शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
4
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
5
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
6
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
7
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
8
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
9
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
10
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
11
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
12
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
13
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
14
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
15
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
16
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
17
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
18
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
19
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
20
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...

"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 22:10 IST

"मला एका गोष्टीचे नेहमीच आश्चर्य वाटते की, हिंदीसारख्या भारतीय भाषेचा आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो. इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो. यासंदर्भात मात्र मला आश्चर्य वाटते की, आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का वाटते? याचाही विचार कुठे तरी केला पाहिजे," असेही फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. हिंदी भाषा अनिवार्य करण्यास काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनीही विरोध केला आहे. यासंदर्भात आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे. "मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य करण्यात आलेली नाही. मराठी ही अनिवार्यच आहे. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकण्याची संधी देण्यात आली आहे, त्या शिकणे अनिवार्य आहे आणि या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीयच असायला हव्यात, अशा प्रकारचा नियम आहे." असे फडणवीस यांनी सांगितले. याच बरोबर, आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का वाटते? याचाही विचार कुठे तरी केला पाहिजे," असेही फडणवीस म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.काय म्हणाले फडणवीस? -भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षांनी हिंदी भाषेसंदर्भात पत्र दिले आहे? सध्या हिंदीसंदर्भात राज्यात जे काही सुरू आहे, त्यासंदर्भात काय बोलाल? अशा आशयाचा प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, "मी अद्याप हे पत्र वाचले नाही. पण, पहिली गोष्ट ही समजून घ्यायला हवी की, मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य करण्यात आलेली नाही. मराठी ही अनिवार्यच आहे. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकण्याची संधी देण्यात आली आहे, त्या शिकणे अनिवार्य आहे आणि या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीयच असायला हव्यात, अशा प्रकारचा नियम आहे. त्यामुळे दोन भारतीय भाषांमध्ये आपण एक मराठी अनिवार्य केली आहे आणि दुसरी भाषा कोणती? तर ती भारतातील कोणतीही भाषा घेतली तर, ती हिंदी, तमिळ, मल्याळम, गुजराती अथवा इतर कोणती तरी भाषा घ्यावी लागेल. याच्या बाहेरची भाषा तर घेता येणार नाही."

फडणवीस पुढे म्हणाले, "समितीने मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीला जेव्हा अहवाल दिला, तेव्हा तिसरी भाषा म्हणून हिंदी ठेवल्यास ती भाषा शिकवणारे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामुळे, आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता भासणार नाही. इतर भाषा ठेवल्या समजा, मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली, तर या भाषांचे शिक्षक उपलब्ध नाहीत, म्हणून कुठेही अतिक्रमण नाही. तर ही त्यांची शिफारस आहे."

जर कुणाला हिंदी व्यतिरिक्त तिसरी भाषा शिकायची असेल, तर... -मुख्यमंत्री म्हणाले, "आमचे तर मत आहे आणि आम्ही यासंदर्भात निर्णयही घेणार आहोत की, जर कुणाला हिंदी व्यतिरिक्त तिसरी भाषा शिकायची असेल, तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ. कारण तशी मुभा ही नव्या शेक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे. मात्र, किमा २० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास वेगळा शिक्षक देता येईल. पण २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास ऑनलाइन किंवा अन्य पद्धतीने ती आपल्याला शिकवावी लागेल. सीमावर्ती भागात अशा पद्धतीचे शिक्षकही उपलब्ध असतात आणि तेथे द्विभाषा पद्धतही असते. अशा ठिकाणी वेगळा निर्णय घेता येईल. पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होत आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती असणार आहे. इतर कुठलीही सक्ती नाही."

हिंदीसारख्या भारतीय भाषेचा आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो -"मला एका गोष्टीचे नेहमीच आश्चर्य वाटते की, हिंदीसारख्या भारतीय भाषेचा आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो. इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो. यासंदर्भात मात्र मला आश्चर्य वाटते की, आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का वाटते? याचाही विचार कुठे तरी केला पाहिजे," असेही फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEducationशिक्षणBJPभाजपाStudentविद्यार्थीSchoolशाळा