शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे खासदार हेमंत गोडसेंना पक्षात घेणार? राऊत म्हणाले, 'दरवाजे उघडे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:09 IST

Sanjay Raut on Hemant Godse: लोकसभेचे तिकीट न मिळालेले महायुतीचे दोन खासदार अस्वस्थ झाले आहेत. त्यापैकी एक भाजपाचे आणि एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत.

लोकसभेचे तिकीट न मिळालेले महायुतीचे दोन खासदार अस्वस्थ झाले आहेत. त्यापैकी एक भाजपाचे आणि एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. यापैकी भाजपाचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असून त्यांनी नुकतीच संजय राऊतांची भेट घेतली आहे. तर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे मात्र राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहेत. अशातच शिंदे गटाला धक्का देण्यासाठी झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे गोडसेंना माफ करणार का, असा सवाल उपस्थित होत होता. 

यावर ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. हेमंत गोडसे कोण आहेत, कुठले खासदार आहेत. त्यांना आम्ही निवडून दिले आहे. आमच्याकडून कोणत्याही गद्दांरासाठी दरवाजे उघडे नाहीत. जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले, तर हा निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी जनता आणि शिवसैनिकांचा अपमान आहे, अशा शब्दांत गोडसेंना मातोश्रीचे दरवाजे उघडे नाहीत, असे राऊत म्हणाले आहेत. 

व्हीव्हीपॅट संदर्भात सुप्रीम कोर्टाने अजून निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय झाल्यास देशातील लोकशाहीसाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरेल. भ्रष्टाचारातून निवडणुका कशा जिंकता येतील?, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे कसे गोळा केले जातात? आणि ते निवडणुकीसाठी आणले जातात याबाबत इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणानंतर देशात एक वातावरण निर्माण झाले आहे. ईव्हीएमवरून तुम्ही कोणालाही मत द्या, मत कमळालाच जाणार. यामुळे मतदारांमध्ये भीती आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.  

संपूर्ण जगातून ईव्हीएम हटवली गेली. मग भाजपला ईव्हीएम वर एवढं प्रेम का? सुप्रीम कोर्ट जर व्हीव्हीपॅट संदर्भात निर्णय घेत आहे, तर संपूर्ण देश या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करेल. सरकारवर टीका करण्याऐवजी हे निर्णय निपक्ष आहेत. हे निर्णय लोकशाही वाचवण्यासाठी आहेत, आणि हे निर्णय जनतेच्या आणि राष्ट्राच्या हिताचे आहेत. ईव्हीएम हटी, दुर्घटना घटी भाजपने हिंमत दाखवायला हवी, असे आव्हान राऊत यांनी भाजपाला दिले आहे. 

वंचितवर काय म्हणाले...वंचितच्या नेत्यांनी चर्चा बंद केली आहे, आम्ही नाही. आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव शेवटी दिलेला आहे. पाच जागांच्या प्रस्तावात अकोला सुद्धा आहे. रामटेक शिवसेनेची जागा असून देखील दिलेली आहे, धुळे होती. मुंबईतील एक जागा देण्याच्या विचारात होतो आणि पाचवी जागा सुद्धा त्यांच्यासाठी काढून ठेवली होती. आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत. वंचित चर्चा करत नाही म्हणून आम्ही देशात निवडणुका लढायच्या नाहीत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHemant Godseहेमंत गोडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४