शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तरुण आमदार जातीपातीमुक्त नवा महाराष्ट्र घडवतील -आदित्य ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 06:12 IST

महाराष्ट्राच्या सामाजिक फाळणीचा प्रयत्न

संगमनेर (जि.अहमदनगर) : महाराष्ट्राचे चार तुकडे व चार राज्ये होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. आधी राज्याची फाळणी आणि नंतर सामाजिक फाळणीचा हा प्रयत्न होत आहे. मात्र तरुण आमदारांच्या पिढीला जातीपातीमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला़

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे चिरंजीव राजवर्धन यांच्या संकल्पनेतून संगमनेरातील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत मेधा २०२० युवा सांस्कृतिक महोत्सवाचे शुक्रवारी (दि़१७) आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे बोलत होते़ कार्यक्रमात उद्योग, खाण राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार झिशान सिद्दीकी, आमदार धीरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील हे युवा आमदार सहभागी झाले होते़

ठाकरे म्हणाले, आजोबा स्व़ बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यात कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्यामुळे अनेक सर्वसामान्यांना मुख्यमंत्री, मंत्री, महापौर ते आमदार होण्याची संधी मिळाली़ महाविकास आघाडी सरकारमधील सर्व तरुण आमदार नव्या विचारांची पेरणी करू पाहत आहेत, असे ते म्हणाले़ रोहित पवार म्हणाले, विकासात मागे पडलेला कर्जत-जामखेड मतदारसंघ आपण निवडला. या मतदारसंघात विकासाचे असे मॉडेल तयार करेल की भविष्यात कुणीही आपल्यावर घराणेशाहीचा आरोप करणार नाही़ तर महिलांना त्यांचीच खाती मिळतात हा समज महाविकास आघाडी सरकारने खोटा ठरविला. राज्यातील गड किल्ल्यांचे संरक्षण करणार असून मंत्रिपदाच्या माध्यमातून विकासाचे काम उभे करणार आहे, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

धीरज देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना चिंतामुक्त व मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परदेशात उच्च शिक्षण घेतले असले तरी शेती व मातीशी नाळ जोडलेली असल्याने पुन्हा जनतेच्या सेवेत आलो, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले़आमदार झिशान सिद्दिकी म्हणाले, जिथे मातोश्री आहे त्याच मतदारसंघातून विजयी झालो. दोन कॅबिनेटमंत्री मतदारसंघात आहेत. त्यामुळे कामाला अधिक चालना मिळेल.

प्रारंभी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रास्तविकात याच तरुण आमदारांमधून भविष्यात महाराष्ट्राला मुख्यमंत्री व मंत्री मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.‘पवार ठरवतील तेच होईल’मुख्यमंत्री म्हणून अजित पवार व सुप्रिया सुळे यापैैकी कुणाला पसंती द्याल या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी शरद पवार ठरवतील तोच निर्णय मान्य होईल, असे सांगताच राज्यातील अहंकारी विचारांचा आम्ही पराभव केला आहे, असे ते म्हणाले़

अन् आदित्य ठाकरे लाजले!कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी लग्नाच्या विषयावर छेडताच मंत्री आदित्य ठाकरे लाजले. आई रश्मी यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय सोपविल्याचे ते म्हणाले. याच प्रश्नावर मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र जोडीदार स्वत:च निवडणार असल्याचे सांगितले़

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAditi Tatkareअदिती तटकरेDhiraj Deshmukhधीरज देशमुख