शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
3
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
4
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
5
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
6
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
7
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
8
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
9
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
10
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
11
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
12
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
13
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
14
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
15
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
16
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
17
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
18
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
19
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
20
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर

President's Rule : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास 'हे' हाेतील परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 16:56 IST

Indian Election : काेणीही सरकार स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकते. असे झाल्यास राज्यावर काय परिणाम हाेतील याचा घेतलेला आढावा.

पुणे : भाजप आणि शिवसेना या दाेन पक्षांमध्ये सत्तासंधर्ष सुरु असल्याने राज्यात अद्याप काेणाचेच सरकार स्थापन हाेऊ शकलेले नाही. आज 2014 च्या विधानभा विसर्जित हाेत आहे. येत्या काळात काेणीच सत्तास्थापनेचा दावा न केल्यास राज्यघटनेनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकते. जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याचे काय परिणाम हाेतील, राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालेल याबाबत घटनातज्ञ डाॅ. उल्हास बापट यांच्याशी साधलेला संवाद 

डाॅ. उल्हास बापट म्हणाले, 172 कलमांतर्गत विधानसभा निर्माण झाल्याच्या पाच वर्षानंतर कायद्यानुसार विसर्जित हाेेते. राज्यपालांना ती विसर्जित करावी लागत नाही. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहू शकत नाहीत. राज्यपाल जाे मुख्यमंंत्री नियुक्त करतील ताे नवीन विधानसभेला जबाबदार असेल. नवीन विधानसभा राज्यपालांना बाेलवावी लागेल. त्यानंतर तात्पुरता अध्यक्ष नेमला जाईल. ताे सर्वांना शपथ देईल. त्यानंतर त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त हाेताे. मतदानानंतर अध्यक्षाची निवड सदस्य करतील आणि जर मुख्यमंत्र्यांचा विश्वासदर्शक ठराव असेल तर ताे सदस्य संमत करतील, अशी संविधानिक प्रक्रीया आहे. 

जर काेणीच सत्तास्थापनेचा दावा केला नाहीतर राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतात. त्यानंतर राष्ट्रपती 356 कलमानुसार त्या राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करतात. या सर्व आणिबाणीच्या तरतूदी आहेत. राज्यघटनेच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणबाणी लागू हाेते, 360 नुसार आर्थिक आणीबाणी आहे आणि 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते. विधानसभेच्या कार्याचे अधिकार संसदेकडे जातात. उच्च न्यायालयावर कुठलाही परिणाम हाेत नाही. दाेन महिन्याच्या आत याला संसदेची संमती लागते. 6 महिन्यापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येते. सहा महिन्यांहून अधिक काळ राष्ट्रपती राजवट लागू करायची असल्यास निवडणूक आयाेगाची संमती लागते. ही राष्ट्रपती राजवट पुढे तीन वर्षे लागू केली जाऊ शकते. तीन वर्षाच्या पुढे ती ठेवता येत नाही. 

राष्ट्रपती राजवट लागू झाली याचा अर्थ राज्याची सर्व सत्ता ही राज्यपालांच्या हाती जाते. याचाच अर्थ मुख्य सचिव राज्याचा कारभार चालवितात. नवीन मुख्यीमंत्री नेमेपर्यंत ही राष्ट्रपती राजवट सुरु राहते. राष्ट्रपती राजवट कधीही मागे घेतली जाऊ शकते. राज्यपालांना या काळात धाेरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. दरराेजचा राज्यकारभार त्यांना चालविता येताे. राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या राज्याचं बजेट संसद पास करु शकते. परंतु प्रत्यक्ष मुख्यंमत्र्यांना असणारे अधिकार प्रत्यक्ष राज्यपालांना वापरता येत नाहीत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPresidentराष्ट्राध्यक्षBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019