शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर नाना पटोलेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:08 IST

राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.

मुंबई : राज्यातील सरकार १० मार्चला बदलणार, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. 

राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती. १० मार्चला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याला जोडून पाटील यांच्या विधानाकडे बघितले जात आहे. पटोले यांनी बुधवारी भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना, सरकारमध्ये जे चालले आहे त्यालाही दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, असे सूचक विधान केले.

सरकारमध्ये काँग्रेसचे १२ मंत्री आहेत. सध्या पाच राज्यांची निवडणूक सुरू आहे. माझे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. १० मार्चपर्यंत संधी द्या. आपल्या सरकारमध्ये जे काही चालले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आपल्या हाती आहे, असे पटोले म्हणाले. पटोले यांच्या या विधानामुळे आता काँग्रेसमध्ये काही मंत्र्यांना डच्चू मिळून काहींना नव्याने संधी मिळणार का, मंत्र्यांपैकीच कोणाला विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळणार का? अशी चर्चासुरू झाली आहे. स्वत: पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदासोबतच मंत्री होण्यासही इच्छुक असल्याचे म्हटले जाते. 

सरकार पाडण्याचे भाजपचे दावे फुसके आहेत. महाविकास आघाडी एकसंध असून सरकार मजबूत आहे. भाजपच्या दबावतंत्रामुळे हे सरकार कधीही पडणार नाही. भाजपच्या, केंद्राच्या दडपशाहीचा आम्ही एकजुटीने प्रतिकार करू. त्यांना कितीही तारखा देऊ देत सरकार मजबूत आहे. - नाना पटोेले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेस