शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 08:52 IST

Prithviraj Chavan on Loksabha Election: ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही कठीण दिसत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा अंदाज व्यक्त केला आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही कठीण दिसत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. यामुळे केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता असल्याचे भाकीत त्यांनी केला आहे. 

भाजपला सध्या बहुमताचा 272 चा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे. गेल्या दोनवेळा सहजपणे त्यांनी हा आकडा गाठला होता. आता देशात आणि महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण दिसत आहे. याचा परिणाम दिसणार आहे. इंडिया आघाडीच्या २४० ते २६० जागा निवडून येतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राला पृथ्वीराज यांनी मुलाखत दिली. 

महाराष्ट्रावर काय अंदाज...मागील लोकसभेला एमआयएम आणि वंचितची आघाडी होती. यामुळे या दोघांना सहा टक्के मते मिळाली होती. आता ती परिस्थिती नाही. एमआयएमची सोबत नसल्याने वंचितला पूर्वीइतकी मते मिळणार नाहीत, असे मत पृथ्वीराज यांनी मांडले. 'अबकी बार चारसो पार' ही घोषणा मोदींच्याच अंगलट आल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यात अजित पवारांची एकही सीट येत नसल्याचे ते म्हणाले. शिंदे गटाच्या तीन-चार जागा येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १२ जागांवर यश मिळू शकते. राज्यात ठाकरे आणि पवार यांच्या बाजुने सहानुभुतीची लाट आहे. यामुळे राज्यात मविआला ३२ ते ३५ जागा मिळू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

बेरोजगारी, भ्रष्टाचार, संविधान बचाव हे मुद्दे प्रभावी ठरत आहेत. या मुद्द्यांवर मोदी आणि भाजपला स्पष्टीकरण देता आलेले नाही. भाजपकडून 2047 सालच्या विकसित भारताची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडे याबाबत स्पष्टता नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४