शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

चिंताजनक! 31 हजार कोरोनाबाधित आठवडाभरात वाढले, संसर्गाचा धोका गंभीर पातळीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 07:17 IST

CoronaVirus News in Maharashtra : मागच्या आठवड्यात कोरोनाबाधितांचा आकडा निम्म्यावर म्हणजे ३ हजार ६७० इतका होता. आठवडाभरात नव्याने बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत चालला आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा धोका गंभीर पातळीवर पोहचला आहे. आठवडाभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या तब्बल ३१ हजार २७ ने वाढली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ६ हजार ११२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या ४४ हजार ७६५ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ ठेवणे आणि शारीरिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.मागच्या आठवड्यात कोरोनाबाधितांचा आकडा निम्म्यावर म्हणजे ३ हजार ६७० इतका होता. आठवडाभरात नव्याने बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत चालला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येने गुरूवारी दोन महिन्यांतील उच्चांकी संख्या गाठली होती. ५,४२७ नवे रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. शुक्रवारची स्थिती त्याहून गंभीर बनली आहे. दिवसभरात ६ हजार ११२ नवे रूग्ण आढळून आल्याने लाॅकडाऊनच्या काळातील स्थिती निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे नव्या बाधितांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे. 

वर्ध्यातही ३६ तासांची संचारबंदीवर्धा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता इतर सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र