शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 21:18 IST

'निवडून आल्यानंतर हे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत', बोरीवलीतून राज ठाकरे कडाडले

प्रविण मरगळेRaj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. दिवसभरात राज ठाकरेंच्या तीन-चार सभा पार पडत आहेत. दरम्यान, आज बोरिवलीत त्यांची सभा पार पडली. सायंकाळी 7 च्या सुमारास राज ठाकरे यांचे सभा स्थळी आगमन झाले. या सभेनंतर राज ठाकरेंची वर्सोवा, प्रभादेवी येथे सभा आहे. बोरिवली येथील सभेत 45 मिनिटे भाषण केल्यानंतर राज ठाकरे सभा आटोपून जाणार होते, तेवढ्यात वर्सोवा येथून पदाधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांना फोनवरुन निरोप आला. वर्सोवा येथील सभेत राज यांचे बोरिवलीतील भाषण मोठ्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बोरिवली येथील भाषण आणखी 15 मिनिटे वाढवले.

या सभेततून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नागरी समस्यांवरुन सरकारवर टीका केली. उमेदवार आता गल्लोगल्लीत, घराघरापर्यंत प्रचारासाठी फिरत आहेत. पण निवडून आल्यानंतर हेच उमेदवार 5 वर्षे नागरिकांकडे मागे फिरुन पाहत नाहीत. हेच राज ठाकरेंनी आपल्या भाणषातून मांडले. 'मुंबईच्या ट्रॅफिकमधून कसाबसा मार्ग काढत काढत मी इथपर्यंत पोहोचलो. दिवसाला तीन-तीन, चार-चार सभा सुरू आहेत. मी आलो आहे ते तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि सहज चार गोष्टी सांगण्यासाठी. मला बोरवलीला सभा घ्यायचीच होती, ते यादीमध्ये नव्हतं, पण मी इथे तुमच्यासाठी आलो. मी बोरीवली मतदारसंघासाठी अत्यंत सभ्य उमेदवार दिलेला आहे. जाणीव असलेला, अभ्यास असलेला उमेदवार दिला आहे', असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, 'आज काही पक्षांचे जाहीरनामे आले. 20 वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजसुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यात होत्या. काँग्रेसने काही बोलायचे ठेवले नाही. एका बाजूला प्रगती झाली म्हणायचे अन् दुसऱ्या बाजूला जुनी बोरिवली चांगली होती वाटते. कसलीही यंत्रणा लावलेली नाही, बाहेरुन माणसं येत आहेत. एखादं शहर म्हटलं तर ठीक आहे, माणसं येणं स्वाभाविक आहे, पण जे मूळ आहे, त्यांना त्रास व्हायला लागला आहे. फुटपाथवर चालता येईना, रस्त्यावर गाड्या चालवता येईना, मैदानावर बागा उरल्या नाहीत. मग कोणती डेव्हलपमेंट झाली?'

'प्रत्येकाला घरातून बाहेर पडल्यावर बरं वाटलं पाहिजे, पण शहरात तसं काहीच वाटत नाही. आपले शहर बॉम्ब टाकल्यासारखे का वाटतात? काहीही चालतंय. फुटपाथ तुटले, रस्ते नाहीत, खड्डे आहेत. याचे कारण म्हणजे आपल्याला नक्की काय पाहिजे, याची कल्पना तुम्हाला नाही आणि राजकारण्यांना तर नाहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पाहिले तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळेल. शहरांना एक कॅरेक्टर लागतं. राजकारण्यांनाच कॅरेक्टर उरले नाही, तर शहरांना कुठून येणार? त्यांचे आपल्याकडे लक्ष नाही, कारण आपण त्यांना प्रश्न विचारत नाहीत, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

'आतापर्यंत जे-जे आमदार, खासदार होऊन गेले, त्यांना एकदा प्रश्न विचारा. निवडणूक आल्यावर हात जोडतात, पाया पडतात आणि निवडणुका झाल्या की, पाच वर्षे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत. तुम्ही प्रश्न विचाराल अशी त्यांना भीती वाटली पाहिजे. पण त्यांना भीतीच उरली नाही. चांगल्या जातीचा, चांगल्या पक्षाचा असा आपण मतदान करतो. पण हा चांगलं काम करतो की, नाही यावर आपण मतदान करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मतं मागायला येतात. पण, आता बाळासाहेब ठाकरे नाहीत अन् बोरिवलीमधील प्रश्न नरेंद्र मोदींना कसे सांगायचे? पाच वर्षे कशाला म्हणतात कळत का?', असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थितांना केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना