शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर नाना पटोलेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:08 IST

राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.

मुंबई : राज्यातील सरकार १० मार्चला बदलणार, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. 

राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती. १० मार्चला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याला जोडून पाटील यांच्या विधानाकडे बघितले जात आहे. पटोले यांनी बुधवारी भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना, सरकारमध्ये जे चालले आहे त्यालाही दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, असे सूचक विधान केले.

सरकारमध्ये काँग्रेसचे १२ मंत्री आहेत. सध्या पाच राज्यांची निवडणूक सुरू आहे. माझे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. १० मार्चपर्यंत संधी द्या. आपल्या सरकारमध्ये जे काही चालले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आपल्या हाती आहे, असे पटोले म्हणाले. पटोले यांच्या या विधानामुळे आता काँग्रेसमध्ये काही मंत्र्यांना डच्चू मिळून काहींना नव्याने संधी मिळणार का, मंत्र्यांपैकीच कोणाला विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळणार का? अशी चर्चासुरू झाली आहे. स्वत: पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदासोबतच मंत्री होण्यासही इच्छुक असल्याचे म्हटले जाते. 

सरकार पाडण्याचे भाजपचे दावे फुसके आहेत. महाविकास आघाडी एकसंध असून सरकार मजबूत आहे. भाजपच्या दबावतंत्रामुळे हे सरकार कधीही पडणार नाही. भाजपच्या, केंद्राच्या दडपशाहीचा आम्ही एकजुटीने प्रतिकार करू. त्यांना कितीही तारखा देऊ देत सरकार मजबूत आहे. - नाना पटोेले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेस