शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता काँग्रेसचे आमदारही सरकारमध्ये सहभागी होणार का? मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 09:14 IST

Eknath Shinde: महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटून भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडून काही आमदार मंत्रिमंडळात सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे.

२०१९ पासून नाट्यमय घडामोडी आणि उलथापालथींमुळे गाजत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिवसागणिक नवनवी वळणं मिळत आहेत. गतवर्षी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड होऊन शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडून शिंदे-भाजपा सरकार सत्तेत आलं होतं. तर आता बरोब्बर एक वर्षानंतर अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं आहे. वर्षभरापूर्वी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटून भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडून काही आमदार मंत्रिमंडळात सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे.

आमचं काम पाहून अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. एक आठवड्याच्या आत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र काँग्रेसचे काही आमदार सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा मात्र त्यांनी फेटाळून लावली आहे. आता आमच्याकडील जागा भरल्या आहेत, असे ते म्हणाले.

एक वर्षापूर्वी आम्ही सरकार बनवलं होतं, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरून स्थापन केलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती. त्यांचे आदर्श आणि त्यांच्या मार्गावर आम्ही चालत आहोत. एक वर्षापासून येथे सर्वसामान्यांचं सरकार आहे.

आम्ही हे सरकार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आदर्शांना अनुसरून चालवत आहोत. गेल्या काही वर्षांपासून जी कामं प्रलंबित होती. त्यांना आमच्या सरकारच्या काळात गती देण्यात आली आहेत. आमचं काम पाहूनच अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. मी मुख्यमंत्री आहे आणि हे सरकार सुरळीतपणे चालावं, यासाठी मी प्रयत्नशील असेन, असेही, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार