शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
3
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
4
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
5
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
6
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
7
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
8
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
9
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
10
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
11
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
12
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
13
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
14
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
15
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
16
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
17
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
18
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
19
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
20
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 22:10 IST

"मला एका गोष्टीचे नेहमीच आश्चर्य वाटते की, हिंदीसारख्या भारतीय भाषेचा आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो. इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो. यासंदर्भात मात्र मला आश्चर्य वाटते की, आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का वाटते? याचाही विचार कुठे तरी केला पाहिजे," असेही फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. हिंदी भाषा अनिवार्य करण्यास काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनीही विरोध केला आहे. यासंदर्भात आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे. "मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य करण्यात आलेली नाही. मराठी ही अनिवार्यच आहे. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकण्याची संधी देण्यात आली आहे, त्या शिकणे अनिवार्य आहे आणि या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीयच असायला हव्यात, अशा प्रकारचा नियम आहे." असे फडणवीस यांनी सांगितले. याच बरोबर, आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का वाटते? याचाही विचार कुठे तरी केला पाहिजे," असेही फडणवीस म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.काय म्हणाले फडणवीस? -भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षांनी हिंदी भाषेसंदर्भात पत्र दिले आहे? सध्या हिंदीसंदर्भात राज्यात जे काही सुरू आहे, त्यासंदर्भात काय बोलाल? अशा आशयाचा प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, "मी अद्याप हे पत्र वाचले नाही. पण, पहिली गोष्ट ही समजून घ्यायला हवी की, मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य करण्यात आलेली नाही. मराठी ही अनिवार्यच आहे. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकण्याची संधी देण्यात आली आहे, त्या शिकणे अनिवार्य आहे आणि या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीयच असायला हव्यात, अशा प्रकारचा नियम आहे. त्यामुळे दोन भारतीय भाषांमध्ये आपण एक मराठी अनिवार्य केली आहे आणि दुसरी भाषा कोणती? तर ती भारतातील कोणतीही भाषा घेतली तर, ती हिंदी, तमिळ, मल्याळम, गुजराती अथवा इतर कोणती तरी भाषा घ्यावी लागेल. याच्या बाहेरची भाषा तर घेता येणार नाही."

फडणवीस पुढे म्हणाले, "समितीने मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीला जेव्हा अहवाल दिला, तेव्हा तिसरी भाषा म्हणून हिंदी ठेवल्यास ती भाषा शिकवणारे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामुळे, आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता भासणार नाही. इतर भाषा ठेवल्या समजा, मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली, तर या भाषांचे शिक्षक उपलब्ध नाहीत, म्हणून कुठेही अतिक्रमण नाही. तर ही त्यांची शिफारस आहे."

जर कुणाला हिंदी व्यतिरिक्त तिसरी भाषा शिकायची असेल, तर... -मुख्यमंत्री म्हणाले, "आमचे तर मत आहे आणि आम्ही यासंदर्भात निर्णयही घेणार आहोत की, जर कुणाला हिंदी व्यतिरिक्त तिसरी भाषा शिकायची असेल, तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ. कारण तशी मुभा ही नव्या शेक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे. मात्र, किमा २० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास वेगळा शिक्षक देता येईल. पण २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास ऑनलाइन किंवा अन्य पद्धतीने ती आपल्याला शिकवावी लागेल. सीमावर्ती भागात अशा पद्धतीचे शिक्षकही उपलब्ध असतात आणि तेथे द्विभाषा पद्धतही असते. अशा ठिकाणी वेगळा निर्णय घेता येईल. पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होत आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती असणार आहे. इतर कुठलीही सक्ती नाही."

हिंदीसारख्या भारतीय भाषेचा आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो -"मला एका गोष्टीचे नेहमीच आश्चर्य वाटते की, हिंदीसारख्या भारतीय भाषेचा आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो. इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो. यासंदर्भात मात्र मला आश्चर्य वाटते की, आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का वाटते? याचाही विचार कुठे तरी केला पाहिजे," असेही फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEducationशिक्षणBJPभाजपाStudentविद्यार्थीSchoolशाळा