शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

कोरोना बाधित रुग्णांवर कसे उपचार होतात माहितीये ? जाणून घ्यायचे असेल तर वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 18:32 IST

हे खरे आहे की कोरोनासाठी कोणतीही लस किंवा ठराविक औषध उपलब्ध नाही. पण...

ठळक मुद्देसध्या रुग्णांना याच औषधांनी बरे केले जात आहे.

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पण हा विषाणू वाटतो तितका भयानक नाही. एखाद्याला या विषाणूची बाधा झाली तरी योग्यवेळी मिळालेल्या उपचाराने त्यावर मात करता येते. गुढीपाडव्याला अशाच दोघांना घरी सोडण्यात आले. हे खरे आहे की कोरोनासाठी कोणतीही लस किंवा ठराविक औषध उपलब्ध नाही. पण आपल्याकडील नेहमीच्या औषधांनीही तो बरा होऊ शकतो. पण औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच या रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. रुग्णांमधील लक्षणांवर औषधे दिली जात आहेत. हे औषधे सध्यातरी कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करत आहेत.नायडू रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर लक्षणावर उपचार केले जात आहेत. सध्या रुग्णालयात एकही गंभीर स्वरूपाचे लक्षणे असलेला रुग्ण नाही. त्यामुळे त्यांच्यावर नियमित उपचारच सुरू आहेत. रुग्ण कोरोना बाधित असेल तर त्याला अँटीव्हायरल असलेली ऑसेलटॅमीवीर (टॅमिफ्लू) ही गोळी सुरू केली जाते. पुढील सात दिवस ही गोळी दिली जाते. बहुतेक सगळ्यांनाच ही गोळी दिली जात आहे. त्याचा चांगला परिणामही जाणवत आहे. तसेच खोकल्यासाठी एक हे पातळ औषध, आणि तापासाठी गोळी दिली जात आहे. लक्षणांनुसार एक प्रतिजैवक औषध दिले जाते. सध्या नायडूतील रुग्णांना याच औषधांनी बरे केले जात आहे. लक्षांनानुसार काही औषधे बदलू ही शकतात. त्यामुळे कोणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. योग्य तपासणी करून घेतल्यानंतर डॉक्टर सांगतील तीच औषधे घ्यावीत असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. --------------पोषक आहारही महत्वाचाऔषधांबरोबरच पोषक आहार मिळणेही महत्वाचे आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना संतुलित आहार मिळायला हवा. त्यानुसार नायडू मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथिने, कर्बोदके, आवश्यक जीवनसत्व असलेला आहार दिला जात आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.----------------

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल