शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

माझी बायको ब्राह्मण, तिच्या बहिणींनाही प्रमाणपत्र देणार का?; आव्हाडांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 19:28 IST

राजकीय व्यवस्थेत कुठेही नसलेला वंजारी, माळी, धनगर यांना आरक्षण देऊन राजकीय व्यवस्थेत आणण्याचे काम, प्रस्थापित जातीच्या विरोधात जाऊन शरद पवारांनी केले असं आव्हाड यांनी म्हटलं.

मुंबई - सगेसोयरे करण्यापेक्षा यापुढे आईचीच जात लावली जाईल अशी पुरोगामी घोषणा करा. मग ती मागासवर्गीय असेल तर तिच्या मुलांना आरक्षणाच्या सवलती मिळतील. त्यामुळे आग लावण्याचे काम बंद करा. हिंदू मुस्लीम याप्रमाणे ओबीसी मराठा बाजूला करण्याचं काम सत्ताधारी करतायेत. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सगेसोयरे हा धोकादायक शब्द सरकारने घातला आहे. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे नाहीतर आमच्याही सगेसोयऱ्यांना वंजाऱ्यांचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा अशी मागणीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केली. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता सरकारने जी अधिसूचना काढलीय त्यात सगेसोयरे यांनाही प्रमाणपत्रे द्या असं म्हटलं आहे. माझी बायको ब्राह्मण आहे. मग तिच्या बहिणीला तुम्ही वंजारी म्हणून प्रमाणपत्र देणार का? ते सगेसोयरे झाले ना...तिच्या बहिणीच्या मुलांना प्रमाणपत्र देणार का, सगेसोयरे आहेत. रक्ताचे नाते आहे. मग यापुढे कायदा करा. आंतरजातीय विवाहात जर एखाद्या मागासवर्गीय मुलीने सवर्ण मुलासोबत लग्न केले तर त्या मुलीची जात मुलांना लागली पाहिजे. तुम्ही पुरुषसत्ताक पद्धत का राबवता, महिला महत्त्वाची नाही का? त्यामुळे आमची मागणी आहे जर एखाद्या मागासवर्गीय मुलीने सवर्णाशी लग्न केले तर तिची जात तिच्या मुलांना लागली पाहिजे. कारण तिच्याच गर्भातून मुलांचा जन्म होतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज पक्षाच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शरद पवारांचे ओबीसी समाजावर जे योगदान आहे ते कुणीही विसरू शकत नाही. मंडल आयोज जेव्हा आला तेव्हा त्याची अंमलबजावणी देशात पहिल्यांदा शरद पवारांनी केली. आज महाराष्ट्रात अनेक उच्च पदावर बसलेले अधिकारी ही मेहरबानी शरद पवारांची आहे. राजकीय व्यवस्थेत कुठेही नसलेला वंजारी, माळी, धनगर यांना आरक्षण देऊन राजकीय व्यवस्थेत आणण्याचे काम, प्रस्थापित जातीच्या विरोधात जाऊन शरद पवारांनी केले. त्यामुळे शरद पवारांचे ओबीसीच्या भल्यासाठी जितकं योगदान आहे तितकं कुणाचे नाही असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, भुजबळांसोबत आमचे वैचारिक मतभेद असतील. परंतु ते ज्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांच्या सत्तेतील एका पक्षातील आमदाराने जी भाषा वापरली ती योग्य नाही. भुजबळ मंत्रिमंडळात ओबीसींची बाजू मांडण्यात कमी पडतायेत हे दिसतंय. त्यामुळे छगन भुजबळांनी निर्णय घ्यावा आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमचे मत स्पष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण द्यावे, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. आपण सर्व बहुजन आहोत. बहुजनांमध्ये भांडणे लावण्याची काहींची इच्छा आहे. कारण बहुजन एक झाले तर सत्ता दुसरीकडे जाऊ शकत नाही हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे बहुजनांना एकाबाजूला काढा आणि मराठ्यांना एकाबाजूला काढा. दोघांनाही झुंजवत ठेवा असा आरोप आव्हाडांनी सरकारवर केला. 

भुजबळांना एकटे का पाडले?

मंत्रिमंडळाच्या बाहेर येऊन भुजबळ जी भूमिका मांडतायेत ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावी. आपण संयुक्तरित्या मंत्रिमंडळात होतो तेव्हा ओबीसींच्या फाईली कोण दाबून ठेवायचे. सर्वात जास्त विरोध कोणाचा असायचा. के.सी पाडवींना कुणी छळले हे विचारा. आदिवासींबाबतीत कसे अन्याय करायचे हे विचारा. ओबीसींनी एकत्रच राहावे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे परंतु ओबीसींचे कमी करून मिळू नये. जिथे अन्याय तिथे अन्याय, मतभेद झाले ही वेगळी गोष्ट. पण राजकारणात अशी भाषा वापरणे ही पद्धत नाही. का त्यांच्या पक्षाने निषेध केला नाही. भुजबळांना एकटे का पाडले. ते कुठल्या जातीचेपातीचे सोडून द्या. पण मंत्रिमंडळात तुमच्यासोबत आहेत. त्यांच्याबद्दल अशी भूमिका, शरद पवार पुरोगामी, बाकी कुणी नव्हते असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीSharad Pawarशरद पवार