शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

 शिवसेनेच्या सोबतीशिवाय विजय मिळवणे कठीण, मुख्यमंत्री चिंतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 19:43 IST

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत झालेला पराभव, देशपातळीवर विरोधी पक्षांचे होत असलेले ऐक्य आणि महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना घाम फुटला आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत झालेला पराभव, देशपातळीवर विरोधी पक्षांचे होत असलेले ऐक्य आणि महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना घाम फुटला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेनेसोबत युती होवो वा न होवो, कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी  सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले. नुकतीच राज्यातील दोन मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतील दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आगामी निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असेल, याचा अंदाज बांधण्यात आला. शिवसेनेशिवाय निवडणूक लढवण्याची वेळ आली तर पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेची सोबत आवश्यक असेल, असे सांगितले. तसेच शिवसेनेसोबत युती न झाल्यास कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यास तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले. भाजपाने शिवसेनेसोबत युती नसतानाही पालघरमध्ये विजय मिळवला होता. भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या विजयाचाही उल्लेख केला. मात्र  पालघरमध्ये शिवसेनेचे आव्हान परतवून लावताना भाजपाची दमछाक झाली होती. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे विचारणा केली असता दानवेंनी शिवसेना अद्यापही आमच्यासोबत सरकारमध्ये आहे. एका पोटनिवडणुकीत ते आमच्या विरोधात लढले आहेत. मात्र चर्चेची शक्यता अद्यापही कायम असल्याचे दानवे म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण