शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

अटलजींचे होते; मग बाळासाहेब ठाकरेंचे का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 12:15 IST

सत्तेत असून आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, आणि राममंदिर बांधायला निघाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्या आयोध्या दौऱ्यावर केली होती.

मुंबई - मुंबईतील शिंपोली, बोरिवली पश्चिम येथे 'अटल स्मृती उद्याना'चे गुरुवारी लोकार्पण झाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ अटल स्मृती हे उद्यान उभारण्यात आले आहे. रेकॉर्डब्रेक वेळेत या उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे अटलजींच्या स्मर्णार्थ अटल स्मृती उद्यानाची निर्मिती वेगाने होऊ शकते, तर मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला उशीर का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अटल स्मृती या उद्यानाचे नुकतेच लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. विशेष म्हणजे या लोकर्पण सोहळ्याला खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी शिवसेना आक्रमक आहे. परंतु, मागील साडेचार वर्षे सत्तेत असून देखील शिवसेनेला स्मारक उभारता आले नसल्याची टीका शिवसेनेवर करण्यात येते. त्यातच आता अटलजी यांच्या निधनानंतर काही दिवसांतच अटल स्मृती या उद्यानाचे लोकर्पण करण्यात आले आहे.

१६ ऑगस्ट २०१८ रोजी अटलजी यांचे निधन झाले होते. त्यानंतर रेकॉर्डब्रेक वेळेत अटलजी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ उद्यान उभारण्यात आले. उद्यान उभारण्यात आलेल्या जागेवर १५ वर्षांपूर्वी कचरा टाकण्यात येत होता. त्याच ठिकाणी आता उद्यान उभारण्यात आले आहे. आभासी वास्तविकता, अटलजींशी संवाद, होलोग्राम तंत्रज्ञान, भित्तिचित्र, शिल्प, अणुचाचणी, कारगील युद्धातील बंकर, भारतीय संविधानाच्या डीजीटल वाचनाची सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यांचा उद्यानात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले होते. याला सहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असून यापैकी साडेचार वर्षे शिवसेना पक्ष भाजपसोबत सत्तेत आहे. तसेच मुंबईत देखील शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील बाळासाहेबांच्या स्मारकाला उशीर का, याचं उत्तर शिवसैनिक शोधत आहेत.

याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीच्या मुद्दाला हात घातला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव यांनी शिवसेना नेत्यांना घेऊन आयोध्या दौरा केला होता. त्यावेळी उद्धव यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. सत्तेत असून आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, आणि राममंदिर बांधायला निघाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्यावर केली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेत आला होता.