शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

साहित्य संमेलनात नागरिकत्व दुरुस्ती कायदा गाजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 06:00 IST

अध्यक्षीय भाषणात संविधान हा मूळ मुद्दा : ठरावही मांडला जाण्याची शक्यता

ठळक मुद्देयंदा संमेलन संत गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत अर्थात उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीलासंमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणात संविधान केंद्रस्थानी

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : सध्या देशाामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन रणकंदन माजले आहे. एनआरसी आणि ‘सीएए’मुळे संविधानातील तत्वांची आणि मुल्यांची पायमल्ली होत असल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे. उस्मानाबाद येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही या कायद्याचे पडसाद उमटणार आहेत. संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अध्यक्षीय भाषणात संविधान केंद्रस्थानी ठेवले असून, संमेलनात मांडण्यात येणा-या ठरावातही या मुद्दयाचा समावेश केला जाणार आहे.यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत अर्थात उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीदरम्यान होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेतर्फे संमेलनाचे आयोजन केले आहे. साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषण, परिसंवाद, तसेच संमेलन ठरावांमधून सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब उमटत असते. सध्या देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा तीव्र निषेध केला जात आहे. अनेक राज्यांमध्ये या कायद्याविरोधात आंदोलने, मोर्चे, सभा सुरु असून, काही ठिकाणी कायद्याच्या समर्थनार्थ रॅली निघत आहे.धर्मनिरपेक्षता हा भारतीय राज्यघटनेचा मुलभूत पाया आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे लोकशाहीची मुल्ये दडपली जात असल्याचा आरोप होत आहे. नियोजितअध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये या मुद्दयाचा प्रामुख्याने समावेश केल्याचे संकेत दिले आहेत. साहित्य संस्थांकडून प्रस्ताव आल्यास, अथवा महामंडळ सदस्याने बैठकीत हा मुद्दा उचलून धरल्यास ठरावामध्येही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत ठाम भूमिका घेतली जाणार आहे.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यापासूनच सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. अमित शहा यांनी मांडलेल्या ‘एक भाषा, एक धर्म’ या संकल्पनेलाही त्यांनी विरोध दर्शवला होता. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर झालाच पाहिजे, असे सांगत ‘एक भाषा, एक धर्म देशात अराजक निर्माण करेल’, असे खडे बोल त्यांनी सुनावले होते. अध्यक्षीय भाषणातही संविधान हेच केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.------------अध्यक्षीय भाषणाची प्रत आयोजक समितीकडे सोपविली आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला मुलभूत अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांची अंमलबजावणी देशात व्हायला हवी. संविधान हा अध्यक्षीय भाषणाचा पाया असेल. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत चिंतन सुरु आहे. साहित्य, संस्कृती, पर्यावरण यांसह भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता याबाबत अध्यक्षीय भाषणात भाष्य असेल.- फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नियोजितअध्यक्ष, उस्मानाबाद अखिलभारतीयमराठीसाहित्य संमेलन---------------------घटक तसेच संलग्न साहित्य संस्थांना ठराव पाठवण्याबाबतचे निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यानुसार संस्थांकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतचा ठराव मांडला जाऊ शकतो. महामंडळाच्या बैठकीत ठरावांबाबत चर्चा केली जाईल. महामंडळाचा एखादा सदस्यही याबाबत प्रस्ताव ठेवू शकतो.- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

टॅग्स :PuneपुणेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक