शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:38 IST

Devendra Fadnavis on Jayant Patil: राज्याच्या राजकारणात कायम जयंत पाटील यांच्या पक्षातराच्या चर्चा सुरू असतात. प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच स्पष्ट उत्तर दिले. 

Devendra Fadnavis Latest News: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा विशिष्ट कालावधीनंतर डोकं वर काढते. आताही जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि या चर्चेला राजकीय वर्तुळात तोंड फुटले. राजकारणात सातत्याने होणाऱ्या या चर्चांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी 'हिंदी सक्ती हवीच कशाला' अशी लेख संग्रह पुस्तिका भेट दिली. याच मुद्द्यावर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काल मला हिंदी सक्ती हवीच कशाला, असा मला वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह प्राप्त झाला. यात काही कात्रणे लावण्याची आवश्यकता आहे. त्या कात्रणांमध्ये शासनाच्या समितीने जो अहवाल दिला होता आणि समितीने पहिली ते १२वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याची शिफारस केली होती."

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंकडे कोणती मागणी केली?

"तो अहवाल उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळासमोर आला. भाषेच्या उपसमितीमध्ये फक्त तज्ज्ञ नव्हते, तर शिवसेनेचे उपनेते होते, त्यांनीही शिफारस केली होती की,  पहिली ते १२वी हिंदी सक्ती करावी. तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला. फक्त स्वीकारलाच नाही, तर आठवड्यानंतर मिनिट्सला मंजूरी दिली. सरकारने स्वीकारल्यानंतर त्याचा शासनादेश असतो. त्यावर माझा आक्षेप नाहीये. फक्त त्यात ठाकरे सरकारला अहवाल सुपूर्द करतानाची बातमी लावा. तो स्वीकारल्याच्या बातम्या लावाव्या. मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर केलेली अधिकृत पोस्टचे कात्रण त्यात लावावे, अशी माझी माफक मागणी आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

याच मुद्द्यावर बोलत असताना विरोधकांकडून टिप्पणी केली गेली. त्यावर देवेंद्र फडणवीस जयंत पाटलांना म्हणाले, "हो. आपल्या पुढची भेट घ्यावीच लागेल, नाहीतर यांना (माध्यमांना) खाद्य कसं मिळेल?"

जयंत पाटील भाजपमध्ये जाणार?

"हे एक कठीणच झाले आहे. जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार. हे आमच्याकडे येऊन गेले की, हे भाजपसोबत येणार. आपण संवादाच्या गोष्टी करतो आणि आता... मी माध्यमांना दोष देत नाही; पण माझी त्यांना विनंती आहे की, संवाद राहू द्या. कुणी कुणाला भेटले म्हणजे तो त्याच्या पक्षातच चाललाय, त्याची युतीच होतेय, असं नाही", असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पक्षातराच्या चर्चांना उत्तर दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा