शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 21:18 IST

'निवडून आल्यानंतर हे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत', बोरीवलीतून राज ठाकरे कडाडले

प्रविण मरगळेRaj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. दिवसभरात राज ठाकरेंच्या तीन-चार सभा पार पडत आहेत. दरम्यान, आज बोरिवलीत त्यांची सभा पार पडली. सायंकाळी 7 च्या सुमारास राज ठाकरे यांचे सभा स्थळी आगमन झाले. या सभेनंतर राज ठाकरेंची वर्सोवा, प्रभादेवी येथे सभा आहे. बोरिवली येथील सभेत 45 मिनिटे भाषण केल्यानंतर राज ठाकरे सभा आटोपून जाणार होते, तेवढ्यात वर्सोवा येथून पदाधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांना फोनवरुन निरोप आला. वर्सोवा येथील सभेत राज यांचे बोरिवलीतील भाषण मोठ्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बोरिवली येथील भाषण आणखी 15 मिनिटे वाढवले.

या सभेततून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नागरी समस्यांवरुन सरकारवर टीका केली. उमेदवार आता गल्लोगल्लीत, घराघरापर्यंत प्रचारासाठी फिरत आहेत. पण निवडून आल्यानंतर हेच उमेदवार 5 वर्षे नागरिकांकडे मागे फिरुन पाहत नाहीत. हेच राज ठाकरेंनी आपल्या भाणषातून मांडले. 'मुंबईच्या ट्रॅफिकमधून कसाबसा मार्ग काढत काढत मी इथपर्यंत पोहोचलो. दिवसाला तीन-तीन, चार-चार सभा सुरू आहेत. मी आलो आहे ते तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि सहज चार गोष्टी सांगण्यासाठी. मला बोरवलीला सभा घ्यायचीच होती, ते यादीमध्ये नव्हतं, पण मी इथे तुमच्यासाठी आलो. मी बोरीवली मतदारसंघासाठी अत्यंत सभ्य उमेदवार दिलेला आहे. जाणीव असलेला, अभ्यास असलेला उमेदवार दिला आहे', असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, 'आज काही पक्षांचे जाहीरनामे आले. 20 वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजसुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यात होत्या. काँग्रेसने काही बोलायचे ठेवले नाही. एका बाजूला प्रगती झाली म्हणायचे अन् दुसऱ्या बाजूला जुनी बोरिवली चांगली होती वाटते. कसलीही यंत्रणा लावलेली नाही, बाहेरुन माणसं येत आहेत. एखादं शहर म्हटलं तर ठीक आहे, माणसं येणं स्वाभाविक आहे, पण जे मूळ आहे, त्यांना त्रास व्हायला लागला आहे. फुटपाथवर चालता येईना, रस्त्यावर गाड्या चालवता येईना, मैदानावर बागा उरल्या नाहीत. मग कोणती डेव्हलपमेंट झाली?'

'प्रत्येकाला घरातून बाहेर पडल्यावर बरं वाटलं पाहिजे, पण शहरात तसं काहीच वाटत नाही. आपले शहर बॉम्ब टाकल्यासारखे का वाटतात? काहीही चालतंय. फुटपाथ तुटले, रस्ते नाहीत, खड्डे आहेत. याचे कारण म्हणजे आपल्याला नक्की काय पाहिजे, याची कल्पना तुम्हाला नाही आणि राजकारण्यांना तर नाहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पाहिले तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळेल. शहरांना एक कॅरेक्टर लागतं. राजकारण्यांनाच कॅरेक्टर उरले नाही, तर शहरांना कुठून येणार? त्यांचे आपल्याकडे लक्ष नाही, कारण आपण त्यांना प्रश्न विचारत नाहीत, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

'आतापर्यंत जे-जे आमदार, खासदार होऊन गेले, त्यांना एकदा प्रश्न विचारा. निवडणूक आल्यावर हात जोडतात, पाया पडतात आणि निवडणुका झाल्या की, पाच वर्षे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत. तुम्ही प्रश्न विचाराल अशी त्यांना भीती वाटली पाहिजे. पण त्यांना भीतीच उरली नाही. चांगल्या जातीचा, चांगल्या पक्षाचा असा आपण मतदान करतो. पण हा चांगलं काम करतो की, नाही यावर आपण मतदान करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मतं मागायला येतात. पण, आता बाळासाहेब ठाकरे नाहीत अन् बोरिवलीमधील प्रश्न नरेंद्र मोदींना कसे सांगायचे? पाच वर्षे कशाला म्हणतात कळत का?', असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थितांना केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना