शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:00 IST

लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे असं फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावर अखेर फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे. मी पुढील विधानसभा निवडणूक लढणार आणि तीदेखील नागपूरमधूनच असं त्यांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. त्याचसोबत देशातील जनतेने तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना संधी देण्याचं ठरवलं आहे असंही म्हटलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी लोक त्यांचा विचार बदलणार नाही असा विश्वास व्यक्त केला. पत्रकारांनी पुढील दहा वर्षांत तुम्ही स्वत:ला कुठे पाहता असं विचारल्यावर या प्रश्नावर मी भाजपसोबतच राहील आणि पक्ष मला देईल ती कोणतीही जबाबदारी पार पाडू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचसोबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती त्यांनी दिली. मराठा आंदोलनावरही फडणवीसांनी रोखठोक भाष्य केले.

राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे याला प्राथमिकता आहे. मी सर्व मंत्र्यांना सांगितले, आपण मंत्री म्हणून राज्यात कुठेही तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यावर फडणवीसांनी हे उत्तर दिले आहे.

दरम्यान, राज्यातील महापालिका अन्य निवडणुकीबाबत विचारणा केली असता, सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने या निवडणुकांना विलंब होतोय, आम्हालाही महापालिकांच्या निवडणुका हव्यात, कारण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महापालिकेतही उमटतील. भाजपा आणि सहकारी पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शरद पवार-अजित पवार भेटीवर काय म्हणाले फडणवीस?

दिवाळीनिमित्त शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध महत्त्वाचे असतात. कुणीही कुटुंबात राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपा