शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

... म्हणून नरकचतुर्दशीला पायाखाली कारिटं फोडतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 11:18 AM

काही ठिकाणी अंघोळीआधी तर काही ठिकाणी अंघोळीनंतर पायानं कारिटं ठेचलं जातं. त्यालाही एक कारण आहे.

ठळक मुद्देया फळाला विविध नावं आहेत. काही ठिकाणी त्याला कर्टुले तर काही ठिकणी चिराटं म्हणतातकाकडीसारखेच हे फळ दिसत असले तरी याचा आकार अंड्यासारखा असतो.चिराटं फोडण्यामागे एक वैज्ञानिक कारणही दिलं जाते

श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून आपण आश्विन महिन्याच्या चौदाव्या दिवशी नरकचतुर्दशी साजरी करतो. यादिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की पहाटे आकाशात तारे दिसतात तोवर अंघोळ करणे गरजेचं असतं. याचदिवशी आपण अंघोळीनंतर पायाच्या अंगठ्याने कारीटं (हिरव्या रंगांचं कडू फळ) फोडतो. पण तुम्हाला माहितेय का आपण असे का करतो.

नरकासुर नावाच्या एका असूर राजाची भगवान श्रीकृष्णाच्या काळात मोठी दहशत होती. तो इतरांना फार त्रास देत असे. स्त्रियांशी वाईट वागत असे. त्यामुळे जनता त्याला फार त्रासली होती. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णाला कळली तेव्हा त्याने सत्यभामेसह त्या असूरी राजावर आक्रमण केलं आणि त्याचा वध केला. त्याच्या वधाचं प्रतिक म्हणून आपण हे कडू फळ फोडतो. आणि त्याचा रस जिभेला लावतो. याबाबत असं सांगण्यात येतं की, ‘ते फळ फोडून आपण आजच्या काळातील प्रतिकात्मक नरकासूराचा वध करतो. शिवाय दुसरी वैज्ञानिक गोष्ट अशी सांगितली जाते की, अश्विन महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या काळात हिवाळा सुरू झालेला असतो. फार थंडी असतो. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हे कडू फळ चाखलं जातं.'

कारीटे फोडण्याची ही प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात नाही. काहीच ठिकाणी या प्रथेचं पालन केलं जातं. शिवाय काही ठिकाणी हे कारिटे अंघोळीनंतर ठेचतात. तर काही ठिकाणी अंघोळीआधी कारिटे ठेचले जातात, कारण या फळाला एक उग्र वास असतो. त्यामुळे अंघोळीआधी कारिटे ठेचून त्यानंतर अंघोळ केली जाते.

त्याचप्रमाणे या कारिटेला विविध नावेही आहेत. काही ठिकाणी या फळाला कर्टुले म्हणतात. तर काही ठिकाणी चिराटे म्हणतात. कारिटे हे अनेकवचनी असून कारीट हे एकवचनी नाव आहे. कारीटं हे कोकणात आढळणारे रानवेलीवर येणारं फळ आहे. हे फळ वेलीला लागते जे एकदम काकडीच्या वेलीसारखे दिसते. काकडीच्या फुलांसारखीच याचीही फले पिवळ्या रंगाची असतात. अगदी काकडीसारखेच हे फळ दिसत असले तरी याचा आकार अंड्यासारखा असतो. आतल्या बिया काकडीच्या बियांसारख्या असतात पण थोड्या आखूड असतात.

टॅग्स :diwaliदिवाळीIndian Traditionsभारतीय परंपरा