शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

"लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, अजित पवार काय...", राजू शेट्टींचा संतापाच्या भरात तोल ढासळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:15 IST

Ajit Pawar News: राज्य सरकारवर टीका करताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे बोलताना संतापाच्या भरात संतुलन सुटले आणि त्यांनी एक विधान केले, ज्याची आता चर्चा होत आहे.

Ajit Pawar Latest News: कर्जमाफीच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जाची परतफेड करण्यास सांगितले. याच निर्णयावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अजित पवारांचा कोल्हापूर दौऱ्यातील प्रसंग सांगितला. एसी बंद पडल्यामुळे अजित पवारांना राग आला आणि जिल्हाधिकाऱ्यांवर चिडले, असे शेट्टी म्हणाले. 'एसी बंद पडला म्हणून गड्याला राग आला. काय मेला असता का अजित पवार', असे विधान राजू शेट्टींनी संतापाच्या भरात केले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

काही दिवसांपूर्वी अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी नवीन गाड्यांच्या खरेदीवरून जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले होते. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना राजू शेट्टींनी याच गोष्टीवरून अजित पवारांवर टीका केली. 

वाचा >>"जाहीरनाम्यामध्ये सांगितले, पण एकाही भाषणात नाही"; कर्जमाफीवरुन अजितदादांची स्पष्ट भूमिका

राजू शेट्टी म्हणाले, "भीती घालायला सुरूवात करा, त्याशिवाय तुमचा कर्जमाफीचा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही भीती घालायला काही तयारच नाही. मग कसं व्हायचं. तुमच्या कर्जाचे नाव काढले की अजित पवार म्हणतात राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. परवाची गोष्ट सांगतो. अजित पवार हे कोल्हापुरात आले होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ३१ मार्चच्या आतमध्ये कर्ज भरा. जसे त्यांनी ७० हजार कोटी हाणलेत, तसे आपणही हाणलेत असं त्यांना वाटतंय", अशी टीका राजू शेट्टी अजित पवारांवर केली. 

'अजित पवार काय मेले असते का?'

अजित पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यातील घटनेबद्दल राजू शेट्टी म्हणाले, "२८ तारखेला कोल्हापूरला आले होते. विमानतळावरून सोळा मिनिटात जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तेवढ्या काळात सरकारी गाडीचा एसी बंद पडला. गड्याला राग आला. कलेक्टरला म्हणाले, नवी गाडी घ्या. कलेक्टर म्हणाले, मंजुरी घ्यावी लागेल. ते म्हणाले प्रोटोकॉल बाजूला ठेवा आणि मी सांगतोय म्हणून घ्या. काय मेले असते का अजित पवार?', असे विधान राजू शेट्टींनी केलं. 

'बापलेक एकाच दोरीला गळफास घेऊ लागलेत'

"सोळा मिनिटं एसी मिळाला नाही म्हणून उकाड्याने हैराण झालेला माणूस प्रोटोकॉल बाजूला ठेवून नवी गाडी घ्या म्हणून आदेश देतो. अरे दिवसाढवळ्या एकाच दोरीला गळफास घेऊन बाप आणि लेक मरायला लागलेत. लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. दया यायला पाहिजे शेतकऱ्यांची, पण त्यांना दया येत नाही. यापेक्षा तुम्हाला राग येत नाही. याचं मला वाईट वाटतं. सोळा मिनिटं एसी बंद पडलेला ह्या गड्याला सहन झाला नाही, मग आमचे शेतकरी आई-बहिणी ४२ डिग्रीमध्ये कशा काम करत असतील? तुम्हाला फक्त १६ मिनिटं एसी बंद पडल्याचा राग आला", अशी टीका राजू शेट्टी यांनी अजित पवारांवर केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaju Shettyराजू शेट्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण