिकवून सृष्टी जगवायची असेल तर जागतिक पातळीवर -हास होत असलेल्या मातीच्या संरक्षणासाठी आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत आपल्याला तशी संधीही मिळणार नाही. यासाठीच 'सेव्ह सॉइल' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. २७ देशांच्या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. माती वाचवा चळवळ मानवतेला एकत्र आणत आहे.

पर्यावरणीय बदलांचे धोके आज आपल्यासमोर येत आहेत. प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचा परिणाम हा मातीच्या आरोग्यावर होतो. हे काम आपल्याला करायचे आहे. वसुंधरा ही आपलीच नव्हे तर प्रत्येक प्राणिमात्राची जननी आहे. पण मनुष्याची हुशारीच संपूर्ण सृष्टीच्या अधोगतीस कारणीभूत ठरत आहे. मातीचा न्हास करण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत. मात्र, एक इंच माती निर्माण करायची झाली तरी हजारो वर्षे लागतात. जागतिक पातळीवर विचार केला तर आपण आताच जमिनीवरील तब्बल १८ इंच माती नष्ट केली आहे. त्याचे परिणाम आज समोर येत आहेत. मात्र, भावी पिढीसाठी हे परिणाम आणखी भयानक असतील. लोकसंख्या सतत वाढत आहे. अन्नाची कमतरता निर्माण होण्याचा धोका आहे. अन्न हे फक्त शेतीतून मिळते. मंगळ आणि चंद्रावरून अन्न येणार नाही. त्यासाठी पृथ्वीवरील माती वाचलीच पाहिजे. त्यामुळे माती संवर्धनाशिवाय पर्याय नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

माती संवर्धन म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मातीमध्ये कमीत कमी ३ टक्के सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. यासाठी प्रत्येक माणसाने आपला वाटा उचलला पाहिजे. शेती, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे मातीचा -हास होत आहे. जागतिक स्तरावर ५२ टक्के शेतजमीन आधीच निकृष्ट आहे. जर मातीचा -हास असाच सुरू राहिला तर जीवनाचाच अंत होईल. आज संपूर्ण जगातील शेतीसमोरील संकट म्हणजे रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. यामुळे शेतीवरील खर्च वाढत आहे. मात्र, शेतातील माती समृद्ध झाली तर रसायने आणि खतांचा वापर कमी होईल. जगातील आठ अब्ज लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर झालाच पाहिजे, असा युक्तिवाद काही जण करतात. मी स्पष्ट करू इच्छितो की माझा रासायनिक खतांना पूर्ण विरोध आहे असे नाही; पण तुमची जमीन समृद्ध असेल, त्यातील सेंद्रिय सामग्री १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढवता आली तर रासायनिक खतांशिवाय अन्न उत्पादन वाढविणेही शक्य होईल. आम्ही प्रयोगाने हे सिद्धही केले आहे.

जगातील २६ देशांमध्ये प्रवास करून आता भारतात ही मोहीम पोहोचली आहे. या प्रवासात प्रत्येकजण माझ्याबरोबर चालत आहे. याचे कारण माती ही मानवी जीवनाचा स्त्रोत आहे. माती संवर्धनामध्ये सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. माती वाचविण्यासाठी विशेष धोरण आखले पाहिजे. त्यामध्ये शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवायला हवे. जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे माझे प्रत्येकाला आवाहन आहे की, माती संवर्धनासाठीचा आवाज बुलंद करा. जगातील प्रत्येक सरकार मातीच्या संवर्धनासाठी धोरण करत नाही तोपर्यंत यावर बोलत राहा. तुमच्याकडे ही शक्ती आहे. कारण लोकशक्ती हीच खरी शक्ती असते.

- सद्गुरुसंस्थापक, ईशा फाऊंडेशन

टॅग्स :Earthपृथ्वी