शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

"हे सर्वसामान्यांचं नव्हे, तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार"; विरोधकांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 18:03 IST

Worli Mumbai Hit and Run Case: वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबीयांची महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सांत्वन

Worli Mumbai Hit and Run Case: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात महागड्या पोर्शे कारमधील अल्पवयीन मद्यधुंद चालकाने दोघांना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाले. त्यानंतर चार दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी येथे एका बीएमडब्ल्यू कारमधील मद्यधुंद मिहिर शाह नामक चालकाने एका कोळी दाम्पत्याला धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय आणखी काही हिट अँड रनच्या केसेस महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात घडल्याचे दिसून आले. यावर आज सभागृहात चर्चा झाली. यावरून आज काँग्रेसचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी सरकारवर टीका केली.

"हे सर्वसान्यांचं नव्हे तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे. नाखवा कुटुंबीयांच्या वेदना, त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची किंमत सरकारला मोजावीच लागेल. हा अपघात नाही, ही हत्या आहे," असा खरपूस शब्दांत शेख यांनी सरकारवर टीका केली. वरळी हिट अँड रन घटनेतील मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची आमदार अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधली.

"एका सेलिब्रेटीला धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस प्रशासन लगेच त्या सेलिब्रेटिच्या घराबाहेर फौजफाटा तैनात करते, राज्यसरकार देखील प्रत्येक गोष्टीमध्ये तत्परता दाखवते. मात्र एका सामान्य महिलेचा जीव गेल्यानंतर आरोपीला अटक होण्यासाठी ६० तास लागतात. संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही बसवलेले आहेत. तरीदेखील आरोपीला पकडण्यासाठी ६० तास लागतात, हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहेच, मात्र सरकारी आशीर्वादाशिवाय ६० तास आरोपी मोकाट फिरणे शक्यच नाही. एकीकडे सरकार कोट्यवधी रुपये वाटत आहे, मात्र नाखवा कुटुंबीयांना अजूनही सरकार मदत जाहीर करत नाही यावरुन सरकार संवेदनशील नाही हे स्पष्ट होते," असा आरोप अस्लम शेख यांनी केला. मृत महिलेच्या कुटुबीयांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईAccidentअपघातMLAआमदारAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस