शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 18:08 IST

कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतली असून यापुढच्या निवडणुका मनसे लढणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती. या बैठकीत लोकसभा निकालावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर लवकरच पुढील रणनीती ठरवली जाईल असं विधान मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकरांनी केले आहे.

बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मुंबईसह पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा येथील महत्त्वाचे पदाधिकारी आजच्या बैठकीत उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली. त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. यापुढची रणनीती लवकरच ठरवली जाईल. गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभेसाठी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या प्रचाराचं काम केले. पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी जे योग्य आहे त्यानुसार निर्णय घेतली जातील. स्वबळावर असेल की युतीत लढायचं हे योग्य वेळी तुम्हाला कळेल असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी ३ जूनला देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार देऊ नये अशी वैयक्तिक विनंती केली होती. त्या विनंतीस मान देऊन राज ठाकरेंनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या गोष्टी वारंवार होऊ शकत नाही ते राज ठाकरेंनी फडणवीसांना सांगितले अशीही माहिती सरदेसाई यांनी माध्यमांना दिली. 

दरम्यान, ज्या ज्याठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतल्या तिथे महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत. महायुतीचे १७ खासदार निवडून येण्यासाठी जेवढी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तेवढीच मनसे कार्यकर्त्यांनी घेतली. फोडाफोडीचं राजकारण कुणालाच आवडत नाही. त्याचा परिणाम होतोच. या निवडणुकीत ते दिसले. त्यामुळे आता जो कुणी फुटणार असेल तोदेखील भविष्याचा विचार करेल आणि इकडे तिकडे जाईल. आम्ही जसं एका जागेवर घट्ट आहोत तसे तेदेखील राहतील असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.

आम्ही NGO नाही तर राजकीय पक्ष

जेव्हा आमच्या पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढली आहे. आमची सामाजिक संस्था नाही. राजकीय पक्ष आहे. विधानसभा, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा निवडणुका पक्ष लढणार आहे. पुढे काय होईल माहिती नाही. प्रत्येक पक्ष पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे यांना उमेदवारी भरू नका असा आदेश राज ठाकरेंनी दिला असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.  

टॅग्स :MNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरRaj Thackerayराज ठाकरेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा