शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:37 IST

निर्यातीला परवानगी द्यायचीच आहे तर सर्व अटी काढून टाका. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन करत होते. पण सरकार ऐकायला तयार नव्हते. - राजू शेट्टी

लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहा देशांमध्ये कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. याचे स्वागत करत हातकणंगलेचे लोकसभा उमेदवार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे. धडाधड त्यांचे उमेदवार पाडा, त्याशिवाय हेच काय कुठलेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे. 

निर्यातीला परवानगी द्यायचीच आहे तर सर्व अटी काढून टाका. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरीकांदा निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन करत होते. वारंवार सरकारकडे निवेदने जात होती, आंदोलने होत होती. शेतकरी रस्त्यावर उतरत होते पण सरकार ऐकायला तयार नव्हते. जशा लोकसभेच्या निवडणुका आल्या व भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांचे उमेदवार पराभूत होणार अशी लक्षणे दिसताच सरकार जागे झाले आहे, असा आरोप शेट्टी यांनी भाजपावर केला आहे.

आधी गुजरातमधील दोन हजार टन पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली. यावर टीकाटिप्पणी सुरु झाल्यानंतर आता 99 हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पण हा फार उशिराने घेतलेला निर्णय आहे. निर्यातीला परवानगीच द्यायची आहे तर अटी कशाला घालता? असा सवाल करत शेट्टी यांनी जेवढा कांदा निर्यात व्हायचा तेवढा होऊ दे त्यावरील बंधन काढून टाकावी अशी मागणी केली आहे.

तसेच शेतकऱ्याने डोळे वटारल्यानंतर जर सरकार घाबरत असेल तर धडाधड त्यांचे उमेदवार पाडा. त्याशिवाय हेच काय कुठलेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही असे आवाहनही शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीonionकांदाBJPभाजपाhatkanangle-pcहातकणंगलेFarmerशेतकरीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४