शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

राज-उद्धव एकत्र येणार? चर्चांवर ठाकरे गटाकडून अशी प्रतिक्रिया, चंद्रकांत खैरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 14:39 IST

Raj Thackeray & Uddhav Thackeray: महाराष्ट्रात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणार, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणार, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दरम्यान, आज मनसेने नेते अभिजित पानसे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एकत्र येण्याबातचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि एकत्र यावेत, अशी अनेकांची इच्छा आहे, असे ते म्हणाले.

मनसे नेते अभिजित पानसे आणि संजय राऊत यांची आज अचानक भेट झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उघाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना संजय राऊत यांच्याकडे पाठवून युतीचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर आता चर्चा होईल. तसेच त्याचं फलित चांगलं असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून सर्व जनता वाट पाहतेय. पण सध्या काही म्हणता येणार नाही. मात्र अनेकांची इच्छा आहे.

यावेळी खैरे यांनी भाजपावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपा हा एकच पक्ष देशात राहिला पाहिजे, असे त्यांचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते.  कुठल्याही प्रादेशिक पक्षाला शिल्लक ठेवायचं नाही, हे त्यांचं धोरण आहे. भाजपाचा हा डाव असेल तर तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. कारण प्रादेशिक पक्षांमुळे आमच्यासारखे नेते मोठे झाले आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी फोडाफोडीच्या राजकारणावरून खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. ते म्हणाले. भाजपाने ज्या पद्धतीने शिवसेना फोडली त्यात देवेंद्र फडणवीस यांचा खूप मोठा हात आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी मोदी शाहांच्या मदतीने आणि आमचे आमदार फोडून शिवसेना फोडण्याचं कारस्थान केलं. त्यात उद्धव ठाकरेंनी मोठी खाती दिलेल्या व्यक्तीने त्यांना साथ दिली. या दोघांनीही मिळून शिवसेनेचा घात केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद काही मिळालं नाही. त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. मात्र त्यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. तिथे त्यांना काका आणि पुतण्याचं भांडण लावून दिलं. घराघरात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटतेय की तो प्रयत्न यशस्वी होईल, पण तो यशस्वी होणार नाही, असेही खैरे यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे