शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

"तुम्ही आणि तुमची खुर्ची हाच तुमचा परिवार, बाकी आहे कुठे?", उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 22:40 IST

Uddhav Thackeray Criticize Narendra Modi: नरेंद्र मोदी आमच्यावर घराणेशाहीवरून आरोप करतात. मात्र तुमच्या तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

घराणेशाहीविरोधात नेहमीच बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली. नरेंद्र मोदी आमच्यावर घराणेशाहीवरून आरोप करतात. मात्र तुमच्या तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आम्ही इंडिया आघाडीची बैठक घेतली होती तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले की, ही विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही विरोधी आहोत, जरूर आहोत. पण आम्ही विरुद्ध आहोत ते हुकूमशाहाच्या विरोधात आहोत. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात आहोत. जेव्हा नरेंद्र मोदी तुम्ही आमच्या घराणेशाहीवर आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाश आंबेडकर यांच्या भाषेत बोलणार नाही. पण तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ही जी काही आपण आपली लढाई लढतोय, ती लोकशाही वाचवण्याची आहे. संविधान वाचवण्यासाठीची लढाई आहे. ज्या संविधानाबाबत शिवसेनाप्रमुख सांगायचे की, याची सुरुवात ही कोर्टापासून केली पाहिजे.   कोर्टामध्ये कुठल्याही धर्मग्रंथाऐवजी घटनेवर हात ठेवून शपथ घ्यायला सुरुवात पाहिजे. पण आज भाजपाला घटना बदलायची आहे. यांना ४०० पार जागा त्याचसाठी पाहिजे आहेत. यांचे एक नेते अनंत कुमार हेगडे तसं म्हणाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

तसेच एका पक्षाला बहुमत मिळून सत्तेवर आलेलं सरकार चांगलं नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, असं काही वेळा वाटायचं की देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे. पण आता आपल्याला अनुभवानंतर कळलं की, आपलं युतीचं सरकार होतं, अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. सगळेच त्यामध्ये होते. एनडीएमध्ये छान वातावरण होतं. ममता, समता, जयललिता आपण सगळे एकत्र होतो. अटल बिहारी वाजपेयी यांनी उत्तम प्रकारे आपलं सरकार चालवलं होतं. त्यावेळी देशाची परिस्थिती इंडिया शायनिंग फिल गुड अशी होती. मग मनमोहन सिंग यांनी चांगल्याप्रकारे सरकार चालवलं होतं. आता २०१४ पासून एका पक्षाचं सरकार आहे. २०१४ नंतर २०१९ आता २०१९ नंतर २०२४. आता म्हणताहेत की विरोधी पक्ष २०२९ मध्ये अडकलाय. मात्र मी २०४७ चा विचार करतोय. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशातील जनतेसमोर हुकूमशाह कितीही मोठा असला तरी ज्यावेळी सगळे लोक एकवटतात, तेव्हा हुकूमशाहाचा अंत होतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४