शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 21:18 IST

'निवडून आल्यानंतर हे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत', बोरीवलीतून राज ठाकरे कडाडले

प्रविण मरगळेRaj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. दिवसभरात राज ठाकरेंच्या तीन-चार सभा पार पडत आहेत. दरम्यान, आज बोरिवलीत त्यांची सभा पार पडली. सायंकाळी 7 च्या सुमारास राज ठाकरे यांचे सभा स्थळी आगमन झाले. या सभेनंतर राज ठाकरेंची वर्सोवा, प्रभादेवी येथे सभा आहे. बोरिवली येथील सभेत 45 मिनिटे भाषण केल्यानंतर राज ठाकरे सभा आटोपून जाणार होते, तेवढ्यात वर्सोवा येथून पदाधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांना फोनवरुन निरोप आला. वर्सोवा येथील सभेत राज यांचे बोरिवलीतील भाषण मोठ्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बोरिवली येथील भाषण आणखी 15 मिनिटे वाढवले.

या सभेततून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नागरी समस्यांवरुन सरकारवर टीका केली. उमेदवार आता गल्लोगल्लीत, घराघरापर्यंत प्रचारासाठी फिरत आहेत. पण निवडून आल्यानंतर हेच उमेदवार 5 वर्षे नागरिकांकडे मागे फिरुन पाहत नाहीत. हेच राज ठाकरेंनी आपल्या भाणषातून मांडले. 'मुंबईच्या ट्रॅफिकमधून कसाबसा मार्ग काढत काढत मी इथपर्यंत पोहोचलो. दिवसाला तीन-तीन, चार-चार सभा सुरू आहेत. मी आलो आहे ते तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि सहज चार गोष्टी सांगण्यासाठी. मला बोरवलीला सभा घ्यायचीच होती, ते यादीमध्ये नव्हतं, पण मी इथे तुमच्यासाठी आलो. मी बोरीवली मतदारसंघासाठी अत्यंत सभ्य उमेदवार दिलेला आहे. जाणीव असलेला, अभ्यास असलेला उमेदवार दिला आहे', असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, 'आज काही पक्षांचे जाहीरनामे आले. 20 वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजसुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यात होत्या. काँग्रेसने काही बोलायचे ठेवले नाही. एका बाजूला प्रगती झाली म्हणायचे अन् दुसऱ्या बाजूला जुनी बोरिवली चांगली होती वाटते. कसलीही यंत्रणा लावलेली नाही, बाहेरुन माणसं येत आहेत. एखादं शहर म्हटलं तर ठीक आहे, माणसं येणं स्वाभाविक आहे, पण जे मूळ आहे, त्यांना त्रास व्हायला लागला आहे. फुटपाथवर चालता येईना, रस्त्यावर गाड्या चालवता येईना, मैदानावर बागा उरल्या नाहीत. मग कोणती डेव्हलपमेंट झाली?'

'प्रत्येकाला घरातून बाहेर पडल्यावर बरं वाटलं पाहिजे, पण शहरात तसं काहीच वाटत नाही. आपले शहर बॉम्ब टाकल्यासारखे का वाटतात? काहीही चालतंय. फुटपाथ तुटले, रस्ते नाहीत, खड्डे आहेत. याचे कारण म्हणजे आपल्याला नक्की काय पाहिजे, याची कल्पना तुम्हाला नाही आणि राजकारण्यांना तर नाहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पाहिले तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळेल. शहरांना एक कॅरेक्टर लागतं. राजकारण्यांनाच कॅरेक्टर उरले नाही, तर शहरांना कुठून येणार? त्यांचे आपल्याकडे लक्ष नाही, कारण आपण त्यांना प्रश्न विचारत नाहीत, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

'आतापर्यंत जे-जे आमदार, खासदार होऊन गेले, त्यांना एकदा प्रश्न विचारा. निवडणूक आल्यावर हात जोडतात, पाया पडतात आणि निवडणुका झाल्या की, पाच वर्षे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत. तुम्ही प्रश्न विचाराल अशी त्यांना भीती वाटली पाहिजे. पण त्यांना भीतीच उरली नाही. चांगल्या जातीचा, चांगल्या पक्षाचा असा आपण मतदान करतो. पण हा चांगलं काम करतो की, नाही यावर आपण मतदान करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मतं मागायला येतात. पण, आता बाळासाहेब ठाकरे नाहीत अन् बोरिवलीमधील प्रश्न नरेंद्र मोदींना कसे सांगायचे? पाच वर्षे कशाला म्हणतात कळत का?', असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थितांना केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना