शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

 शिवसेनेच्या सोबतीशिवाय विजय मिळवणे कठीण, मुख्यमंत्री चिंतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 19:43 IST

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत झालेला पराभव, देशपातळीवर विरोधी पक्षांचे होत असलेले ऐक्य आणि महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना घाम फुटला आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत झालेला पराभव, देशपातळीवर विरोधी पक्षांचे होत असलेले ऐक्य आणि महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना घाम फुटला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेनेसोबत युती होवो वा न होवो, कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी  सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले. नुकतीच राज्यातील दोन मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतील दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आगामी निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असेल, याचा अंदाज बांधण्यात आला. शिवसेनेशिवाय निवडणूक लढवण्याची वेळ आली तर पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेची सोबत आवश्यक असेल, असे सांगितले. तसेच शिवसेनेसोबत युती न झाल्यास कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यास तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले. भाजपाने शिवसेनेसोबत युती नसतानाही पालघरमध्ये विजय मिळवला होता. भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या विजयाचाही उल्लेख केला. मात्र  पालघरमध्ये शिवसेनेचे आव्हान परतवून लावताना भाजपाची दमछाक झाली होती. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे विचारणा केली असता दानवेंनी शिवसेना अद्यापही आमच्यासोबत सरकारमध्ये आहे. एका पोटनिवडणुकीत ते आमच्या विरोधात लढले आहेत. मात्र चर्चेची शक्यता अद्यापही कायम असल्याचे दानवे म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण