शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजूर टंचाईवर यंदा यंत्रतोड, खुद्द तोडीचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 02:26 IST

पश्चिम महाराष्ट्रात सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे. ऊसही मुबलक आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा  ऊस तोड मजुरांच्या टोळ्या आलेल्या नाहीत .

पश्चिम महाराष्ट्रात सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे. ऊसही मुबलक आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा  ऊस तोड मजुरांच्या टोळ्या आलेल्या नाहीत . परिणामी यंदाचा हंगाम लांबणार आहे.  ऊसतोडणी यंत्र आणि खुद्दतोड हे पर्याय अवलंबून ऊसतोड मजुरांच्या टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यंकडून सुरू आहे. याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे याचा हा आढावा.कोल्हापूर- विभागात तब्बल २०% मजूर कमीकोल्हापूर : सोलापूरसह मराठवाड्यात झालेला चांगला पाऊस, त्यात एकाच मुकादमाने दोन-तीन वाहनचालकांकडून घेतलेल्या पैशांमुळे यंदा ऊसतोड मजुरांची टंचाई जाणवत आहे. कोल्हापूर विभागात २० टक्के मजूर न आल्याने साखर कारखान्यांपुढे खुद्द तोडीशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत स्थानिकचे ५९ हजार, परजिल्ह्यांतील एक लाख ३२ हजार; तर परराज्यांतील ११ हजार असे दोन लाख चार हजार मजूर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आहेत.वाहनचालक काेयत्यांच्या संख्येनुसार मुकादमाशी करार करतात. कोयत्याला ३० ते ४० हजार रुपये ॲडव्हास दिला जातो. मागील हंगामात सुमारे अडीच लाख मजूर विभागातील कारखान्यांकडे होते. मात्र मार्चपासून कोरोनाचे संकट आल्याने हंगाम संपूनही त्यांना गावाकडे जाता येईना. या कालावधीत त्रास झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यातच यंदा संपूर्ण राज्यात पाऊस चांगला झाल्याने मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यातील मजूर शेतीकामात गुंतले. करार झालेल्यांपैकी २० टक्के मजुरांनी पाठ फिरवल्याने ऊसतोडणीचा पेच आहे.जिल्ह्यात ७० हजारांवर मजूरसोलापूर : जिल्हात २६  साखर कारखान्यांचे गाळप सुरू  असून ऊस तोडणीसाठी  ७० हजाराहुन अधिक मजूर काम करीत आहेत. बुलढाणा, नांदेड, परभणी, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, धुळे  जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर आले आहेत.  प्रतिदिन ११हजार रे १२५० मेट्रीक टन गाळप क्षमता असलेले साखर कारखाने सुरू आहेत. यावर्षी ऊस तोडणीसाठी १५१ हार्वेस्टर मशिन आहेत. मशिनची संख्या असली तरी तोडणीसाठी मजुरांची आवश्यकता आहेच. मजूर, मुकादमांकडून कोट्यवधींचा गंडा सांगली/सातारा : गेल्या काही वर्षांत विदर्भ, मराठवाड्यातील ऊसतोड मजूर व मुकादमांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ऊसतोडीसाठी लाखो रुपयांची उचल घ्यायची आणि ऐन हंगामात परागंदा व्हायचे, असे प्रकार सुरू आहेत. काही कारखान्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारीही दिल्या आहेत.जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांकडे दरवर्षी प्रत्येकी ४०० ते ५०० टोळ्यांचे करार होतात. सुमारे ५ ते ६ हजार टोळ्या येतात. वाहतूकदार संघटनेकडे १ हजार ६०० ऊस वाहनांची नोंद आहे. प्रत्येक मजूर ७० ते ८० हजारांची उचल घेतो. सातारा जिल्ह्यात प्रत्येक कारखान्याकडे किमान तीनशे ते साडेतीनशे टोळ्या असतात. यावर्षी मात्र दुष्काळी भागातही चांगला पाऊस झाल्याने सुमारे तीस टक्के कमी टोळ्या आल्या आहेत. ऊस तोडणी यंत्रांवर बऱ्याच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. सध्यातरी तोडणीची अडचण नाहीपुणे : जिल्ह्यात १८ साखर कारखाने आहेत. गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे. ऊसतोडणी कामगार मराठवाडा विशेषत: बीड जिल्ह्यातून येतो. तेथेही यंदा चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे थोडीफार शेती असलेला किंवा शेतावर काम करत असलेला मजूर तिकडे अडकला आहे. त्यातून कामगार कमी संख्येने जिल्ह्यात आलेले दिसतात, मात्र जिल्ह्यातील कारखानदारांकडून अद्याप त्याविषयी ओरड नाही. एकूण १८ साखर कारखाने आहेत. एका कारखान्याची उचल ३० कोटीहंगामात सरासरी सहा लाख टन गाळप करणारा कारखाना हंगामासाठी किमान ३०कोटी रुपयांची उचल मजुरांना देतो.४००० टन रोजचे गाळप१००० बैलगाडीएक वाहनधारक वाहनापोटी सरासरी १० लाख उचल साखर कारखान्याच्या हमीवर बँका कर्जापोटी देतात. बैलगाडीमागे एक लाख रुपये उचल कारखाना देतो.