शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मनसे-भाजप एकत्र येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2022 17:00 IST

मनसे आणि भाजप एकत्र येणार का?, याची चर्चा रंगली आहे.

बाळा नांदगावकर, नेते, मनसे 

मध्यंतरी राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हाही राष्ट्रवादी आणि मनसेची युती होणार, अशी चर्चा रंगली होती. राज ठाकरे नव्या घरात राहायला गेले आहेत, घरी गणपती आहे,  त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांना भेटायचे असते. आता राजकीय नेते घरी आले की, राजकीय चर्चा होणारच, त्यातून तुम्ही अर्थ काय काढायचा, हा तुमचा विषय आहे. 

राज ठाकरे केवळ राजकारण्यांना भेटत नाहीत, ते वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांनाही भेटत असतात. एकट्याच्या जीवावर निवडणुका लढविण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे; पण दोन समविचारी पक्ष जर एकत्र येणार असतील, तर त्यात अडचण काय आहे. भाजपबरोबर पूर्वी जे पक्ष होते, ते आता बरोबर राहिलेले नाहीत. राज ठाकरेंची नवी टॅगलाइन आलेली आहे, हिंदवी रक्षक-महाराष्ट्र सेवक, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात चर्चा आहे. लोक त्यांना बाळासाहेबांच्या छबीत बघतात. मी विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे, असे राज ठाकरेंनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. आता तुम्ही युतीची चर्चा सुरू केली आहे, ती मी सकारात्मक घेतो, नकारात्मक दृष्टिकोनातून घेण्याचे कारण नाही. आमच्याकडे नकारात्मक विचारच नाही. येस वुई कॅन...

केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप

महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांना भेटण्याची परंपरा आहे. राजकीय नेते एकमेकांना भेटण्यात कुणाचा आक्षेप असू नये. त्यामुळे भाजपचे नेते आणि राज ठाकरे दोघेही भेटत असतील तर त्यात चुकीचे काय आहे? राज ठाकरे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. अशा राजकीय नेत्याला भाजपचे नेते भेटत असतील तर त्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आक्षेप असण्याचे कारण नाही. 

राजकीय पक्षाचे नेते एकत्र येत असतात, एकमेकांना भेटत असतात संवाद साधत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे. यातून कुणी राजकारण साधण्याचा प्रयत्न करू नये. राहिला प्रश्न मनसेबरोबर भाजपच्या युतीचा तर यासंदर्भात भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलेले आहे. आता अशा प्रकारचा कोणताही विषय नाही. या भेटीतून युती करावी किंवा करू नये असा कुठलाही विषय आता नाही. या भेटीतून कोणता अर्थ काढायचा हा माध्यमांचा अधिकार आहे. राजकीय पक्ष म्हणून या भेटीतून लगेच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. युती करू किंवा करणार नाही, असा कुठलाही विषय आज तरी समोर नाही. त्यामुळे आता या सगळ्या विषयावर भाष्य करणे खूप घाईचे होईल. भाजप जनतेच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करतो.

शब्दांकन : दीपक भातुसे

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBala Nandgaonkarबाळा नांदगावकरBJPभाजपा