शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही आणि तुमची खुर्ची हाच तुमचा परिवार, बाकी आहे कुठे?", उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 22:40 IST

Uddhav Thackeray Criticize Narendra Modi: नरेंद्र मोदी आमच्यावर घराणेशाहीवरून आरोप करतात. मात्र तुमच्या तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

घराणेशाहीविरोधात नेहमीच बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली. नरेंद्र मोदी आमच्यावर घराणेशाहीवरून आरोप करतात. मात्र तुमच्या तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आम्ही इंडिया आघाडीची बैठक घेतली होती तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले की, ही विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही विरोधी आहोत, जरूर आहोत. पण आम्ही विरुद्ध आहोत ते हुकूमशाहाच्या विरोधात आहोत. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात आहोत. जेव्हा नरेंद्र मोदी तुम्ही आमच्या घराणेशाहीवर आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाश आंबेडकर यांच्या भाषेत बोलणार नाही. पण तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ही जी काही आपण आपली लढाई लढतोय, ती लोकशाही वाचवण्याची आहे. संविधान वाचवण्यासाठीची लढाई आहे. ज्या संविधानाबाबत शिवसेनाप्रमुख सांगायचे की, याची सुरुवात ही कोर्टापासून केली पाहिजे.   कोर्टामध्ये कुठल्याही धर्मग्रंथाऐवजी घटनेवर हात ठेवून शपथ घ्यायला सुरुवात पाहिजे. पण आज भाजपाला घटना बदलायची आहे. यांना ४०० पार जागा त्याचसाठी पाहिजे आहेत. यांचे एक नेते अनंत कुमार हेगडे तसं म्हणाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

तसेच एका पक्षाला बहुमत मिळून सत्तेवर आलेलं सरकार चांगलं नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, असं काही वेळा वाटायचं की देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे. पण आता आपल्याला अनुभवानंतर कळलं की, आपलं युतीचं सरकार होतं, अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. सगळेच त्यामध्ये होते. एनडीएमध्ये छान वातावरण होतं. ममता, समता, जयललिता आपण सगळे एकत्र होतो. अटल बिहारी वाजपेयी यांनी उत्तम प्रकारे आपलं सरकार चालवलं होतं. त्यावेळी देशाची परिस्थिती इंडिया शायनिंग फिल गुड अशी होती. मग मनमोहन सिंग यांनी चांगल्याप्रकारे सरकार चालवलं होतं. आता २०१४ पासून एका पक्षाचं सरकार आहे. २०१४ नंतर २०१९ आता २०१९ नंतर २०२४. आता म्हणताहेत की विरोधी पक्ष २०२९ मध्ये अडकलाय. मात्र मी २०४७ चा विचार करतोय. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशातील जनतेसमोर हुकूमशाह कितीही मोठा असला तरी ज्यावेळी सगळे लोक एकवटतात, तेव्हा हुकूमशाहाचा अंत होतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४