शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संसदेत मिळणार आता गुळाचा चहा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 05:06 IST

भावेश ब्राह्मणकर । लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशाच्या लोकशाहीचा गाडा चालणाऱ्या संसदेत लवकरच गुळाचा चहा देण्यात यावा, ...

भावेश ब्राह्मणकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या लोकशाहीचा गाडा चालणाऱ्या संसदेत लवकरच गुळाचा चहा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सांगलीच्या दोघा शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेट घेऊन गळ घातल्याने पंतप्रधानांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.गुळाचा चहा आरोग्यदायी आहे. तसेच, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गुळाच्या चहाचा प्रचार-प्रसार करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील संजीव कुलकर्णी आणि भूपाल खोत या दोन शेतकºयांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गुळ हा आयुर्वेदिक असून त्यामुळे शरीराला लोह आणि खनिज मिळत असल्याने आयुर्वेदिक गुळाला महत्त्व देणे गरजेचे आहे. संसद भवनासह सर्व मंत्रालयांच्या कॅन्टीनमध्ये गुळाचा चहा देण्यात यावा, अशी विनंती या दोन्ही शेतकºयांनी केली. शरीरात अतिरिक्त साखर वाढणे किंवा मधुमेहाचा आजार होण्यापासून प्रतिबंध त्यामुळे लागू शकतो. याचा थेट परिणाम कृषी अर्थव्यवस्थेवर होणार आहे.ऊस उत्पादकांना व गूळ बनविण्यापासून त्याची विक्री करणाºयांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. आपणही मन की बातच्या माध्यमातून देशवासीयांना आवाहन केले तर गुळाचा चहा अतिशय लोकप्रिय होऊ शकतो. तसेच, उत्तर प्रदेशातील साखर संस्थेद्वारे गुळाची जनजागृती देशपातळीवर केली जावी, अशी मागणी कुलकर्णी आणि भूप यांनी केली आहे.पंतप्रधानांनी आमच्या विनंतीला मान दिला आहे. त्यामुळे लवकरच संसदेत गुळाचा चहा मिळेल, अशी खात्री आहे.-भूपाल खोत, शेतकरी, सांगली

टॅग्स :lok sabhaलोकसभा