शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मनसे-भाजप एकत्र येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2022 17:00 IST

मनसे आणि भाजप एकत्र येणार का?, याची चर्चा रंगली आहे.

बाळा नांदगावकर, नेते, मनसे 

मध्यंतरी राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हाही राष्ट्रवादी आणि मनसेची युती होणार, अशी चर्चा रंगली होती. राज ठाकरे नव्या घरात राहायला गेले आहेत, घरी गणपती आहे,  त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांना भेटायचे असते. आता राजकीय नेते घरी आले की, राजकीय चर्चा होणारच, त्यातून तुम्ही अर्थ काय काढायचा, हा तुमचा विषय आहे. 

राज ठाकरे केवळ राजकारण्यांना भेटत नाहीत, ते वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांनाही भेटत असतात. एकट्याच्या जीवावर निवडणुका लढविण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे; पण दोन समविचारी पक्ष जर एकत्र येणार असतील, तर त्यात अडचण काय आहे. भाजपबरोबर पूर्वी जे पक्ष होते, ते आता बरोबर राहिलेले नाहीत. राज ठाकरेंची नवी टॅगलाइन आलेली आहे, हिंदवी रक्षक-महाराष्ट्र सेवक, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात चर्चा आहे. लोक त्यांना बाळासाहेबांच्या छबीत बघतात. मी विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे, असे राज ठाकरेंनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. आता तुम्ही युतीची चर्चा सुरू केली आहे, ती मी सकारात्मक घेतो, नकारात्मक दृष्टिकोनातून घेण्याचे कारण नाही. आमच्याकडे नकारात्मक विचारच नाही. येस वुई कॅन...

केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप

महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांना भेटण्याची परंपरा आहे. राजकीय नेते एकमेकांना भेटण्यात कुणाचा आक्षेप असू नये. त्यामुळे भाजपचे नेते आणि राज ठाकरे दोघेही भेटत असतील तर त्यात चुकीचे काय आहे? राज ठाकरे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. अशा राजकीय नेत्याला भाजपचे नेते भेटत असतील तर त्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आक्षेप असण्याचे कारण नाही. 

राजकीय पक्षाचे नेते एकत्र येत असतात, एकमेकांना भेटत असतात संवाद साधत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे. यातून कुणी राजकारण साधण्याचा प्रयत्न करू नये. राहिला प्रश्न मनसेबरोबर भाजपच्या युतीचा तर यासंदर्भात भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलेले आहे. आता अशा प्रकारचा कोणताही विषय नाही. या भेटीतून युती करावी किंवा करू नये असा कुठलाही विषय आता नाही. या भेटीतून कोणता अर्थ काढायचा हा माध्यमांचा अधिकार आहे. राजकीय पक्ष म्हणून या भेटीतून लगेच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. युती करू किंवा करणार नाही, असा कुठलाही विषय आज तरी समोर नाही. त्यामुळे आता या सगळ्या विषयावर भाष्य करणे खूप घाईचे होईल. भाजप जनतेच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करतो.

शब्दांकन : दीपक भातुसे

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBala Nandgaonkarबाळा नांदगावकरBJPभाजपा