शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

"ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए"; मनसेचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 14:04 IST

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचे सरकार आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ससंदेत विरोधी पक्षांच्या तब्बल १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

मुंबई - देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर सर्व नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहिली. दिल्लीतील सदैव अटल समाधी स्थळावर केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि एनडीए नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. देशाच्या जडणघडणीत अटबिहारी यांचं मोठं योगदान आहे. आज त्यांची ९९ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडियातूनही त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. 

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचे सरकार आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ससंदेत विरोधी पक्षांच्या तब्बल १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यावरुन, केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत आहे. आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी मनसेनं अटलबिहारी वाजपेयी यांचा संसदेतील एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या आणि तत्कालीन सरकारच्या कामकाजाची पद्धत सांगितली आहे. सरकार येईल, आणि जाईल. पक्ष बनतील आणि बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे, या देशातील लोकशाही राहिली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहे. 

तत्कालीन पी.व्ही. नरसिंग राव यांच्या सरकारमध्ये विरोधी पक्षातील नेते असतानाही अटबिहारी वाजपेयी यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून जेनिव्हा येथे पाठवण्यात आले होते. त्यावेळी, पाकिस्तानी आश्चर्यचकीत झाले होते, अशी आठवण वाजपेयी यांनी सांगितली होती, हे सांगतानाच त्यांनी देशात सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा दुवा कायम राहिला पाहिजे, असे म्हटले होते. त्यावरुन, मनसेनं विद्यमान मोदी सरकारला लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे.  

सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. पण, हि अटलवाणी ऐकलीत तर कळेल कि, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण, आज...? असा प्रश्न मनसेनं विचारलं आहे. मनसेनं अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवरच हल्लाबोल केला आहे.  तसेच, राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना कि पुन्हा ह्या देशात विचारांचं, विवेकाचं, तात्विक विरोधाचं राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो, असेही मनसेनं अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना म्हटलं आहे. 

दरम्यान, भाजपाच्यावतीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत अटबिहारी वाजपेयी यांची ९९ वी जयंती देशभरात साजरी होत आहे. त्यांचे जुने व्हिडिओ, त्यांचे कोट्स शेअर करुन सोशल मीडियातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीMNSमनसेBJPभाजपाPakistanपाकिस्तान