शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

President's Rule : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास 'हे' हाेतील परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 16:56 IST

Indian Election : काेणीही सरकार स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकते. असे झाल्यास राज्यावर काय परिणाम हाेतील याचा घेतलेला आढावा.

पुणे : भाजप आणि शिवसेना या दाेन पक्षांमध्ये सत्तासंधर्ष सुरु असल्याने राज्यात अद्याप काेणाचेच सरकार स्थापन हाेऊ शकलेले नाही. आज 2014 च्या विधानभा विसर्जित हाेत आहे. येत्या काळात काेणीच सत्तास्थापनेचा दावा न केल्यास राज्यघटनेनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकते. जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याचे काय परिणाम हाेतील, राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालेल याबाबत घटनातज्ञ डाॅ. उल्हास बापट यांच्याशी साधलेला संवाद 

डाॅ. उल्हास बापट म्हणाले, 172 कलमांतर्गत विधानसभा निर्माण झाल्याच्या पाच वर्षानंतर कायद्यानुसार विसर्जित हाेेते. राज्यपालांना ती विसर्जित करावी लागत नाही. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहू शकत नाहीत. राज्यपाल जाे मुख्यमंंत्री नियुक्त करतील ताे नवीन विधानसभेला जबाबदार असेल. नवीन विधानसभा राज्यपालांना बाेलवावी लागेल. त्यानंतर तात्पुरता अध्यक्ष नेमला जाईल. ताे सर्वांना शपथ देईल. त्यानंतर त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त हाेताे. मतदानानंतर अध्यक्षाची निवड सदस्य करतील आणि जर मुख्यमंत्र्यांचा विश्वासदर्शक ठराव असेल तर ताे सदस्य संमत करतील, अशी संविधानिक प्रक्रीया आहे. 

जर काेणीच सत्तास्थापनेचा दावा केला नाहीतर राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतात. त्यानंतर राष्ट्रपती 356 कलमानुसार त्या राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करतात. या सर्व आणिबाणीच्या तरतूदी आहेत. राज्यघटनेच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणबाणी लागू हाेते, 360 नुसार आर्थिक आणीबाणी आहे आणि 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते. विधानसभेच्या कार्याचे अधिकार संसदेकडे जातात. उच्च न्यायालयावर कुठलाही परिणाम हाेत नाही. दाेन महिन्याच्या आत याला संसदेची संमती लागते. 6 महिन्यापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येते. सहा महिन्यांहून अधिक काळ राष्ट्रपती राजवट लागू करायची असल्यास निवडणूक आयाेगाची संमती लागते. ही राष्ट्रपती राजवट पुढे तीन वर्षे लागू केली जाऊ शकते. तीन वर्षाच्या पुढे ती ठेवता येत नाही. 

राष्ट्रपती राजवट लागू झाली याचा अर्थ राज्याची सर्व सत्ता ही राज्यपालांच्या हाती जाते. याचाच अर्थ मुख्य सचिव राज्याचा कारभार चालवितात. नवीन मुख्यीमंत्री नेमेपर्यंत ही राष्ट्रपती राजवट सुरु राहते. राष्ट्रपती राजवट कधीही मागे घेतली जाऊ शकते. राज्यपालांना या काळात धाेरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. दरराेजचा राज्यकारभार त्यांना चालविता येताे. राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या राज्याचं बजेट संसद पास करु शकते. परंतु प्रत्यक्ष मुख्यंमत्र्यांना असणारे अधिकार प्रत्यक्ष राज्यपालांना वापरता येत नाहीत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPresidentराष्ट्राध्यक्षBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019