शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 18:08 IST

कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतली असून यापुढच्या निवडणुका मनसे लढणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती. या बैठकीत लोकसभा निकालावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर लवकरच पुढील रणनीती ठरवली जाईल असं विधान मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकरांनी केले आहे.

बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मुंबईसह पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा येथील महत्त्वाचे पदाधिकारी आजच्या बैठकीत उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली. त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. यापुढची रणनीती लवकरच ठरवली जाईल. गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभेसाठी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या प्रचाराचं काम केले. पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी जे योग्य आहे त्यानुसार निर्णय घेतली जातील. स्वबळावर असेल की युतीत लढायचं हे योग्य वेळी तुम्हाला कळेल असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी ३ जूनला देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार देऊ नये अशी वैयक्तिक विनंती केली होती. त्या विनंतीस मान देऊन राज ठाकरेंनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या गोष्टी वारंवार होऊ शकत नाही ते राज ठाकरेंनी फडणवीसांना सांगितले अशीही माहिती सरदेसाई यांनी माध्यमांना दिली. 

दरम्यान, ज्या ज्याठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतल्या तिथे महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत. महायुतीचे १७ खासदार निवडून येण्यासाठी जेवढी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तेवढीच मनसे कार्यकर्त्यांनी घेतली. फोडाफोडीचं राजकारण कुणालाच आवडत नाही. त्याचा परिणाम होतोच. या निवडणुकीत ते दिसले. त्यामुळे आता जो कुणी फुटणार असेल तोदेखील भविष्याचा विचार करेल आणि इकडे तिकडे जाईल. आम्ही जसं एका जागेवर घट्ट आहोत तसे तेदेखील राहतील असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.

आम्ही NGO नाही तर राजकीय पक्ष

जेव्हा आमच्या पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढली आहे. आमची सामाजिक संस्था नाही. राजकीय पक्ष आहे. विधानसभा, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा निवडणुका पक्ष लढणार आहे. पुढे काय होईल माहिती नाही. प्रत्येक पक्ष पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे यांना उमेदवारी भरू नका असा आदेश राज ठाकरेंनी दिला असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.  

टॅग्स :MNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरRaj Thackerayराज ठाकरेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा