शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

भाजप मित्र पक्षांना २२ वरच गुंडाळणार? मित्रांचे फिफ्टी-फिफ्टी की शिंदेंच्या पक्षाला झुकते माप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 11:01 IST

Mahayuti Seat Shearing: भाजप आणि शिवसेनेची २०१९ मध्ये लोकसभेला युती होती तेव्हा शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप आपल्या दोन मित्र पक्षांना मिळून २२ जागा देणार आहे.

मुंबई  - भाजप आणि शिवसेनेची २०१९ मध्ये लोकसभेला युती होती तेव्हा शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप आपल्या दोन मित्र पक्षांना मिळून २२ जागा देणार आहे. आपलीच खरी शिवसेना असा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपलीच राष्ट्रवादी खरी असा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यामुळे नुकसान होणार असल्याचे आकडेवारी सांगते. 

फडणवीस यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा जागावाटपाचा महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसार भाजप २६ जागा लढेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून २२ जागा लढवतील.  याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला २०१९ मधील अविभाजित शिवसेनेइतक्या जागा लढायला मिळणार नाहीत. अविभाजित राष्ट्रवादीने काँग्रेससोबतच्या आघाडीत १९ जागा लढविल्या होत्या आणि चार  जिंकल्या होत्या. 

फॉर्म्युला ठरलेला नाही : फडणवीस  - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जागा वाटपाचा महायुतीत फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. गेल्या वेळी ज्या पक्षाने ज्या जागा लढवल्या होत्या त्या त्यांच्याकडे राहतील पण बदल करायचे असल्यास चर्चा होईल.

मविआतही तोच फॉर्म्युला?  - महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडूनही अशाच फॉर्म्युल्याचा आग्रह धरला जाऊ शकतो. ठाकरे गटाकडे पाच खासदार आहेत, तर राष्ट्रवादीतही फूट पडलेली आहे. त्यामुळे त्याआधारे जागावाटप व्हावे, अशी भूमिका काॅंग्रेस मांडू शकते.

कसे असेल जागावाटपाचे गणित?शिंदेंसोबत लोकसभेचे १३ खासदार आहेत, सर्व १३ खासदारांना तिकिटे मिळणार की दोनतीन जागा बदलून दिल्या जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  १३ जागा शिंदे गटाला दिल्या तर उर्वरित ९ जागा अजित पवारांच्या वाट्याला जातील.  अजित पवार यांच्यासोबत आज फक्त सुनील तटकरे (रायगड) हे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. जाणकारांच्या मते, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या २२ जागांपैकी फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला वापरून प्रत्येकी ११ जागा द्याव्यात अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेतली जाऊ शकते. शिंदेंच्या शिवसेनेचा त्यास विरोध असेल. याचवेळी विधानसभेसाठीचेही जागावाटप करण्याचा आग्रह दोन्ही मित्र पक्षाकडून होऊ शकतो.

२०१९ मध्ये भाजपने २५ जागा लढविल्या होत्या आणि तब्बल २३ जिंकल्या होत्या. यावेळी २६ जागा लढविण्याचा इरादा असून वाढीव  एक जागा जास्त लढून महायुतीमध्ये दोन पक्षांना सोबत घेतले तरी आपण आपल्या जागा कमी होऊ दिलेल्या नाही असा संदेश भाजप नेतृत्व पक्षजनांना देऊ पाहत आहे असे दिसते. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस