शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

"हे सर्वसामान्यांचं नव्हे, तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार"; विरोधकांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 18:03 IST

Worli Mumbai Hit and Run Case: वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबीयांची महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सांत्वन

Worli Mumbai Hit and Run Case: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात महागड्या पोर्शे कारमधील अल्पवयीन मद्यधुंद चालकाने दोघांना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाले. त्यानंतर चार दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी येथे एका बीएमडब्ल्यू कारमधील मद्यधुंद मिहिर शाह नामक चालकाने एका कोळी दाम्पत्याला धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय आणखी काही हिट अँड रनच्या केसेस महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात घडल्याचे दिसून आले. यावर आज सभागृहात चर्चा झाली. यावरून आज काँग्रेसचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी सरकारवर टीका केली.

"हे सर्वसान्यांचं नव्हे तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे. नाखवा कुटुंबीयांच्या वेदना, त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची किंमत सरकारला मोजावीच लागेल. हा अपघात नाही, ही हत्या आहे," असा खरपूस शब्दांत शेख यांनी सरकारवर टीका केली. वरळी हिट अँड रन घटनेतील मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची आमदार अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधली.

"एका सेलिब्रेटीला धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस प्रशासन लगेच त्या सेलिब्रेटिच्या घराबाहेर फौजफाटा तैनात करते, राज्यसरकार देखील प्रत्येक गोष्टीमध्ये तत्परता दाखवते. मात्र एका सामान्य महिलेचा जीव गेल्यानंतर आरोपीला अटक होण्यासाठी ६० तास लागतात. संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही बसवलेले आहेत. तरीदेखील आरोपीला पकडण्यासाठी ६० तास लागतात, हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहेच, मात्र सरकारी आशीर्वादाशिवाय ६० तास आरोपी मोकाट फिरणे शक्यच नाही. एकीकडे सरकार कोट्यवधी रुपये वाटत आहे, मात्र नाखवा कुटुंबीयांना अजूनही सरकार मदत जाहीर करत नाही यावरुन सरकार संवेदनशील नाही हे स्पष्ट होते," असा आरोप अस्लम शेख यांनी केला. मृत महिलेच्या कुटुबीयांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईAccidentअपघातMLAआमदारAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस