शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

"हे सर्वसामान्यांचं नव्हे, तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार"; विरोधकांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 18:03 IST

Worli Mumbai Hit and Run Case: वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबीयांची महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सांत्वन

Worli Mumbai Hit and Run Case: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात महागड्या पोर्शे कारमधील अल्पवयीन मद्यधुंद चालकाने दोघांना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाले. त्यानंतर चार दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी येथे एका बीएमडब्ल्यू कारमधील मद्यधुंद मिहिर शाह नामक चालकाने एका कोळी दाम्पत्याला धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय आणखी काही हिट अँड रनच्या केसेस महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात घडल्याचे दिसून आले. यावर आज सभागृहात चर्चा झाली. यावरून आज काँग्रेसचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी सरकारवर टीका केली.

"हे सर्वसान्यांचं नव्हे तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे. नाखवा कुटुंबीयांच्या वेदना, त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची किंमत सरकारला मोजावीच लागेल. हा अपघात नाही, ही हत्या आहे," असा खरपूस शब्दांत शेख यांनी सरकारवर टीका केली. वरळी हिट अँड रन घटनेतील मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची आमदार अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधली.

"एका सेलिब्रेटीला धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस प्रशासन लगेच त्या सेलिब्रेटिच्या घराबाहेर फौजफाटा तैनात करते, राज्यसरकार देखील प्रत्येक गोष्टीमध्ये तत्परता दाखवते. मात्र एका सामान्य महिलेचा जीव गेल्यानंतर आरोपीला अटक होण्यासाठी ६० तास लागतात. संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही बसवलेले आहेत. तरीदेखील आरोपीला पकडण्यासाठी ६० तास लागतात, हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहेच, मात्र सरकारी आशीर्वादाशिवाय ६० तास आरोपी मोकाट फिरणे शक्यच नाही. एकीकडे सरकार कोट्यवधी रुपये वाटत आहे, मात्र नाखवा कुटुंबीयांना अजूनही सरकार मदत जाहीर करत नाही यावरुन सरकार संवेदनशील नाही हे स्पष्ट होते," असा आरोप अस्लम शेख यांनी केला. मृत महिलेच्या कुटुबीयांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईAccidentअपघातMLAआमदारAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस