शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वणव्यांचा कहर ! १२ हजार हेक्टर वनक्षेत्र जळून खाक ; एका वर्षात १६ हजार घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:49 IST

Amravati : महाराष्ट्रातील वनसंपदेला वणव्याचा शाप लागला असून, गेल्या वर्षभरात २०२३-२४ मध्ये राज्यातील तब्बल १२,००३ हेक्टर वनक्षेत्र आगीच्या विळख्यात सापडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :महाराष्ट्रातील वनसंपदेला वणव्याचा शाप लागला असून, गेल्या वर्षभरात २०२३-२४ मध्ये राज्यातील तब्बल १२,००३ हेक्टर वनक्षेत्र आगीच्या विळख्यात सापडले आहे. वन विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात वणव्याच्या एकूण १६,००८ घटनांची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जगाने विझवण्यासाठी आधुनिक 'हेली-टैंकर्स' आणि ड्रोनचा वापर सुरू केला असताना, राज्यात वन कर्मचारी मात्र आजही झाडांच्या फांद्यांनी आग विझवताना स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. 

वन सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, गडचिरोली जिल्हा वणव्याच्या बाबतीत देशात अग्रस्थानी राहिला आहे. २०२३-२४ या हंगामात एकट्या गडचिरोलीत ७,०४२ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्या खालोखाल ठाणे, कोल्हापूर आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अमरावती) या आहे. भागांना वणव्याचा मोठा फटका बसला वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पुनरुत्पादन थांबले असून, जमिनीतील सूक्ष्म जीव आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. यंदा फेब्रुवारीपासून वणव्याच्या घटना सुरू झाल्या असून, आता कुठे ३ ते ४ दिवसांपासून अवकाळी पावसाच्या आगमनाने वणव्याला थोडी उसंत मिळाली आहे.

२०२३-२४ मधील स्थिती (अधिकृत डेटा)

एकूण जळालेले क्षेत्र : १२,००३ हेक्टर (२०२२-२३ मध्ये १९,९९० हेक्टर होते).आगीच्या घटना : सुमारे १६,००८ (एसएनपीपी-व्हीआयआयआरएस सेन्सरनुसार).सर्वाधिक प्रभावित जिल्हे गडचिरोली (७,०४२ घटना), चंद्रपूर, अमरावती (मेळघाट)आणि ठाणे.सरासरी हानी : प्रति घटना २.१९ हेक्टर क्षेत्र बाधित.

अद्ययावत यंत्रणेची प्रतीक्षाच

वणवा नियंत्रणासाठी वन विभागाने राज्य शासनाकडे १०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. या निधीतून आधुनिक ब्लोअर्स, फायर प्रुफ जॅकेट्स आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम खरेदी करण्याचे नियोजन आहे. मात्र, सध्याच्या घडीला अनेक वनपरिक्षेत्रांत कर्मचाऱ्यांकडे साथी सुरक्षा साधनेही उपलब्ध नाहीत. डोंगरदऱ्यांत लागलेली आग विझवण्यासाठी केवळ मानवी कष्टावर विसंबून राहावे लागत असल्याने वणव्याची दाहकता वाढत आहे.

"केवळ झाडेच नव्हे, तर वणव्यामुळे वाघ, बिबट्या आणि अन्य तृणभक्षी प्राण्यांच्या अधिवासावर गदा येत आहे. मार्च ते मे या काळात लागणाऱ्या आर्गीमुळे जमिनीवरील पक्ष्यांची घरटी आणि अंडी नष्ट होत असल्याने जैवविविधतेचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे."- यादव तरटे पाटील, मानद वन्यजीवरक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : Wildfires Devastate Maharashtra: Thousands of Hectares Burned, 16,000 Incidents

Web Summary : Maharashtra's forests are ravaged by wildfires, with 12,003 hectares burned in the past year. Gadchiroli is the worst-hit district. Inadequate equipment hampers efforts to combat the blazes, threatening wildlife and biodiversity. A 100 crore fund is awaited for modern equipment.
टॅग्स :fireआगforestजंगलAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र