शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आता काँग्रेसचे आमदारही सरकारमध्ये सहभागी होणार का? मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 09:14 IST

Eknath Shinde: महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटून भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडून काही आमदार मंत्रिमंडळात सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे.

२०१९ पासून नाट्यमय घडामोडी आणि उलथापालथींमुळे गाजत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिवसागणिक नवनवी वळणं मिळत आहेत. गतवर्षी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड होऊन शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडून शिंदे-भाजपा सरकार सत्तेत आलं होतं. तर आता बरोब्बर एक वर्षानंतर अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं आहे. वर्षभरापूर्वी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटून भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडून काही आमदार मंत्रिमंडळात सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे.

आमचं काम पाहून अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. एक आठवड्याच्या आत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र काँग्रेसचे काही आमदार सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा मात्र त्यांनी फेटाळून लावली आहे. आता आमच्याकडील जागा भरल्या आहेत, असे ते म्हणाले.

एक वर्षापूर्वी आम्ही सरकार बनवलं होतं, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरून स्थापन केलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती. त्यांचे आदर्श आणि त्यांच्या मार्गावर आम्ही चालत आहोत. एक वर्षापासून येथे सर्वसामान्यांचं सरकार आहे.

आम्ही हे सरकार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आदर्शांना अनुसरून चालवत आहोत. गेल्या काही वर्षांपासून जी कामं प्रलंबित होती. त्यांना आमच्या सरकारच्या काळात गती देण्यात आली आहेत. आमचं काम पाहूनच अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. मी मुख्यमंत्री आहे आणि हे सरकार सुरळीतपणे चालावं, यासाठी मी प्रयत्नशील असेन, असेही, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार