शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 15:50 IST

Sharad pawar on Narendra Modi Soul Statement: शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. मोदी यांचा हल्ली माझ्यावर खूपच राग आहे. मी पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आल्याचे वक्तव्य त्यांनी पुण्यातील एका भाषणात केले होते, याची पवारांनी आठवण करून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी सोमवारी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. शरद पवारांचे नाव न घेता त्यांना भटकती आत्मा म्हटले होते. महत्वाचे म्हणजे या वक्तव्याचे पडसाद विरोधकांतून उमटत असताना अजित पवार राष्ट्रवादी गट मात्र त्याचे समर्थन करत आहे. अशावेळी आता शरद पवारांची मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया आली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. मोदी यांचा हल्ली माझ्यावर खूपच राग आहे. मी पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आल्याचे वक्तव्य त्यांनी एका भाषणात केले होते. मात्र, आता ते महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, तो अस्वस्थ आहे. हा अस्वस्थ आत्मा गेली ४५ वर्षे महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करत असल्याचे, सरकार अडचणीत आणत असल्याचे म्हणत आहेत. हो माझा आत्मा भटकत आहे, अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे, असा पलटवार शरद पवारांनी केला आहे. 

शेतकऱ्यांचे दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यात गैर काय, देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना संसार चालविणे अवघड बनले आहे. त्यांच्यासाठी मी १०० वेळा अस्वस्थ होईन, असे प्रत्यूत्तर पवारांनी दिले आहे. मी तडफड करतो असे मोदी म्हणाले, होय मी लोकांचे दु:ख पाहून तडफड करतोय. कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेले मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र लाचार होणार नाही. भाजपाने आमचे घर फोडले, पक्ष फोडला. हे फोडाफोडीचे राजकारण राज्याच्या हिताचे नाही, अशी टीका पवारांनी केली. 

तसेच जनतेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो. हे लोक जनतेला अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी मोदींवर केला. तसेच मोदी काल म्हणाले की ते ईडीचा एक टक्काही वापर करत नाहीत, लोकांच्या ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना तुम्ही तुरुंगात टाकताय. यामुळे आता एक टक्का म्हणा की सौ टक्का, तुम्ही हुकुमशाहीच्या दिशेने जात आहात, असा आरोप पवार यांनी केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Puneपुणे