शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

...त्याचे उत्तर तुम्हाला २०२६ मध्ये मिळेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 06:43 IST

राष्ट्रवादीशी युती ही कूटनीती; अधर्म नव्हे! देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या कार्यकर्ता शिबिरातून स्पष्टोक्ती 

नितीन पंडितभिवंडी : एकनाथ शिंदे, शिवसेना यांच्याशी आमची भावनिक मैत्री आहे, राष्ट्रवादीशी आमची राजकीय मैत्री आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतले हा अधर्म नक्कीच नाही. भगवान श्रीकृष्णासारखी कूटनीती ही राजकारणात वापरावीच लागते असे समर्थन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे आयोजित भाजपच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात केले. 

राज्यातील सध्याच्या राजकीय  परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी महाभारतातील श्रीकृष्णाच्या कूटनीतीचे अनेक दाखले देत आपण अधर्म करीत नसून बेईमानीला कूटनीतीने उत्तर देत आहोत. राष्ट्रवादीशी आपली आजची युती राजकीय असली तरी १५ वर्षांनी तीदेखील भावनिकच असेल असेही त्यांनी सांगितले. कधीकधी कटू वाटणारे निर्णय कूटनीती म्हणून घ्यावे लागतात, २०२४ च्या महाविजयाचे आमचे लक्ष्य आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

या शिबिराला केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ.भागवत कराड, कपिल पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय प्रभारी सी.टी.रवि, माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, हम छेडते नही, छेडा तो छोडते नहीउद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. बेईमानी केली. सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांनी घाम गाळून शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याकरिता केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विश्वासघात केला. आता ते शपथा घेत फिरत आहेत. खोटे बोलण्यापूर्वी त्यांनी पोहरादेवीची माफी मागितली असेल असा टोला त्यांनी हाणला. आम्ही दगाबाजांना धडा शिकवला. ‘हम छेडते नही, छेडा तो छोडते नही’, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

उत्तरे २०२६ मध्ये मिळतीलआपला पक्ष सध्या जी भूमिका घेत आहे त्यावरून संभ्रमित होऊ नका. २०१९ मध्ये जे झाले त्याची उत्तरे २०२३ मध्ये तुम्हाला मिळत आहेत. २०२३ मध्ये जे घडले ते का घडले याची उत्तरे २०२६ मध्ये मिळतील, असे फडणवीस यांनी म्हणताच हशा पिकला.

मित्रपक्ष ११०, भाजप १७८ जागा लढणार?सन २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप १५२ जागा जिंकेल आणि आम्ही लढविलेल्या जागांपैकी ८५ टक्के जागा जिंकू, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात केले. भाजप १७८ जागा लढणार आणि शिवसेना व राष्ट्रवादी यांना मिळून ११० जागा सोडणार असल्याचा स्पष्ट तर्क त्यातून निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र याचा निर्णय समन्वय समिती घेईल, असे शिंदे गटाचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 

महिला मंत्री करणारराज्य सरकारमध्ये भाजपची महिला मंत्री नाही ही खंत मला आहेच. अनेक सक्षम महिला आमदार असून त्यांच्यामधून मंत्रिपदाची संधी दिली जाईल असा शब्द फडणवीस यांनी दिला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा