शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Maharashtra Politics: “शिवसैनिकांनी खूप सहन केलं, आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय”; युवासेनेचा शिंदे गटाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 20:15 IST

दळभद्री सरकारमुळे फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला असून, राज्यातील तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली, अशी घणाघाती टीका युवासेनेकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics:  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच शिवसेनेच्या कठीण काळात साथ देणाऱ्या युवासेनेतील एका नेत्याने शिंदे गटाला पुन्हा सुनावले आहे. शिवसैनिकांनी खूप सहन केले. मात्र, आता नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय, असा स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे. 

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. सालाबादप्रमाणे यंदाही दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतीर्थावरच होणार, असा विश्वास युवा सेनेचे राज्य विस्तार प्रमुख शरद कोळी (Sharad Koli) यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कसल्याही परवानगीची गरज नसल्याचा दावाही शरद कोळी यांनी यावेळी बोलताना केला. 

शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची थोबाडे फोडू

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची थोबाडे फोडू, अशी आक्रमक भूमिका शरद कोळी यांनी घेतली. शिवसैनिकांनी आजतागायत खूप सहन केले. पण, आता सहन करणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत आहोत, असा इशारा शरद कोळी यांनी विरोधकांना दिला आहे. राज्यातील युवा सैनिकांनी व शिवसैनिकांनी मुंबईला हजर व्हायचे आहे, असे आवाहनही शरद कोळी यांनी केले आहे.

राज्यातील तरूणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे

वेदांता-फॉक्सकॉनचा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू होणार होता. पण ती कंपनी आता गुजरातमध्ये गेली आहे. यावर, एकनाथ शिंदे व विद्यमान राज्य सरकारवर जहरी टीका  करताना, दळभद्री सरकारमुळे ही कंपनी महाराष्ट्र राज्यातून गेली. राज्यातील तरूणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे, असा घणाघातही शरद कोळी यांनी केला. 

दरम्यान, टीका करणारे यापूर्वी अनेकदा मातोश्रीवर जाऊन नाक घासत आमदारकीची भीक मागत होते. आता ते टीका करतात, त्यांची लायकी आहे का? असा सवाल शरद कोळींनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना केला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरेPoliticsराजकारणSolapurसोलापूर