शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 14:09 IST

Devendra Fadnavis on Maharashtra Flood: राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची माहिती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि मदतीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. 

Devendra Fadnavis Maharashtra Rain: राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मृत्यू झाले आहे. पिके वाहून गेली आहेत. अनेक गावांना पूराचा वेढा पडला असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली. 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "ओला दुष्काळ काय, याठिकाणी जे काही नुकसान झाले आहे; त्याकरिता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे, ती सगळी मदत आम्ही देऊ. खरडून गेलेल्या जमिनीकरिता आपला शासन निर्णय आहे. तातडीची मदतही आपण करतो आहोत." 

हेलिकॉप्टरसाठी लष्कराशी चर्चा

"राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. काही भागामध्ये पूरपरिस्थितीमुळे लोक अडकली आहेत. बीडमध्ये मदत मोहीम सुरू आहे. धाराशिवमध्येही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. २७ लोकांना एनडीआरएफच्या लोकांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढले आहे. २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. लष्कराशी बोलून हेलिकॉप्टर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे", अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

पुरामुळे आठ लोकांचा मृत्यू 

"अहिल्यानगर, सोलापूर, बीड, जळगाव, परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. १० लोक जखमी आहेत. आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या या भागांमध्ये मदत करत आहेत", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

२ हजार २१५ कोटींची मदत, आठ दहा दिवसात पैसे जमा होतील

"मागच्या काळात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यावेळी एकत्रित पंचनामे आल्यावर मदत करण्याऐवजी जसे पंचनामे येतील, तशी मदत करत आहोत. त्यामुळे आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत करण्याचे शासन निर्णय काढले आहेत. यातील १८२९ कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झाले आहेत. पुढच्या आठ-दहा दिवसात पैसे जमा होतील", असे मुख्यमंत्री म्हणाले. 

"अजूनही पाऊस पडतो आहे. त्याठिकाणचे पंचनामे करणे आणि मदत करणे, हे काम सुरूच राहणार आहे. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यात आता कमी पैशांची मदत दिसत असली, तरी तेथील काम सुरू आहे. एका तालुक्याचा अहवाल आला, तर त्या तालुक्याला मदत करायची असे धोरण ठरवले आहे. तातडीने मदत मिळावी म्हणून हे ठरवले आहे", असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

मुख्यमंत्री करणार दौरा

"मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, याचा आढावा आम्ही घेतला आहे. उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये भेटी देण्यास सांगितले आहे. मी स्वतःही काही भागांमध्ये जाणार आहे. फक्त आमचा प्रयत्न असा असणार आहे की, जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू आहे, त्यावर कुठला ताण येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. तसेच आमचे दौरे असतील. परिस्थिती समजून घेऊन अधिक मदत काय करता येईल. उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला अधिकचा दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाईल", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdharashivधाराशिवfloodपूरRainपाऊसJalgaonजळगावAhilyanagarअहिल्यानगरBeedबीड