शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:00 IST

लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे असं फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावर अखेर फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे. मी पुढील विधानसभा निवडणूक लढणार आणि तीदेखील नागपूरमधूनच असं त्यांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. त्याचसोबत देशातील जनतेने तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना संधी देण्याचं ठरवलं आहे असंही म्हटलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी लोक त्यांचा विचार बदलणार नाही असा विश्वास व्यक्त केला. पत्रकारांनी पुढील दहा वर्षांत तुम्ही स्वत:ला कुठे पाहता असं विचारल्यावर या प्रश्नावर मी भाजपसोबतच राहील आणि पक्ष मला देईल ती कोणतीही जबाबदारी पार पाडू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचसोबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती त्यांनी दिली. मराठा आंदोलनावरही फडणवीसांनी रोखठोक भाष्य केले.

राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे याला प्राथमिकता आहे. मी सर्व मंत्र्यांना सांगितले, आपण मंत्री म्हणून राज्यात कुठेही तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यावर फडणवीसांनी हे उत्तर दिले आहे.

दरम्यान, राज्यातील महापालिका अन्य निवडणुकीबाबत विचारणा केली असता, सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने या निवडणुकांना विलंब होतोय, आम्हालाही महापालिकांच्या निवडणुका हव्यात, कारण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महापालिकेतही उमटतील. भाजपा आणि सहकारी पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शरद पवार-अजित पवार भेटीवर काय म्हणाले फडणवीस?

दिवाळीनिमित्त शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध महत्त्वाचे असतात. कुणीही कुटुंबात राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपा