शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 21:20 IST

दर २५ वर्षांनी नवीन पिढी पुढे येत असते. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही असं अजित पवारांनी सांगितले.

पुणे - Ajit Pawar Interview ( Marathi News ) नीतीश कुमार जेव्हा लालू प्रसाद यादव यांच्यासोबत होते त्यावेळची भाषणे आणि आजची भाषणे ऐकली तर बदल करावा लागतो. आपण का भूमिका घेतो ही लोकांना पटवून द्यावी लागते. सगळ्याच गोष्टी उघड करू शकत नाही. पण काही गोष्टी लोकांच्या मनात त्या नेतृत्वाबद्दल एक गैरविश्वास असतो. विश्वासर्हता कमी होता कामा नये अन्यथा राजकारणात टिकणार नाही. उदा. नाना पाटेकर यांनी अलीकडे सांगितले, त्यांचे वडील काँग्रेस विचारधारेचे होते. कारण तेव्हा काँग्रेस होती. त्यानंतर नाना शिवसेनेकडे झुकले, बाळासाहेब ठाकरेंचे विचार नाना पाटेकर असो दादा कोंडके यांना पटले, त्यानंतर आता त्यांना भाजपाचे विचार आवडते. त्यामुळे एक व्यक्ती, तोच कलाकार पण त्या त्या काळात त्यांच्याही मनात मतपरिवर्तन झाले. त्यालाही कारणे असू शकतात असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत घेतली. त्यावर अजितदादांनी परखडपणे सर्व विषयांवर भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि दुसरीकडे भाजपा-शिवसेना एकत्रित लढली. पण निकालानंतर कुणाच्या काय मनात आले माहिती नाही. भाजपासोबत आम्ही निवडणूक लढलो असलो तरी आम्ही भाजपासोबत न जाता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी दाखवली. त्यातून सरकार निर्माण झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका आयुष्यात मांडली. पण उद्धव ठाकरेंकडे सूत्रे आल्यानंतर कशामुळे ते दुखावले गेले, २५ वर्षाची मैत्री तोडून असा निर्णय का घेतला?. निवडणुकीत जनतेने भाजपा-शिवसेनेला कौल दिला होता. स्पष्ट बहुमत आले होते. मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे ध्यानीमनी नसताना अचानक सर्व घडलं आणि त्यातून सरकार आले. विचारधारा वेगळी, भूमिका वेगळ्या मग किमान समान कार्यक्रम ठरवून एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. परंतु मधल्या दीड दोन वर्षात कोरोना काळ आला. कोरोनातून बाहेर काढण्यात आमच्या सरकारचा वेळ गेला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत वेगळी भूमिका घेतली. ते राज्याचे प्रमुख झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत नुसते विरोधी पक्षात बसले म्हणजे विकास करता येत नाही. तुम्ही फक्त विरोध करू शकता, सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकता. सातत्याने जनतेला जागरुक ठेवण्याचे काम करावे लागले. विरोधी पक्षाला भूमिका मांडावी लागते. पूर्वीचा काळ वेगळा होता. आता लोकांना माझी कामे झाली पाहिजे, माझ्या गावचा, वॉर्डाचा विकास झाला पाहिजे असा त्यांचा कल असतो. गेल्या सव्वाचार वर्षाच्या काळात महाराष्ट्राने सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. सोशल मीडियाचा खूप पगडा या गोष्टीवर आहे. २०१४ मध्येही सोशल मीडियाचा वापर करून जनाधार कसा बदलू शकतो हे भारताने पाहिले. आपल्याकडे कधी घडले नव्हते. २०१९ मध्येही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. आता २०२४ मध्येही परिस्थिती आपल्यासमोर आली आहे. राजकारण हा माझा पिंड नव्हता. बारामतीत काम करत करत पुढे आलो. काँग्रेस पक्षाकडून पहिली संधी दिली. दुर्देवाने आमच्या प्रचारावेळी राजीव गांधींसोबत दुर्घटना घडली. दर २५ वर्षांनी नवीन पिढी पुढे येत असते. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही. त्यावेळी लोकांचा राजकीय लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यासारख्या नेत्यांनी सुसस्कृत राजकारण कसे पाहिजे हे शिकवले. कालांतराने राजकारण बदलले, एका एका राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे पॉवर आली. एनटी रामाराव, चंद्राबाबू नायडू, करुणानिधी, जयललिता, मुलायम सिंग यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल हेदेखील पाहिले. आपली लोकशाही एवढी जिवंत आहे, कधी कुणाच्या पाठिशी राहून त्या पदावर बसवेल आणि कधी घरचा रस्ता दाखवेल सांगता येत नाही असंही अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, मी बरीच वर्ष राजकारणात वरिष्ठांसोबत नेतृत्वाखाली काम केले आहे. ज्या ज्या वेळी जे काही निर्णय घेतले ते का घेतली याचा विचार न करता कार्यकर्ता म्हणून त्याचे समर्थन करणे आणि पुढे जाणे हा एकमेव विचार आम्ही केला. १९९१, १९९५ मध्ये आम्ही काँग्रेसकडून उभे राहिलो, १९९९ मध्ये परकीय मुद्दा पुढे आला. देशाचे पंतप्रधानपद एका परदेशी व्यक्तीला का द्यायचे यावरून फूट पडली. वरिष्ठांनी निर्णय घेतला आम्ही मान्य केला. मे महिन्यात हा निर्णय झाला. त्यानंतर ४ महिन्यांनी पुन्हा काँग्रेससोबत सरकार स्थापन करायला सांगितले. त्यावेळी जे वरिष्ठ नेते होते, आज त्यातला एकही नेता सोबत नाही, सगळेच नेते बाजूला गेले आहेत. त्यावेळी आम्ही ज्युनिअर होतो. त्या त्या गोष्टी आम्ही करत गेलो. अनेकदा भाजपासोबत जाण्याचाही विचार सुरू होता. २०१४ ला विधानसभेचा पूर्ण निकाल लागण्यापूर्वी आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा देणार असं विधान केले. वरिष्ठांनी निर्णय घेतला आम्ही गप्प ऐकून घेतला. त्यावेळी बाहेरून पाठिंबा दिला, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले, शिवसेना बाहेर राहिली. त्यानंतर पुन्हा सरकारमध्ये आपण जायचे ठरले. मात्र काहीतरी घडले आणि आता जरा अडचणी आहेत सोडून द्या असं आम्हाला सांगितले. १९९१ ते २०२४ आम्हालाही ३२ वर्ष राजकारणात झाली. शेवटी उद्याचा विचार करताना पुढच्या पिढीचे काय, उद्या भवितव्य काय, देशात नेतृत्व कोण करतंय, जागतिक नेता म्हणून कुणाला व्हिजन आहे याचा विचार केला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा सर्वांचा काळ आपण पाहिला. देशात एक मजबूत नेता असल्याशिवाय देशाचा कारभार चालणार नाही हे माझे स्पष्ट मत झालं. हुशार माणसांची डोकी एकत्र आल्यावर सगळा बट्ट्याबोळ होतो हे पाहिले आहे असं मत अजित पवारांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस