शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर नाना पटोलेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:08 IST

राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.

मुंबई : राज्यातील सरकार १० मार्चला बदलणार, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. 

राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती. १० मार्चला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याला जोडून पाटील यांच्या विधानाकडे बघितले जात आहे. पटोले यांनी बुधवारी भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना, सरकारमध्ये जे चालले आहे त्यालाही दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, असे सूचक विधान केले.

सरकारमध्ये काँग्रेसचे १२ मंत्री आहेत. सध्या पाच राज्यांची निवडणूक सुरू आहे. माझे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. १० मार्चपर्यंत संधी द्या. आपल्या सरकारमध्ये जे काही चालले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आपल्या हाती आहे, असे पटोले म्हणाले. पटोले यांच्या या विधानामुळे आता काँग्रेसमध्ये काही मंत्र्यांना डच्चू मिळून काहींना नव्याने संधी मिळणार का, मंत्र्यांपैकीच कोणाला विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळणार का? अशी चर्चासुरू झाली आहे. स्वत: पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदासोबतच मंत्री होण्यासही इच्छुक असल्याचे म्हटले जाते. 

सरकार पाडण्याचे भाजपचे दावे फुसके आहेत. महाविकास आघाडी एकसंध असून सरकार मजबूत आहे. भाजपच्या दबावतंत्रामुळे हे सरकार कधीही पडणार नाही. भाजपच्या, केंद्राच्या दडपशाहीचा आम्ही एकजुटीने प्रतिकार करू. त्यांना कितीही तारखा देऊ देत सरकार मजबूत आहे. - नाना पटोेले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेस