शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही ग्राऊंड आर्मी तयार करताय, कोणाच्या कामी येईल...", 'अग्निपथ'वरुन आव्हाडांचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 19:10 IST

"आजपर्यंत काँट्रॅक्ट किलर शब्द ऐकला होता, पण आता काँट्रॅक्ट सोल्जर्स ऐकतोय.''

मुंबई:केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू असून, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकमतशी खाच बाचतीत केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

'सैन्यात भरती होणे अतिशय अवघड'जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आजपर्यंत आपण देशात काँट्रॅक्ट किलर्स शब्द ऐकला होता, पण आता नवीन शब्द येतोय, काँट्रॅक्ट सोल्जर्स. सैन्यात भरती होणे अनेकांचे स्वप्न असते. निधड्या छातीचे पोरं सैन्यात जातात. निधड्या छातीने गोळ्या झेलून देशातील बांधवाना  सुरक्षित ठेवतात. त्यांची मानसिक आणि शारिरीक अवस्थात सुदृध असते, म्हणून त्यांना सैन्यात जागा मिळते. अतिशय अवघड प्रक्रियेतून हे पोरं जातात आणि त्यांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग मिळते. अशाच पोरांनी भारताचा इतिहास रचलाय."

काँट्रॅक्टवर घेतलेली पोरं काम करतील?"भारताचे सैनिक पाकिस्तान, चीन, बाँग्लादेश सीमेवर तैनात असतात. हे सैनिक मायनस तापमानात काम करतात. इशान्येकडे असलेल्या घनदाड जंगलातून परदेशी घुसत असतात, तिकहे आपले सैनिक काम करतात. काश्मीरकडे पाकिस्तान, वर अफगाणिस्तान, इशान्येकडे चीन, बांग्लादेश, या देशांच्या सीमा लागल्या आहेत. सीलाँग चीनने ताब्यात घेतले आहे. अशा परिस्थितीत काँट्रॅक्टची पोर काम करू शकतील?," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'तुम्ही ग्राउंड आर्मी तयार करताय'यावेळी आव्हाडांनी केंद्रावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "या पोरांना सहा महिन्यात तयार केले जाणार आहे. त्यांना तुम्ही शस्त्र चालवणे शिकवणार, आधुनिक तंत्रज्ञान असलेली हत्यारे चालवायला देणार. एकप्रकारे तुम्ही ग्राउंड आर्मी तयार करत आहात. हे कोणाच्या कामी येईल, हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्याप्रकारे गोरक्षक दल काम करते, त्याप्रमाणेच यांना पोरांना कामाला लावले जाईल," असा आरोप त्यांनी केला.

'...तर नोकऱ्या देऊ नका'"ज्या वयात पोरांनी अभ्यास केला पाहिजे, त्या वयात ही पोर आर्मीतून निवृत्त होणार. चार वर्षानंतर पोरांनी काय करायचं? देशातील तरुणांची चेष्टा करू नका. नोकरी देता येत नसेल, तर देऊ नका पण बेरोजगारांची टिंगल थांबवा. या योजनेमुळे मुलांचे भविष्यच राहिले नाही. केंद्राला आता सैन्य आता ओझ वाटायला लागलंय," असंही ते म्हणाले.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडDefenceसंरक्षण विभागCentral Governmentकेंद्र सरकार