शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महाराष्ट्राच्या आशीर्वादाने ‘अब की बार चार सौ पार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 06:27 IST

पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळातून फुंकला लोकसभा निवडणुकीचा बिगुल, वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाइनसह प्रवासी रेल्वेचा श्रीगणेशा

- विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यापूर्वी दोन लोकसभा निवडणुकांच्या अगोदर मी यवतमाळमध्ये आलो होतो. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा यवतमाळकरांच्या भेटीला आलो आहे. मागील १० वर्षांत देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात यशस्वी झालो, त्याच पुण्याईच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीत एनडीएला तुम्ही ४०० पेक्षा अधिक जागा द्याल. ‘अब की बार चारसौ पार’ अशी घोषणा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. यावेळी त्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामांचे लोकार्पण तसेच विविध योजनांचे निधी वितरणही पार पडले. 

यवतमाळमधील नागपूर रोडवरील डोर्ली येथे बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाइन आणि प्रवासी रेल्वेसह इतर विविध योजनांचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता वितरित करण्यात आला. 

२३ मिनिटे ५४ सेकंदांच्या भाषणाने जिंकली सभाnपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंचावर ६:०२ वाजता आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजाची पगडी तसेच स्वयंसहायता गटाने बनविलेल्या वस्तू भेट देऊन त्यांचे स्वागत केले. nत्यानंतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर मराठीमध्ये मोदींनी भाषणाला सुरुवात केली. २३ मिनिटे ५४ सेकंदाच्या भाषणात विकासाच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आल्याचे सांगत पंतप्रधानांनी सभा जिंकली.

‘शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू’nछत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी महापुरुषांच्या कार्यांला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे झाली आहेत. nराज्यभिषेकानंतरही शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी स्वराज्याला बळकटी देण्यासाठी सतत प्रयत्न केले. आम्हीही शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही पंतप्रधान माेदींनी दिली.

एक रुपयांपैकी १५ पैसेच पोहोचतnमोदी म्हणाले, पूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. विशेष म्हणजे कृषिमंत्री महाराष्ट्राचे असूनही केंद्रातून मंजूर एक रुपयांपैकी केवळ १५ पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असे. म्हणजे मी आता २१ हजार करोड रुपये लाभार्थ्यांच्या थेट खात्यात टाकले आहेत. nपूर्वीचे सरकार असते तर यातील १८ हजार कोटी रुपयांची मध्येच लूट झाली असती, अशी घणाघाती टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली. nविद्यमान सरकार लाभार्थ्याला पूर्ण हक्क देणारे असून हीच मोदींची गॅरंटी आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

राज्यात सर्वाधिक याेजना पूर्णपूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या शंभर सिंचन योजना बासनात गुंडाळल्या होत्या. त्यातील ६० योजना आम्ही पूर्ण केल्या. त्यातही महाराष्ट्रातील योजना सर्वाधिक आहेत.या योजना रखडल्याने लाभार्थी विकासापासून वंचित राहिले. त्यांच्या पापाची शिक्षा या पिढीला भोगावी लागली.आता मात्र तसे होणार नाही. गेल्या १० वर्षांपासून भाजप सरकारने गोरगरीब, शेतकरी, तरुण आणि महिला या घटकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची नवी दिशा दाखविली असल्याचे मोदी म्हणाले.  

यांची होती उपस्थितीया प्रसंगी मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागसवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार संदीप धुर्वे, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा