शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महाराष्ट्राच्या आशीर्वादाने ‘अब की बार चार सौ पार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 06:27 IST

पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळातून फुंकला लोकसभा निवडणुकीचा बिगुल, वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाइनसह प्रवासी रेल्वेचा श्रीगणेशा

- विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यापूर्वी दोन लोकसभा निवडणुकांच्या अगोदर मी यवतमाळमध्ये आलो होतो. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा यवतमाळकरांच्या भेटीला आलो आहे. मागील १० वर्षांत देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात यशस्वी झालो, त्याच पुण्याईच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीत एनडीएला तुम्ही ४०० पेक्षा अधिक जागा द्याल. ‘अब की बार चारसौ पार’ अशी घोषणा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. यावेळी त्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामांचे लोकार्पण तसेच विविध योजनांचे निधी वितरणही पार पडले. 

यवतमाळमधील नागपूर रोडवरील डोर्ली येथे बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाइन आणि प्रवासी रेल्वेसह इतर विविध योजनांचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता वितरित करण्यात आला. 

२३ मिनिटे ५४ सेकंदांच्या भाषणाने जिंकली सभाnपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंचावर ६:०२ वाजता आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजाची पगडी तसेच स्वयंसहायता गटाने बनविलेल्या वस्तू भेट देऊन त्यांचे स्वागत केले. nत्यानंतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर मराठीमध्ये मोदींनी भाषणाला सुरुवात केली. २३ मिनिटे ५४ सेकंदाच्या भाषणात विकासाच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आल्याचे सांगत पंतप्रधानांनी सभा जिंकली.

‘शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू’nछत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी महापुरुषांच्या कार्यांला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे झाली आहेत. nराज्यभिषेकानंतरही शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी स्वराज्याला बळकटी देण्यासाठी सतत प्रयत्न केले. आम्हीही शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही पंतप्रधान माेदींनी दिली.

एक रुपयांपैकी १५ पैसेच पोहोचतnमोदी म्हणाले, पूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. विशेष म्हणजे कृषिमंत्री महाराष्ट्राचे असूनही केंद्रातून मंजूर एक रुपयांपैकी केवळ १५ पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असे. म्हणजे मी आता २१ हजार करोड रुपये लाभार्थ्यांच्या थेट खात्यात टाकले आहेत. nपूर्वीचे सरकार असते तर यातील १८ हजार कोटी रुपयांची मध्येच लूट झाली असती, अशी घणाघाती टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली. nविद्यमान सरकार लाभार्थ्याला पूर्ण हक्क देणारे असून हीच मोदींची गॅरंटी आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

राज्यात सर्वाधिक याेजना पूर्णपूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या शंभर सिंचन योजना बासनात गुंडाळल्या होत्या. त्यातील ६० योजना आम्ही पूर्ण केल्या. त्यातही महाराष्ट्रातील योजना सर्वाधिक आहेत.या योजना रखडल्याने लाभार्थी विकासापासून वंचित राहिले. त्यांच्या पापाची शिक्षा या पिढीला भोगावी लागली.आता मात्र तसे होणार नाही. गेल्या १० वर्षांपासून भाजप सरकारने गोरगरीब, शेतकरी, तरुण आणि महिला या घटकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची नवी दिशा दाखविली असल्याचे मोदी म्हणाले.  

यांची होती उपस्थितीया प्रसंगी मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागसवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार संदीप धुर्वे, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा